शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राजा एक घर मागं घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:43 IST

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे.

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे. केंद्रात भरभक्कम बहुमताची सत्ता प्राप्त केलेल्या भाजपाने नारायण राणे, रामदास आठवले व विनायक मेटे या रालोआतील घटक पक्षाच्या नेत्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभेत धाडले. यापूर्वी रासपाचे महादेव जानकर यांनाही त्यांनी भाजपाच्या वतीने विधान परिषद दाखवली. मात्र यावेळी जानकर यांनी रासपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे जानकर यांच्यावरील दबाव वाढवण्याकरिता भाजपाने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज भरून ठेवला होता. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या या समाजाची आणखी नाराजी ओढवून घेऊ नये याकरिता जानकर यांचा हट्ट भाजपा नेतृत्वाने मान्य केला. यापूर्वी मातोश्रीची पायरी न चढणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. त्यामुळे आता खरोखरच राजा एक घर किंवा वेळप्रसंगी अडीच घरे मागे घेण्याची वेळ आली आहे हे भाजपाच्या चाणाक्ष नेतृत्वाने ओळखले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक छोट्या, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व बहुमताच्या ऐरावताच्या पायी चिरडले जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आता मूठभर ताकद असलेले छोटे पक्ष भाजपाच्या ऐरावताला आपल्या तालावर नाचवू शकतील, याची ही चुणूक आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे नीलय नाईक यांना मिळालेली संधी ही बंजारा समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष ठेवून दिली आहे. नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना आमदारकी देण्यामागे नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी दोन हात करण्याकरिता ताकद देणे हाच उद्देश आहे. शिवसेनेनी अलीकडेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस या ज्येष्ठ शिवसैनिकाला आमदारकी दिली. रातोळीकर अथवा पोतनीस अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच येणाऱ्या निवडणुका भाजपा, शिवसेनेला लढवायच्या असल्याने आतापर्यंत आयारामांकरिता लाल गालिचे अंथरणाºया सत्ताधारी पक्षाने आता कार्यकर्ता हा सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, याचा विचार गांभीर्याने केल्याचे हे संकेत आहेत. भाई गिरकर व अनिल परब यांना भाजपा, शिवसेना या पक्षांनी पुन्हा संधी देण्यामागे वेगवेगळे जातीसमूह सोबत राखणे व त्यांची सभागृहातील कामगिरी हीच कारणे आहेत. यापूर्वी भाजपामध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेल्या व अल्पावधीत शिवसेनेत बस्तान बसवून आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यात यशस्वी झालेल्या मनीषा कायंदे यांना प्रभावी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शेकापचे जयंत पाटील हे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकृतपणे राष्ट्रवादी सोबत होते. मात्र डावखरे यांच्याशी त्यांचे सौहार्द सर्वश्रुत आहे. याच आपल्या राजकीय चातुर्यावर पाटील यांनी पुन्हा सहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा बंदोबस्त केला आहे. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत सर्वाधिक २३ जागा प्राप्त करणारा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवसेना व दोन अपक्ष यांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ ३८ झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, लोकभारती, रिपाइं (कवाडे गट) आणि अपक्ष यांचे संख्याबळ ४० आहे. विधानसभेच्या निवडणुका जेमतेम वर्ष-दीड वर्षांवर येऊनही सत्ताधारी पक्षाला ज्येष्ठांच्या सभागृहात बहुमत प्राप्त करता आलेले नाही. अलीकडेच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पानिपताच्या लढाईचे स्वरूप का प्राप्त झाले, त्याचे गमक या बहुमताच्या गणितात दडले आहे. सरकारची काही विधेयके विधान परिषदेत विरोधकांनी रोखली. ती पुन्हा विधानसभेत मांडून मंजूर करवून घेण्याचा द्राविडीप्राणायम करावा लागला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे निर्णय घेताना सत्ताधारी घायकुतीला येतील, अशावेळी संख्याबळ हा कळीचा मुद्दा ठरतो. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला उपसभापतिपद बहाल करून राजा आणखी एक घर मागे घेतला जाईल, हाच या निवडणुकीचा संदेश म्हणावा लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण