शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सत्तेची शक्यता दुरावल्याने कोमेजले ‘कमळ’!

By यदू जोशी | Updated: July 23, 2021 07:56 IST

बारामतीच्या गाडीत बसायचं की मातोश्रीच्या यावर भाजपमध्ये एकमत नाही. पुन्हा दोन्ही गाडीवाले  बसवून घ्यायला तयार आहेत का, हेही नक्की नाहीच!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांना वन टू वन भेटल्यानंतर भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. “आता सरकार येणार” म्हणून चर्चा झडू लागली. अलीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर भाजपवाल्यांना पुन्हा सत्तेची स्वप्नं पडू लागली. काही तर ठरलंच असेल, उगाच तासभर चर्चा होणार नाही, असा तर्कही दिला गेला. मात्र, दोन्ही भेटींनंतरही राज्यात सत्ता परिवर्तनाच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या वळचणीला लागण्याच्या प्रयत्नात भाजपच्या हाती काहीही लागत नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादीला चिमटे काढतात तेव्हाही कमळ आशेने हसतं. तेच पटोले मग राहुल गांधींना भेटून आल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे टिकणार म्हणतात तेव्हा कमळ कोमेजतं. महाविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त सांगता सांगता थकलेले भाजपचे नेते आता सरकार पाच वर्षे टिकेल, असं खोचकपणे बोलून का होईना, पण आधीच्या दाव्यावर माघार घेताना दिसत आहेत. ईडीच्या चौकशांची झळ सरकार पडण्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. हे सरकार जाईल असा दावा करणारे अनेक जण फिरत असतात; पण “सरकार जाण्याचा फॉर्म्युला कुठला?” असं विचारलं तर त्यांची बोबडी वळते. “तुम्हीच सांगा,” म्हणतात. मोदी-शहांनी जोर लावला नाही म्हणून २०१९ मध्ये सरकार हुकलं; आता त्यांच्या मनात असेल तेव्हाच सरकार येईल, असा शेवटचा आधार काही जण शोधत आहेत.

शिवसेना वा राष्ट्रवादी कुठेही भाजपसोबत जाणार असल्याचं म्हणत नाहीत; पण शिवसेनेला सोबत घ्यायचं की राष्ट्रवादीला यावरून भाजपमध्ये मात्र दोन गट दिसतात. काही जण शिवसेनेशी सलगी करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरे काही नेते शिवसेनेवर असा काही हल्लाबोल करतात की कटुता एकदम वाढते अन् एकत्र येण्याची शक्यता आणखीच मावळते. पक्षात कुणी राष्ट्रवादीशी सलगी करू लागला रे लागला की पक्षातीलच काही नेते राष्ट्रवादीचे वाभाडे काढायला सुरुवात करतात. बारामतीच्या गाडीत बसायचं की मातोश्रीच्या यावर पक्षात एकमत नाही. बरं यापैकी एक निर्णय झाला तरी ते दोन्ही गाडीवाले तुम्हाला बसवून घ्यायला तयार आहेत का हेही नक्की नाही. मित्रांना भाजपचं भय दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची मांड पक्की करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घाऊक निवडणुकांपूर्वी काही बदल झाला नाही, तर शिवसेना-राष्ट्रवादी आपल्याला खाऊन टाकतील, अशी भीती कार्यकर्त्यांना सतावत आहे. 

सरकार पडण्याचं भाकीत वर्तविणाऱ्या नेत्यांची भाऊगर्दी आणि ते पाडण्यासाठीच्या नेत्यांचा पूर्ण अभाव हे भाजपचं दुखणं आहे. पंकजा मुंडे या पक्षासाठी ॲसेट आहेत पण त्यांची समजूत काढली जात नाही. ‘संजय राठोड यांना सरकार का वाचवत आहे?’ असा हल्लाबोल चित्रा वाघ सकाळी करतात  आणि ‘संजय राठोड यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही,’ असं प्रदेशाध्यक्ष दुपारी बोलतात. एकूणच भूमिकांमध्ये स्पष्टतेसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एखादी चिंतन बैठक घेण्याची गरज आहे. बरं! भाजपमध्ये सध्या एका नेत्यासंदर्भात ‘जुही  की कली’ची चर्चा आहे. हा काय विषय आहे? 

न झालेल्या हेरगिरीची गोष्ट

पेगाससची चर्चा सध्या जोरात आहे. त्यानिमित्तानं एक जुनं प्रकरण उगाचच उकरून काढलं जात आहे. देवेंद्र फडणवीस सरकार जाताजाता माहिती व जनसंपर्क विभागाचे पाच अधिकारी इस्रायलला गेले होते.  हेरगिरी कशी करायची, फोन टॅपिंग कसं करायचं याच्या प्रशिक्षणासाठी ते गेले होते अशी आवई उठवली जात आहे. हे लहान अधिकारी आहेत, हेरगिरीसाठी त्यांना पाठवलंच नव्हतं; पण त्यांना शेरलॉक होम्स बनवलं जात आहे. काँग्रेसच्या एका आमदाराच्या अमरावतीतील पंटरला पूर्वी या विभागात मनासारखी कंत्राटं मिळाली नसल्यानं ते अस्वस्थ असून हे कथित प्रकरण गरम करताहेत. कौन्सुलेट जनरल ऑफ इस्रायलच्या निमंत्रणावरून हे अधिकारी नोव्हेंबर २०१९ मध्ये तिकडे गेले होते. शासकीय जनसंपर्कातील नवे प्रवाह, डिजिटल मार्केटिंगच्या साधनांचा वापर, वेब मीडियाचा जनसंवादासाठी वापर असे बाळबोध विषय होते. हेरगिरी, टॅपिंगचा विषय नव्हता; मात्र, कृषी विषयक अभ्यासासाठी हे अधिकारी गेले होते, या देवेंद्र फडणवीस यांच्या परवाच्या विधानानं काँग्रेसला टीकेची संधी दिली आहे. त्या दौऱ्याची तेव्हाच बातमी काढली असती, गुपचूप दौरा केला नसता तर एवढं गूढ वाढलंही नसतं.  यानिमित्तानं अंतर्गत राजकारण, अधिकाऱ्यांमधील हेव्यादाव्यांचे रंगढंगही दिसत आहेत. खोट्या बातम्या पेरत अफवांचं पीक घेणं सुरू आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस