शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा

By यदू जोशी | Published: April 06, 2024 9:53 AM

Amravati lok sabha constituency: अमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा.

 - यदु जोशीअमरावतीच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे सुदाम देशमुख. ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते, त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले. आयुष्यभर फकिरी वृत्तीने जगले. पँट-शर्ट अन् चप्पल असा वेश होता. मनाला भिडणारे भाषण करत. लहेजा बराचसा वऱ्हाडी असायचा. समाज प्रबोधनाच्या चळवळीत संत गाडगेबाबांनी जे केले तेच निरपेक्ष भावनेने राजकारणही करता येते हे काकांनी कृतीतून सिद्ध केले. कितीही सत्तापदे मिळाली तरी अभावात जगणे हा त्यांचा स्थायिभाव होता. दोन वेळा अचलपूरचे आमदार होते. 

१९८९ ची लोकसभा निवडणूक लागली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या उषाताई चौधरी रिंगणात होत्या. इतर सर्वपक्षीयांनी (त्यात काही काँग्रेस नेतेही होते) सुदामकाकांना गळ घातली; तुम्ही लढले पाहिजे. ते उभे राहिले आणि फाटक्या माणसांपासून सगळ्यांनी आपणच उमेदवार असल्याचे मानून ती निवडणूक लढवली. काकांजवळ पैसे होते कुठे? रिक्षावाले, भाजीवाले, हातठेलेवाल्यांपासून सगळ्यांनी दोन रुपये, पाच रुपये गोळा करून निवडणूक निधी उभा केला. आज ज्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक पैसा वाटतात अशा गरिबांनी काकांसाठी पैसा उभा केला. प्रचारात फारशा गाड्या वगैरे नसायच्या; पण काकांच्या प्रचारातील गाडी पेट्रोलपंपावर आली की बिनापैशांनी टंकी फुल व्हायची. काही दुकानदार ग्राहकाला बदाम खायला द्यायचे अन् म्हणायचे, ‘खाओ बदाम, लाओ सुदाम.’ हयातभर रस्त्यावरची लढाई लढलेल्या या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा सामान्य माणूस हाच स्टार प्रचारक होता. काका कम्युनिस्ट पक्षाचे होते; पण कोणीही त्यांचा पक्ष पाहिला नाही, जात विचारली नाही. प्रभाकरराव वैद्य, बाळासाहेब मराठे अशा अमरावतीतील पितृतुल्य व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत मतदारसंघातील भिंतींवरचा एक नारा आजही अमरावतीकरांच्या लक्षात आहे, ‘तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा.’

साधेपणा, त्याग, नैतिकता हे काकांसाठी बोलण्याचे नाही तर कृतीचे विषय होते. ते अनवाणी फिरत, मग कोणी तरी त्यांना स्लिपर, चप्पल घेऊन देई. मग कोणी अनवाणी दिसला की काका त्यांना चप्पल देऊन टाकत. अखंड समाजसेवेला वाहून घेतलेल्या या नेत्याला लोक विचारायचे, ‘काका! तुम्ही लग्न का नाही केले?’ काका म्हणायचे, ‘अरे बेटा, कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिले.’ अमरावतीत नमुना गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहायचे. तिथेच सगळ्यांना भेटायचे, कोणताही आडपडदा नव्हता, सामान्य रिक्षावालाही त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलू शकत असे, आजच्या नेत्यांकडे पाहून हे सगळे खरे वाटणार नाही. लोकसभेला ते १ लाख ४० हजार २३९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्यांच्या विजयी मिरवणुकीत लोकांनी आपापल्या परीने गोडधोड वाटले, सुदाम्याचे पोहे अन् साखरही वाटली. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

सुदामकाकांच्या ठायी पारदर्शकता किती असावी? त्यावेळी खासदारांना दहा गॅस कनेक्शन आणि दहा टेलिफोन कनेक्शन वाटण्याचा कोटा दिला जायचा. सुदामकाकांनी आपलातुपला न करता त्यांच्याकडे ते मागण्यासाठी आलेल्या लोकांची निवड ईश्वरचिठ्ठीने केली. स्वत:साठी काहीही ठेवून घेतले नाही. सामान्यांशी कधीही नाळ तुटू न देणाऱ्या या सत्शील नेत्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, पण ते गेले त्या दिवशी लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी होते, हीच त्यांची कमाई होती.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४amravati-pcअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४