शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

राजा एक घर मागं घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:43 IST

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे.

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे. केंद्रात भरभक्कम बहुमताची सत्ता प्राप्त केलेल्या भाजपाने नारायण राणे, रामदास आठवले व विनायक मेटे या रालोआतील घटक पक्षाच्या नेत्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभेत धाडले. यापूर्वी रासपाचे महादेव जानकर यांनाही त्यांनी भाजपाच्या वतीने विधान परिषद दाखवली. मात्र यावेळी जानकर यांनी रासपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे जानकर यांच्यावरील दबाव वाढवण्याकरिता भाजपाने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज भरून ठेवला होता. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या या समाजाची आणखी नाराजी ओढवून घेऊ नये याकरिता जानकर यांचा हट्ट भाजपा नेतृत्वाने मान्य केला. यापूर्वी मातोश्रीची पायरी न चढणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. त्यामुळे आता खरोखरच राजा एक घर किंवा वेळप्रसंगी अडीच घरे मागे घेण्याची वेळ आली आहे हे भाजपाच्या चाणाक्ष नेतृत्वाने ओळखले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक छोट्या, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व बहुमताच्या ऐरावताच्या पायी चिरडले जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आता मूठभर ताकद असलेले छोटे पक्ष भाजपाच्या ऐरावताला आपल्या तालावर नाचवू शकतील, याची ही चुणूक आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे नीलय नाईक यांना मिळालेली संधी ही बंजारा समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष ठेवून दिली आहे. नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना आमदारकी देण्यामागे नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी दोन हात करण्याकरिता ताकद देणे हाच उद्देश आहे. शिवसेनेनी अलीकडेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस या ज्येष्ठ शिवसैनिकाला आमदारकी दिली. रातोळीकर अथवा पोतनीस अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच येणाऱ्या निवडणुका भाजपा, शिवसेनेला लढवायच्या असल्याने आतापर्यंत आयारामांकरिता लाल गालिचे अंथरणाºया सत्ताधारी पक्षाने आता कार्यकर्ता हा सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, याचा विचार गांभीर्याने केल्याचे हे संकेत आहेत. भाई गिरकर व अनिल परब यांना भाजपा, शिवसेना या पक्षांनी पुन्हा संधी देण्यामागे वेगवेगळे जातीसमूह सोबत राखणे व त्यांची सभागृहातील कामगिरी हीच कारणे आहेत. यापूर्वी भाजपामध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेल्या व अल्पावधीत शिवसेनेत बस्तान बसवून आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यात यशस्वी झालेल्या मनीषा कायंदे यांना प्रभावी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शेकापचे जयंत पाटील हे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकृतपणे राष्ट्रवादी सोबत होते. मात्र डावखरे यांच्याशी त्यांचे सौहार्द सर्वश्रुत आहे. याच आपल्या राजकीय चातुर्यावर पाटील यांनी पुन्हा सहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा बंदोबस्त केला आहे. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत सर्वाधिक २३ जागा प्राप्त करणारा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवसेना व दोन अपक्ष यांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ ३८ झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, लोकभारती, रिपाइं (कवाडे गट) आणि अपक्ष यांचे संख्याबळ ४० आहे. विधानसभेच्या निवडणुका जेमतेम वर्ष-दीड वर्षांवर येऊनही सत्ताधारी पक्षाला ज्येष्ठांच्या सभागृहात बहुमत प्राप्त करता आलेले नाही. अलीकडेच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पानिपताच्या लढाईचे स्वरूप का प्राप्त झाले, त्याचे गमक या बहुमताच्या गणितात दडले आहे. सरकारची काही विधेयके विधान परिषदेत विरोधकांनी रोखली. ती पुन्हा विधानसभेत मांडून मंजूर करवून घेण्याचा द्राविडीप्राणायम करावा लागला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे निर्णय घेताना सत्ताधारी घायकुतीला येतील, अशावेळी संख्याबळ हा कळीचा मुद्दा ठरतो. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला उपसभापतिपद बहाल करून राजा आणखी एक घर मागे घेतला जाईल, हाच या निवडणुकीचा संदेश म्हणावा लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण