शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तुमच्या हातात आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 05:57 IST

जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडत असतील आणि त्यामुळे भांबावलेली जनता सरकारकडे आशेने पाहात असेल तर सरकारने काय म्हणायचे असते? ‘हे आमच्या हातात नाही’ असे? मग तुमच्या हातात आहे काय?

जनतेला वादविवादात रस नाही. तिला सारे समजूही शकते. देशात आलेल्या पेट्रोलची किंमत किती आणि आपल्याला घ्याव्या लागणाऱ्या पेट्रोलचा दर किती हे त्यातल्या दुपटीएवढ्या तफावतीने साऱ्यांनाच समजणारे आहे.काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरुद्ध पुकारलेल्या भारत बंदला देशात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहिल्यानंतरही केंद्र सरकार व त्याचे मंत्री ‘या भावांवर नियंत्रण ठेवणे आमच्या हातात नाही’ असे म्हणत असतील तर ते त्यांच्या निबरपणाएवढेच फसवेगिरीचेही लक्षण आहे. पेट्रोलियम पदार्थांचे भाव जगात वाढले असले तरी ते भारताएवढे कुठे वाढले नाहीत. त्यातच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पेट्रोलचा दर एका लिटरमागे ४८ रुपयांहून अधिक ठेवला जात असेल तर ती सरकारने जनतेची चालवलेली लूट आहे असे आकडेवारीनिशी देशाला सांगत आहेत. त्यातच देशाच्या सर्व प्रांतात ही दरवाढ सारखीही नाही. मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलला लिटरमागे ८८ रुपये द्यावे लागत असतील तर शेजारच्या गोव्यात त्यासाठी ७४ रुपये मोजावे लागतात. समुद्राकाठच्या शहरात बंदरे जवळ असल्यामुळे पेट्रोलचे दर कमी असावे व तेथून दूरच्या प्रदेशात ते अधिक होत जावे हा तर्कही सरकारने केलेल्या सरसकट दरवाढीने खोटा ठरविला आहे. देशात येणारे पेट्रोलियम पदार्थ बाहेरच्या जगातून येत असले तरी त्यावर आयातीसह अन्य कर किती लावावे हे या सरकारला ठरविता येते. आयातीचा करभार मोठा असणे, त्याला व्हॅटची जोड असणे आणि राज्यांकडून त्यावर त्यांचे जास्तीचे कर लादणे हा प्रकार विदेशातून स्वस्त दराने आणलेली वस्तू स्वदेशात भरमसाठ दराने विकण्याच्या व्यापारी मनोवृत्तीची साक्ष पटविणारा आहे. पेट्रोलियम पदार्थांवर देशात लावले जाणारे कर कमी करणे या सरकारच्या हातात आहे की नाही? तसे ते नसते तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कालच पेट्रोल व डिझेलच्या किमती लिटरमागे दोन रुपयांनी कमी कशा केल्या असत्या? बँका बुडणे, कर्जबुडव्यांनी सरकारला अंगठा दाखवत विदेशात पळून जाणे, औद्योगिक उत्पन्नात कमतरता येणे आणि देशाच्या उत्पन्नाच्या वाढीचा दर घसरणे या साºया गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी पेट्रोलच्या लिटरमागे ४० रु.ची लूट करणे हा सरकारचा इरादा असेल तर मात्र तो केवळ गंभीरच नव्हे तर अपराधाच्या कक्षेत जमा होणारा आहे. देशाचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेलाच घसरण लागली असल्याचे परवा सप्रमाण सांगितले. त्यावर त्यांना वादविवादाचे आव्हान त्या क्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या रविशंकर प्रसाद या मग्रूर चेहºयाच्या मंत्र्याने दिले. सरकार ताब्यात आहे आणि माध्यमे नियंत्रणात आहेत म्हणून आपला सगळा खोटारडेपणा खपून जाईल या भ्रमात भाजपानेही आता राहण्याचे कारण नाही. काँग्रेसने पुकारलेल्या ‘बंद’ ला द्रमुक, राजद व मनसे या पक्षांनी परवा पाठिंबा दिला. अनेक पक्ष त्यापासून दूर राहिले तरी त्या बंदला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. तो संतप्त ग्राहकांचा व जनतेचा होता. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडत असतील आणि त्यामुळे भांबावलेली जनता सरकारकडे आशेने पाहात असेल तर सरकारने काय म्हणायचे असते? ‘हे आमच्या हातात नाही’ असे? मग तुमच्या हातात आहे काय? तुम्ही दलितांवरील अत्याचार थांबवू शकत नाही, अल्पवयीन मुलींवरील बलात्कार रोखू शकत नाहीत, कामावरून कमी केले जाणारे कामगार व श्रमिकांचा रोजगार राखू शकत नाही, तर मग सरकारकडून अपेक्षा तरी कशाची करायची असते? त्यातून आपले सरकार लोककल्याणकारी असेल तर त्याने जनतेचे जीवन सुसह्य करायचे असते की असह्य? आपण सुरक्षित आहोत आणि आपल्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला परवडणाºया दरात उपलब्ध होत आहेत असा विश्वास जनतेला देणे हे सरकारचे काम आहे की ‘ते आमच्या हातात नाही’ असे सांगून हात वर करणे एवढीच त्याची जबाबदारी आहे. सबब परवाच्या बंदपासून सरकारने धडा घेणे गरजेचे आहे. हा असंतोष यापुढच्या काळात आणखी वाढेल. भाववाढीची चढती कमान नुसती पाहिली तरी हीच भीती जास्तीची वाटणारी आहे. म्हणून सरकारला विनंती एवढीच की त्याने किमान ‘हे आमच्या हातात नाही’ असे तरी जनतेला यापुढे कधी ऐकवू नये.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFuel Hikeइंधन दरवाढGovernmentसरकार