शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

एका दगडात अनेक

By admin | Updated: October 12, 2015 22:11 IST

मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले

मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले, असे म्हणता येईल? देशातील मागासवर्गीयांना राज्यघटनेने बहाल केलेले आरक्षण मोदी सरकारच काय, पण कोणीही रद्द करु शकत नाही असे नि:संदिग्ध प्रतिपादन करुन त्यांनी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तर इशारा दिलाच पण भागवतांनी आरक्षणनीतीच्या फेरविचाराची जी आवश्यकता बोलून दाखविली होती व ज्या विधानामुळे देशातील यादवादि तमाम दलितोद्धारकांनी जी कावकाव सुरु केली होती, ती बंद करुन टाकली. त्याचबरोबर खुद्द मोदींच्या राज्यात पाटीदारांना आरक्षण देण्याच्या मागणीआडून जातीधारित आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरु करणाऱ्या हार्दीक पटेल यालाही उत्तर देऊन टाकले. एकीकडे जातीधारित आंदोलनाला विरोध करायचा आणि दुसरीकडे जातीधारित आंदोलनाचा व्याप वाढविण्याच्या प्रयत्नातील नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन भाजपाला बिहारात पराभूत करण्याच्या वल्गना करायच्या यातच हार्दीक पटेल यांचे गोंधळी वावदूकगिरी उघड होते. अर्थात पंतप्रधानांनी स्वत: याबाबतीत स्पष्टीकरण केल्यानंतरही लालूप्रसाद आणि प्रभृतींची आगपाखड थांबेलच असे नाही. मोदींनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दरम्यान जसे अनेक पक्षी गारद केले तसेच कार्यक्रमापूर्वीही काही केले. घटनाबाह्य सत्ताकेन्द्र चालविणे आणि सत्तेचे सारे लाभ घेताना जबाबदाऱ्या मात्र इतरांवर ढकलायच्या याचे बाळकडूच शिवसेनेला मिळालेले असल्याने आपण जरी अष्टौप्रहर भाजपाला दुमत्यात घालीत असलो तरी पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात आपल्याला व्याह्याचा मान मिळावा अशी शिवसेनेची अपेक्षा होती. पण दुर्लक्षून एखाद्याची कशी उपेक्षा करावी याचा जणू वस्तुपाठच या निमित्ताने मोदींनी घालून दिला. ‘मी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तिसऱ्या कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही’ असेही मोदी यांनी यावेळी दाखवून दिले. यातून एकप्रकारे कखित शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्यात दुभंग निर्माण झाल्याचे चित्रही समोर आले. अर्थात शिवसेनेला मोदींपेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मोल अधिक वाटावे ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि स्वागतार्ह बाब मानावी लागेल. मोदींनीही तिचे स्वागत करुन टाकावे.