शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

आजचा अग्रलेख: चाड की धाक? नव्या विधेयकाने कट्टर विरोधकच नव्हे, तर कडवे समर्थकही बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:14 IST

भारत सर्वांत मोठा लोकशाही देश असला तरी राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन समाप्त होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, कोणाच्या ध्यानीमनी नसताना, राज्यघटना (१३० वी सुधारणा) विधेयक २०२५ सादर करून केंद्र सरकारने केवळ कट्टर विरोधकांनाच नव्हे, तर कडव्या समर्थकांनाही बुचकळ्यात टाकले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी कोणत्याही अशा दाखल अपराधासाठी, ज्यामध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, सलग ३० दिवस कारागृहात घालवल्यास, त्यांना तत्काळ अपदस्थ करण्याची तरतूद या विधेयकात आहे. विरोधी पक्षांनी अशा विधेयकाच्या विरोधात रान माजवणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. प्रस्तावित कायद्याचा दुरूपयोग विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, त्यांची सरकारे अस्थिर करण्यासाठी केला जाईल, अशी भीती त्यांना वाटणारच!

कोणालाही कारागृहातून सरकार चालवण्याची, सरकारमध्ये सहभागी असण्याची मुभा असू नये, यावर वाद होऊ शकत नाही; पण प्रस्तावित कायद्यामुळे केंद्रातील सत्ताधाऱ्यांना कोणत्याही राज्यातील विरोधी पक्षाचे सरकार वाटेल तेव्हा अस्थिर करण्याची संधी उपलब्ध होईल, हेदेखील स्पष्ट आहे. किंबहुना तोच विधेयक आणण्यामागील केंद्र सरकारचा उद्देश आहे, हा विरोधकांचा आक्षेप आहे आणि तो कसा खोडून काढावा, हे सत्ताधाऱ्यांच्या कडव्या समर्थकांनाही अद्याप उमगलेले नाही. प्रदीर्घ काळ कारागृहात असूनही सरकार चालवण्याची आणि मंत्रिमंडळात कायम असण्याची दोन उदाहरणे अलीकडील काळात देशाने अनुभवली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तब्बल पाच महिने कारागृहात असूनही पदाचा त्याग केला नव्हता, तर तामिळनाडूचे माजी मंत्री व्ही. सेन्थिल बालाजी हे दीर्घकाळ कारागृहात असूनही मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांना विनाखात्याचे मंत्री म्हणून कायम ठेवले होते.

भारत सर्वांत मोठा लोकशाही देश असला आणि लोकशाहीची मुळे भारतात खोलवर रुजली असली, तरी राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे, हीदेखील वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्याने कारागृहातून देशाचा किंवा राज्याचा कारभार हाकणे अथवा मंत्र्याने विनाखात्याचा मंत्री म्हणून कारागृहात मिरवणे ही काही आदर्शवत स्थिती म्हणता येत नाही; पण आपल्या देशाला विरोधी पक्षांची राज्य सरकारे अस्थिर करण्याची, राजकीय उट्टे काढण्यासाठी विरोधकांना कारागृहांत डांबण्याची परंपरा लाभली आहे, याकडे डोळेझाकही करता येत नाही. मंत्री कारागृहात जाण्याची आणि तरीही त्यांचे पद कायम राहण्याची उदाहरणे वाढीस लागली, तर जनतेचा लोकशाही मूल्यांवरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही हे खरेच; पण मग ते रोखण्याच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी अधिपत्याखालील तपास संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना कारागृहांत डांबण्याचा आणि अपदस्थ करण्याचा सपाटा लावला तर दुसरे काय होणार? विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कायद्यांचा, तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याची अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. प्रस्तावित कायद्यामुळे त्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हाती आणखी एक आयुध येणार नाही का, असा प्रश्न विरोधकांच्या आणि विचारी नागरिकांच्याही मनात आल्यास नवल नाही. आम्ही कायद्याच्या कक्षेत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश केला आहे, असा युक्तिवाद सत्ताधारी करू शकतात; पण पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री तर सोडाच, केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या साध्या राज्यातील मंत्र्यांच्या विरोधात तरी कारवाई करण्याची केंद्रीय तपास यंत्रणांची मजाल होऊ शकते का? असे एकही उदाहरण नाही. उलट सत्ताधारी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, ते सत्ताधारी पक्षात किंवा आघाडीत आल्यास, त्यांच्या विरोधातील प्रकरणांचा तपास कुर्मगतीने व्हायला लागतो, अशी मात्र अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या युक्तिवादात तसा काही अर्थ नाही. अर्थात, हे विधेयक मंजूर करून घेणे सत्ताधाऱ्यांसाठी सोपे काम नाही. राज्यघटनेशी संबंधित असल्याने ते संसदेच्या दोन्ही सभागृहांत किमान ५० टक्के सदस्यांच्या उपस्थितीत किमान दोन-तृतीयांश बहुमताने पारित व्हावे लागेल. त्यानंतर किमान अर्ध्या राज्यांना विधेयकास स्वीकृती द्यावी लागेल. संसदेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता ते फार कठीण आहे. ही वस्तुस्थिती ज्ञात असूनही, अजिबात वाच्यता न करता, अधिवेशनाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात विधेयक आणण्यामागे सत्ताधाऱ्यांचा उद्देश काय? लोकशाहीची चाड, की विरोधकांना धाक? या प्रश्नांची उत्तरे मिळायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल!

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शाहChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधान