शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

दिलासा आणि फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 6:26 AM

धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले.

मागील एक आठवड्यापासून विदर्भात पावसाचा चांगलाच जोर आहे. धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले. हजारो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. सुरुवातीला दडी मारणाऱ्या पावसाने आता कास्तकाराच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६१ हजार ९३० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर चंद्रपुरात ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. ३०० जनावरे दगावली. ४०० हून अधिक घरांची पडझड झाली. सहा लोक पावसाचे बळी ठरल आहे. तर आशिया खंडातील मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये समावेश होत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाण्याअभावी घरघर लागली होती. आता संततधार पावसामुळे ही काळजी मिटली असली तरी ओल्या कोळशाचे नवीन संकट या प्रकल्पापुढे उभे ठाकले आहे. ही समस्या दर वर्षी निर्माण होत असली तरी वीज केंद्र व्यवस्थापन कोळसा साठवून ठेवण्यासाठी योग्य नियोजन करीत नाही. नऊपैकी सात संचांतून केवळ १२८३ मेगावॅट वीजनिर्मिती सध्या सुरू असल्याने ही बाब राज्याच्या वीज संकटात भर टाकणारी आहे. दुसरीकडे अनेक प्रकल्प १०० टक्के भरले असून काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. पावसामुळे संकटातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसून उलट पिकांना संजीवनी मिळाली आहे. हजारो हेक्टर धान शेतीला या पावसाने तारले आहे. त्यामुळे या भागातील कास्तकार सुखावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हा पाऊस लाभदायी ठरला आहे तर दक्षिण गडचिरोलीमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले. त्यामुळे धानासह कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने परिवहनाची समस्या निर्माण झाली. मागील तीन दिवसांपासून येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. आता झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण होण्याची वाट शेतकरी बघत आहेत. शासनाच्या मदतीचीही त्याला आस आहे. मात्र नेहमीप्रमाणे त्याला ती मिळेल की नाही, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भFarmerशेतकरी