शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 12, 2018 13:37 IST

पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत.

लातूर उस्मानाबाद, बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालाचे अनेक अर्थ आहेत. भाजपाचे सुरेश धस येथून विजयी झाले. मात्र या निकालाने दोन्ही काँग्रेसची आपपासातील दुफळी, राष्ट्रवादीत धनंजय मुंडे यांचे उभे रहात असलेले नेतृत्व; डोळ्यात सलणारी त्यांच्याच पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत.

ज्यावेळी या मतदारसंघातील निवडणूक कोणी लढवायची याची चर्चा सुरु झाली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अशोक जगदाळे यांचे नाव पुढे केले होते. मात्र हे नाव अमरसिंह पंडीत, राणा जगजितसिंह यांना सोयीचे नव्हते. त्यामुळे जगदाळे यांचे नाव पुढे येताच रमेश कराड यांचे नाव पंडीत यांनी पुढे केले. कराड यांना आधी अजित पवार यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मोठ्या पवारांची परवानगी घ्या असे सांगितल्यानंतर कराडांना थेट राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे नेण्यात आले. पवारांनी सगळ्यांची एकत्रित बैठक घेतली. त्या बैठकीतही धनंजय मुंडे यांनी वेगळे मत मांडले. त्यांचे मत साधे होते की जी व्यक्ती भाजपात गेली अनेक वर्षे आहे, त्या व्यक्तीचे त्या पक्षात कोणाशीही वाद झालेले नाहीत, कोणी त्यांना त्रास दिलेला नाही, अशी व्यक्ती अचानक उठून येते आणि राष्ट्रवादीत प्रवेश करायचा मनसुबा व्यक्त करते हे सगळे चुकीचे वाटत आहे, असे मुंडे कायम सांगत होते. मात्र अमरसिंह पंडीत आणि राणा पाटील यांना जगदाळे नकोच असल्याने त्यांनी खिंड लढवली आणि कराड यांचा भाजपा प्रवेश झाला. त्याआधी सुत्रांनी सांगितल्यानुसार शरद पवार यांनी विश्वनाथ कराड यांना फोन करुन रमेश कराड राष्ट्रवादीत येणार का? असे विचारले ही होते. त्यावर त्यांनीच हमी घेतल्याने पवार ही या प्रवेशाला तयार झाले होते.

गाजावाजा केला गेला. मात्र अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी कराडांनी कोणालाही न विचारता अर्ज परत घेतला व ते पुन्हा भाजपात गेले. तेव्हा मुंडे यांना दणका अशा बातम्या सुरु झाल्या. त्यावर शरद पवार यांनी ‘या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे वेगळे मत होते’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

अर्ज भरण्याची मुदत निघून गेली होती. जगदाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होताच. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने शेवटी जगदाळे यांना पाठींबा दिला आणि ही निवडणूक लढवली. मात्र स्वत:कडे विजयी होण्याएवढे संख्याबळ असतानाही काँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांनीच आपापसात खेळी करुन स्वत:चा उमेदवार स्वत:च पाडला. काँग्रेस असो की राष्ट्रवादी हे दोन पक्ष स्वत:ला स्वत:च हरवू शकतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले. 

या सगळ्यात ना अमित देशमुखांनी मदतीचा हात दिला ना अमरसिंह पंडीत आणि राणा पाटील यांनी. विजयानंतर सुरेश धस म्हणाले, घड्याळ हातात घातलेल्यांनी मला मदत केलीय... याचा अर्थ न समजण्याएवढे अज्ञानी येथे कोणीच नाही. तर पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकीय खेळी खेळता येत नसेल तर राजकारणात येऊ नये... 

यात पंकजा मुंडे यांना त्यांच्या भावांनीच मदत केली असे बोलले जात आहे, यात एक मानलेले  बंधू रमेश कराड यांनी उघड मदत केली, तर दुसरे मानलेले बंधू आ. अमित देशमुख यांनी पडद्याआड मदत केल्याचे बोलले जात आहे. मुंबईतुन शिवसेनेने कोणाला मदत केली आणि कामगार मंत्री संभाजी पाटील यांचा निलंगा कोणत्या दिशेला होते याची चर्चा तर मतदान झाल्या दिवसापासून होतेय.

या सगळ्यात कोणी कशी खेळी खेळली हे समोर आले आहे. एकीकडे राज्यात व देशात मोदी व भाजपा सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत असताना त्याचा फायदा घेत ऐकेक जागा जिंकत पुढे जाण्याची रणनिती आणख्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थी राजकारणाला जास्ती महत्व दिले. परिणामी ‘परसेप्शन’च्या राजकारणात भाजपाने स्वत:कडे स्वपक्षीय उमेदवार नसताना बाजी मारली.

राष्ट्रवादीत धनंजय मुंडे यांचे नेतृत्व उभे रहात होते. त्याला कशी खीळ घातला येईल यासंधीच्या शोधात असणाऱ्यांना आयती संधी चालून आली आणि राष्ट्रवादीत तरुण चेहरा पुढे येत असताना तो सोयिस्कररित्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. जर या जागी अशोक जगदाळे ऐवजी अन्य कोणताही उमेदवार असता तर राष्ट्रवादीने ही निवडणूक जिंकली असती आणि त्यावेळी याच जिल्ह्यातील अन्य नेते आम्हीच कसा विजय खेचून आणला याचे गोडवे गाताना दिसले असते. मात्र आज त्याच नेत्यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का अशा बातम्यांचा आनंद घेणे सुरु केले आहे.

या निकालाने पक्षीय हीतापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष असल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एवढे वातावरण असताना त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी पक्षातले व्यक्तीगत मतभेद बाजूला सारुन पुढे येण्याऐवजी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी स्वत:चाच स्वार्थ पाहिला. याचे चांगले वाईट परिणाम येत्या काळात जे काय व्हायचे ते होतील. पण अंतर्गत दुहीचा फायदा भाजपाने मिळवला आहे हे नक्की.

निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या सुरेश धस यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि त्यात धस विजयी झाले. पालघरमध्ये देखील काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राजेंद्र गावित यांना भाजपाने उमेदवारी दिली व गावित विजयी झाले. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात कायम भाजपाने लढा दिला त्याच पक्षातल्या नेत्यांना स्वत:च्या पक्षात आणून त्यांच्यासाठी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावून; त्यांना विजयी करण्याची वेळ भाजपा आणि त्यांच्या धुरिणांवर आली यातच सगळे काही आले. 

- अतुल कुलकर्णी  , www.atulkulkarni.in

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस