शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठेचा दीपस्तंभ निमाला

By admin | Updated: November 25, 2014 00:14 IST

मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला.

मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला. वाजली तर निष्ठा आणि मोडली तर बंडाळी, अशा बदललेल्या राजकारणातही निष्ठेची ज्योत प्रज्वलित ठेवणारा दीपस्तंभ निमाला. विद्वेषाला थारा न देणारा संयमी, मृदुभाषी नेता गेला. सुसंवादाचा पूल बांधण्याचे व्रत घेतलेला एक दिलदार यजमान अनंतात विलीन झाला. मुंबईसारख्या मायानगरीने तिचा एक अनभिषिक्त राजा गमावला. एका व्यक्तीच्या जाण्याने इतके सारे होणो, ही त्या व्यक्तीच्या बहुआयामी महतीची साक्ष आहे. मुंबईवर दीर्घकाळ आपला प्रभाव ठेवणा:या मोजक्या नेत्यांच्या मांदियाळीत मुरली देवरा यांचे स्थान अढळ होते. काँग्रेसपुरता विचार करावयाचा झाल्यास स. का. पाटील आणि रजनी पटेल यांच्यानंतर मुंबईवर देवरा यांच्याइतकी पकड अन्य कोणत्याही नेत्याला ठेवता आली नाही. 1981 पासून 2क्क्3 सालार्पयत तब्बल 22 वर्षे ते मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. ते किती वर्षे या पदावर राहिले, याच्या बरोबरीने त्या काळातील राजकीय संक्रमणही तितकेच महत्त्वाचे आहे. आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता राजवटीचा अस्त करताना इंदिरा गांधी यांचे नेतृत्व नव्या तेजाने तळपले. त्यानंतर अल्पावधीतच देवरा यांचा मुंबईच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. तेव्हा मिळालेले स्थान त्यांनी अढळपदासारखे निगुतीने जपले आणि जोपासले. दिल्लीपासून गल्लीर्पयत सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांनी ठेवलेले संबंध त्यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा पोत दाखवीत राहिले. संघर्षापेक्षा समन्वयावर अधिक भर देणा:या या नेत्याने यथावकाश जगभरातील अनेक देशांत सुहृद मिळविले. त्यांना मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले तेव्हा ते लोकप्रतिनिधीही नव्हते. किंबहुना 1978ची विधानसभा आणि 198क्ची लोकसभा निवडणूक त्यांना पराभवाची चव चाखवून गेली होती. पुढे देशाचे राजकारण मंडल आणि कमंडलूने ढवळून काढल्याच्या काळात ते अनेकदा लोकसभेवर निवडून गेले. 199क्च्या दशकात दोन निवडणुकांत विजयाने त्यांना हुलकावणी दिल्यानंतर ते सार्वत्रिक निवडणुकांपासून दूर राहिले. पण त्यांचे राजकीय व्यक्तित्व जय अथवा पराजयाच्या तागडीत तोलण्याच्या पलीकडचे होते. जयाचा उन्माद नाही, पराभवाने खचणो नाही, अशी विलक्षण स्थितप्रज्ञता कमावलेल्या या नेत्याने आपले अवघे आयुष्य काँग्रेसला वाहिले होते. स्निग्धता आणि कठोरता यांच्या संतुलनातून साकारलेल्या त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानेही अव्याहत विश्वास दाखविला. नेहरू-गांधी घराण्याच्या नावाचा जप करण्यापेक्षा आपली निष्ठा ते कृतीतून व्यक्त करीत राहिले. काँग्रेसची शताब्दी मुंबईत भव्य स्वरूपात साजरी करताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांच्याकडून विशेष पॅकेज मिळविले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे संपूर्ण परिवारासहित हजर राहणो, ही देवरांच्या वादातीत निष्ठेला मिळालेली मानवंदना आहे. देवरांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असे अनेकानेक भिन्न प्रकृतीचे मुख्यमंत्री झाले. त्या कोणाशीही देवरांचा संघर्ष झाला नाही. किंबहुना त्यांनी काँग्रेसचे हित प्रधान मानून त्यात तडजोड न करता व्यापक हितासाठी आवश्यक असलेली समन्वयाची पूरक भूमिका निभावली. उद्योगपतींपासून मुंबईच्या एखाद्या मोहल्ल्यातल्या दरिद्रीनारायणार्पयत कोणीही त्यांच्यार्पयत पोहोचू शकत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे आणि काँग्रेसचे मुंबईतील राजनैतिक दूत ही त्यांची ओळख बनली. संसदीय पातळीवरील चर्चासत्रंपासून मुंबईच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून मोठे अर्थसाह्य मिळविण्यार्पयत अनेक पातळ्य़ांवर ते प्रभावी कार्य करीत राहिले. प्रसारमाध्यमांमधील वार्ताहरापासून संपादक आणि मालकार्पयत स्नेहपूर्ण संबंध असतानाही ते प्रसिद्धीच्या आहारी गेले नाहीत. पत्नी हेमा यांचे मराठीपणही त्यांनी मनस्वीपणो जपले. त्यांचे आयुष्य जगण्याला अर्थ देणारे होते. 
मरणं प्रकृति: शरीरिणां, विकृति: जीवनम् उच्यते बुधै:
मरण ही प्रकृती आहे आणि जगणो ही असाधारण गोष्ट आहे, हा रघुवंशातील सिद्धांत त्यांनी आचरणात आणला, हीच त्यांची महती.