शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: ‘ईडी’ची ‘पुरवणी’ परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाने घेतली सक्तवसुली संचालनालयाची शाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 05:56 IST

आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे तपासासाठी किचकट असतात हे खरे. त्यामुळे त्यांचा तपास तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईलच असे नाही

गेली काही वर्षे राजकीय वर्तुळात; तसेच ‘इलेक्टोरल बाँड्स’च्या निमित्ताने गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घेतलेली ‘पुरवणी’ परीक्षा हे अलीकडच्या काळातील न्यायालयाच्या सक्रियतेचे आणखी एक उदाहरण आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन ज्या अवैध खाणींच्या प्रकरणात अटक झाले, त्यातील त्यांचे एक सहकारी प्रेम प्रकाश गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे, काही आरोपींना अटक करायची आहे, असे सांगत ‘ईडी’ने आधी उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा सुनावणीदरम्यान न्या. संजीव खन्ना व न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने संशयितांना तुरुंगात खितपत ठेवण्याच्या ‘ईडी’च्या चलाखीचा पर्दाफाश केला. तपास यंत्रणांची जबाबदारी, तपास व दोषारोपपत्र दाखल करण्याच्या फौजदारी दंडसंहितेमधील तरतुदी तसेच जामीन मिळण्याचे आरोपींचे अधिकार याबाबत न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये ‘ईडी’ची हजेरी घेतली.

महिनोन्महिने तपास सुरू ठेवून पुरवणी दोषारोपपत्रे दाखल करीत जायचे आणि जामीन मिळविण्याच्या संशयितांच्या अधिकारांची पायमल्ली करायची, हे अजिबात चालणार नाही. ठरलेल्या मुदतीत तपास पूर्ण होत नसेल तर तो पूर्ण होईपर्यंत अटकच करू नका, असे सुनावले. सरकारी वकिलांनी त्यावर युक्तिवाद केला, की आरोपींना जामिनावर सोडले तर ते साक्षीदारांवर दबाव आणतील, पुरावे नष्ट करतील. तेव्हा, असे घडले तर जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात येण्याची सुविधा तपास यंत्रणेला उपलब्ध आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वर उल्लेख केलेले प्रेम प्रकाशच नव्हे, तर देशभरातील अनेक बहुचर्चित प्रकरणांमधील आरोपी ‘ईडी’च्या चलाखीमुळे तुरुंगात खितपत आहेत. त्यापैकी दिल्लीच्या मद्य धोरणाशी संबंधित खटल्यात फेब्रुवारी २०२३ पासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा उल्लेखही न्यायालयात झाला. सक्तवसुली संचालनालय किंवा एनफोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात ‘ईडी’ या केंद्रीय तपास यंत्रणेची कामाची पद्धत, विशेषत: मनी लाँड्रिंग प्रकरणांमधील तिचा तपास हा देशातल्या भल्याभल्यांच्या अंगावर काटा आणणारा ठरला आहे. साधारण असे घडते की, ‘ईडी’चे पथक छापा टाकते, संबंधितांना चौकशीसाठी बोलावते, तासनतास बसवून ठेवते.

काहीजण उशिरा ‘ईडी’ कार्यालयातून बाहेर पडल्याचे, तर बहुतेकांना रात्री उशिरा कधीतरी अटक करण्यात आल्याचे अनेक प्रकरणांमध्ये देशाने पाहिले आहे. मनी लाँड्रिंग कायद्यातील काही कलमे अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे जामीन मिळणे सोपे राहत नाही. त्यातच केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच या ना त्यानिमित्ताने या कायद्याखाली अडकविण्यात आल्याचा आणि त्यापैकी काहीजण नंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात गेले की, त्यांची प्रकरणे थंड बस्त्यात टाकल्याचा आरोप सतत होत आला आहे. या पृष्ठभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी महत्त्वाची आहे. फौजदारी दंडसंहितेनुसार, गंभीर प्रकरणामध्ये संशयितांच्या अटकेनंतर तपास पूर्ण करून ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे तपास यंत्रणेवर बंधनकारक आहे. अन्यथा आरोपी जामीन मिळण्यास पात्र ठरतात. ‘ईडी’ने मात्र अत्यंत हुशारीने या नियमातून पळवाट शोधली. डिफाॅल्ट बेलची मुदत संपण्याच्या आत जुजबी दोषारोपपत्र दाखल करून तपास सुरू असल्याचे सांगायचे, नंतर ठराविक कालावधीनंतर एकापेक्षा अनेक पुरवणी दोषारोपपत्रे दाखल करीत जायचे आणि त्याच वेळी संशयितांच्या जामीन अर्जाला अजून तपास पूर्ण झाला नसल्याचे सांगत विरोध करीत राहायचा, अशा आशयाच्या या पळवाटेवर नेमके बोट ठेवून सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या चलाखीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राजकीय कारणांनी म्हणा की अन्य कसे, ‘ईडी’च्या फेऱ्यात अडकलेल्या अनेक नेत्यांचा जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा होऊ शकेल.

आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे तपासासाठी किचकट असतात हे खरे. त्यामुळे त्यांचा तपास तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईलच असे नाही. तथापि, तपासाच्या सुरुवातीलाच संशयितांना अटक करण्याऐवजी तपास आटोक्यात आल्यानंतरच अटकेचा विचार आता ‘ईडी’ला करावा लागेल. पुरवणी दोषारोपपत्रांना पायबंद बसला तर त्या पुरवण्यांमधून हव्या त्या आरोपींची नावे वगळण्याचा, हवी त्यांची नावे वाढविण्याचा प्रकारही कमी होईल. एकूणच आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना थोडी शिस्त लागेल. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे सक्तवसुली संचालनालयाने गंभीरतेने घेतले तरच. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय