शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
4
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
5
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
6
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
7
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
8
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
9
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
10
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
11
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
12
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
13
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
14
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
15
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
16
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
17
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
18
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
19
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
20
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : धक्का : भाजप संघाला शरण जाईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 09:52 IST

Lok Sabha Election Result 2024 : राक्षसी बहुमत मिळविण्याच्या लालसेने भाजपच्या प्रतिमेचा बळी देण्यात आला, याबद्दल संघ नाखुश आहे.

- हरीश गुप्ता(नॅशनल एडिटर, नवी दिल्ली)

लोकसभा सभागृहात बहुमतासाठी आवश्यक २७२ हा आकडा भाजपला गाठता आला नाही याचा मोदीभक्तांना धक्का बसला असेल. मात्र, संघपरिवारातील अनेकांना  वाटते की, भाजप नेतृत्वालाच यासाठी जबाबदार धरले पाहिजे. संघाने प्रारंभीच्या काळात दिलेल्या सल्ल्यांकडे भाजपने दुर्लक्ष केले. ग्रामीण भागात असंतोष आहे, तिथे परिस्थिती फारशी चांगली नाही याकडे लक्ष वेधून याविषयी तत्काळ काहीतरी केले पाहिजे असा सल्ला संघाने दिला होता. परंतु, भाजपचे नेते आपल्याच विश्वात गुंग होते. २००४ साली अटल बिहारी वाजपेयी ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेवर स्वार झाले आणि अगदी थोडक्या जागांनी त्यांची गाडी हुकली होती. २० वर्षांनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने वधारलेल्या शेअर बाजारावर भरवसा ठेवून नेमकी तीच चूक केली. ‘अब की बार चारसो पार’चा नारा देण्याच्या भरात पक्षाच्या राज्य नेत्यांच्या म्हणण्याकडे शीर्षस्थ नेतृत्वाने लक्ष दिले नाही. जिल्हापातळीवर नेमलेल्या संघाच्या प्रचारकांना तिकीट वाटपाच्या  प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपमध्ये बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातले डागाळलेले नेते पक्षात घेण्याचा सपाटा लावल्याबद्दलही संघाच्या नेतृत्वाने चिंता व्यक्त केली होती. राक्षसी बहुमत मिळविण्याच्या लालसेने पक्षाच्या प्रतिमेचा बळी देण्यात आला. या गदारोळात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ‘भाजपला प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. आता पक्ष मोठा आणि सक्षम झाला आहे, स्वबळावर कारभार करू शकतो!’- यापुढे आम्हाला आमचे राजकारण करू द्या. प्रचारकांच्या सल्ल्याची आता गरज नाही, असेच त्यांना स्पष्टपणे सुचवायचे होते. संघपरिवारातील अंतस्थ सूत्रे सांगतात, की निर्णय प्रक्रियेत भाजपच्या शीर्ष नेत्यांना कोणाची लुडबुड नको आहे. भाजपसाठी संघ वैचारिक गुरुस्थानी राहील, परंतु रोजच्या कामकाजात तो नको!- त्यामुळेच संघ स्वयंसेवकांनी यावेळी पुढाकार घेऊन कोणतेही काम केले नाही म्हणतात. उमेदवार निवडीसह इतर अनेक कामांपासून स्वयंसेवक दूर राहिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर उभयतांच्या नातेसंबंधाचे काय होणार?- हे अद्याप ठरायचे आहे.

या निवडणूक निकालाने सर्वांनाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे.  आतातरी पक्षात आपले  ऐकले जाईल असे वाटू लागल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुखावले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही बरे वाटत असावे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत त्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. भाजपला आता आघाडीचा धर्म पाळावा लागेल म्हणून मित्रपक्षही खुशीत आहेत. काँग्रेसमध्ये खुशीचे वातावरण असण्याचे कारण पक्ष राजकीय पटलावर प्राधान्याने झळकला आहे. राहुल गांधी यांचा प्रभावही यातून सिद्ध झाला आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते कारागृहात आहेत. त्यांनाही आता दैवी न्याय मिळण्याची आशा ठेवता येईल. पंजाबातील अकाली दलासारखे प्रादेशिक पक्ष भाजपने दडपून टाकले होते, त्यांनाही आता ‘अच्छे दिन’  येतील असे वाटू लागले आहे. हरयाणा आणि इतर काही राज्यांतही अशीच स्थिती आहे. बाकी काही असो, या निवडणुकीत अंतिमत: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जिंकले आहे. या यंत्रावरचे सर्व आरोप एका फटक्यात धुतले गेले!    

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल