शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई स्फोटाच्या तोंडावर उभी!

By admin | Updated: February 1, 2016 02:26 IST

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे.

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे. एक चौ.किमी म्हणजे १०० हेक्टर्स असे गृहीत धरले तर मुंबईचे क्षेत्रफळ आज ३३,४७१ हेक्टर्स होते. या संपूर्ण जागेवर पायाभूत सोयीसुविधा, लोकलचे जाळे वगळता उरलेल्या जागेवर १.५ कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले सहावे शहर बनले आहे. २०३० मध्ये मुंबईची लोकसंख्या २.८ कोटींच्या घरात जाईल, त्यावेळी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले चौथे शहर बनेल. या मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी देवनार १३२, मुलुंड २५, गोराई १९.६, तर कांजूरमार्ग १४१ हेक्टर्स अशी चार डम्पिंग ग्राउंड्स आहेत. मुंबईकरांचा कचरा या ३१७ हेक्टर्स जागेवर जमा होतो. साहजिक चारही डम्पिंग ग्राउंडच्या परिसरातील लोक आज जीव मुठीत घेऊन जगत आहेत. देशाच्या या आर्थिक राजधानीला शांघाय करण्याची घोषणा कुठे गेली माहिती नाही; पण साधा कचऱ्याचा प्रश्नही पुरेसा मार्गी लागलेला नाही. सगळी डम्पिंग ग्राउंड्स उपनगरात आणि जॉगर्स पार्क, समुद्रकिनारे, खेळाची अद्ययावत सुसज्ज मैदाने चर्चगेट, सीएसटी ते शीवपर्यंत एकवटली आहेत. मुंबईचा कचरा आमच्याकडे का, असा सवाल उपनगरांमध्ये राहणारे करू लागले आहेत. यातून जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल तेव्हा होईल, पण देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने मात्र पेट घेतला. दोन दिवस मुंबईला कडकडीत उन्हात राख व धुराने वेढून टाकले. आगीचा फटका देवनार आणि परिसराला नाही तर अवघ्या मुंबईला बसला. थंडी असल्याने खूश असणाऱ्या मुंबईकरांनी धुके पसरले म्हणून आनंद साजरा केला. पण धुक्यासोबत येणाऱ्या राख आणि धूलिकणांची चादर कडकडीत उन्हातही कमी होईना तेव्हा कुठे घटनेचे गांभीर्य लोकांना कळाले. प्रशासनाने देवनार परिसरातील शाळा, कॉलेजना दोन दिवसांची सुटी जाहीर केली. घरादारांच्या खिडक्या बंद करून बसण्याची वेळ या भागातल्या लोकांवर आली. पण मोठमोठ्या मॉलमध्ये मात्र उदंड गर्दी तशीच. ‘नटसम्राट’ असो की ‘एअरलिफ्ट’ लोक सिनेमांना गर्दी करीतच होते. भेळ, वडापावच्या गाड्या असो की मासे विकणारे असोत, जो तो आपापल्या सोयीने कचऱ्यांचे ढीग वाट्टेल तेथे सोडून जाताना नेहमीच दिसतो. लोकही जाता येता रस्त्यावर, लोकलच्या डब्यात, सीटी बसमध्ये दिलखुलासपणे कचरा सोडून जात आहेत. पान खाऊन पिचकाऱ्या मारीत असतात.आज डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याने पेट घेतला. महापालिकेचे अधिकारी ‘कचरा आहे, तो तर पेटणारच’ असे म्हणत हात वर करत आहेत. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य मंत्रालयापासून पालिकेपर्यंत कोणालाही नाही. स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली सगळेच बेलगाम वागत सुटले आहेत. हे शहर कधीही झोपत नाही आणि कोणालाही उपाशी ठेवत नाही, यावरच्या अतिविश्वासापोटी प्रत्येकजण धावतोच आहे. कोणालाही मुंबईविषयी काही पडलेले नाही. हे शहर सुंदर राहिले पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, हे शहर टिकले तर आपण टिकू यावरही कोणाचा विश्वास उरलेला नाही. जो तो ओरबाडण्याच्या मागे लागला आहे.वाढत्या लोकसंख्येचे आणि शहरांचे नियोजन ज्यांनी करायचे त्या राजकीय नेत्यांकडे पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पलीकडचा विचार नाही. मतांचे गठ्ठे जोपासणे याशिवाय दुसरा कार्यक्रम नाही. चरस, गांजा, अफू आणि गुंडगिरीच्या विळख्यातून स्वत:स मुक्त करून घेत सिंगापूरने कात टाकली आणि मग २०१५ मध्ये एक कोटी भारतीयांनी त्या शहराला भेट दिली. त्याचा आनंदोत्सव सिंगापूर पर्यटन विभाग साजरा करत आहे आणि दोन कोटी मुंबईकर मात्र ‘धुरांच्या रेषा हवेत काढी’ म्हणत बसले आहेत...- अतुल कुलकर्णी