शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिवाला धोका!

By admin | Updated: January 18, 2016 00:12 IST

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. राजधानीत हिवाळ्यात हवेमध्ये कर्करोगाला चालना देणाऱ्या अतिसूक्ष्म धातूकणांचे प्रमाण प्रचंड असल्याचे ग्रीनपीसने केलेल्या शास्त्रीय अभ्यासात आढळून आले आहे. हवेत उडत असलेल्या, २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या अतिसूक्ष्म कणांना ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ या लघु नावाने ओळखले जाते. या कणांमध्ये नेमके कोणते घटक असतात याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी दिल्लीतील विविध शाळांमधील वर्गखोल्यांमधील संगणकांच्या पडद्यांवरील नमुने घेण्यात आले. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार वर्गखोल्यांमधील हवा भारतीय सुरक्षा मानकांच्या तुलनेत पाचपट, तर जागतिक आरोग्य संघटनेद्वारा निर्धारित मानकांच्या तुलनेत तब्बल अकरापट घातक आढळली! नमुन्यांमध्ये आर्सेनिक, शिसे, निकेल, मँगनिज, क्रोमियम आणि कॅडमियम या जड धातूंचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचे या अभ्यासातून निष्पन्न झाले. ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ कण फुफ्फुसांमध्ये शिरतात आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. एवढेच नव्हे तर हे कण धमन्यांच्या आतमध्ये प्रवेश करून तिथे तळ ठोकतात आणि त्यामुळे धमन्या ताठर होऊन ह्वदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. या कणांपैकी शिसे आणि मँगनिजच्या कणांमुळे मुलांचा विकास खुंटतो, तर आर्सेनिक, निकेल, क्रोमियम आणि कॅडमियमच्या कणांमुळे कर्करोगाला चालना मिळते. या अतिसूक्ष्म कणांमुळे एकट्या अमेरिकेत इसवी सन २००० पासून दरवर्षी किमान २२ हजार ते ५२ हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. भारतातील हा आकडा निश्चितच किती तरी मोठा असेल. हे कण हवेत मिसळतात तरी कसे, या प्रश्नाचे उत्तर आहे खनिज तेल व कोळशाचे ज्वलन! वीज निर्मितीसाठी भारत विकसित देशांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात कोळशाचे ज्वलन करतो आणि प्रचंड लोकसंख्या व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी भारतातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले म्हणजे भारतीयांचा जीव किती मोठ्या संकटात आहे, हे सहज ध्यानात यावे!