शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

राजा एक घर मागं घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:43 IST

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे.

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे. केंद्रात भरभक्कम बहुमताची सत्ता प्राप्त केलेल्या भाजपाने नारायण राणे, रामदास आठवले व विनायक मेटे या रालोआतील घटक पक्षाच्या नेत्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभेत धाडले. यापूर्वी रासपाचे महादेव जानकर यांनाही त्यांनी भाजपाच्या वतीने विधान परिषद दाखवली. मात्र यावेळी जानकर यांनी रासपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे जानकर यांच्यावरील दबाव वाढवण्याकरिता भाजपाने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज भरून ठेवला होता. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या या समाजाची आणखी नाराजी ओढवून घेऊ नये याकरिता जानकर यांचा हट्ट भाजपा नेतृत्वाने मान्य केला. यापूर्वी मातोश्रीची पायरी न चढणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. त्यामुळे आता खरोखरच राजा एक घर किंवा वेळप्रसंगी अडीच घरे मागे घेण्याची वेळ आली आहे हे भाजपाच्या चाणाक्ष नेतृत्वाने ओळखले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक छोट्या, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व बहुमताच्या ऐरावताच्या पायी चिरडले जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आता मूठभर ताकद असलेले छोटे पक्ष भाजपाच्या ऐरावताला आपल्या तालावर नाचवू शकतील, याची ही चुणूक आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे नीलय नाईक यांना मिळालेली संधी ही बंजारा समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष ठेवून दिली आहे. नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना आमदारकी देण्यामागे नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी दोन हात करण्याकरिता ताकद देणे हाच उद्देश आहे. शिवसेनेनी अलीकडेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस या ज्येष्ठ शिवसैनिकाला आमदारकी दिली. रातोळीकर अथवा पोतनीस अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच येणाऱ्या निवडणुका भाजपा, शिवसेनेला लढवायच्या असल्याने आतापर्यंत आयारामांकरिता लाल गालिचे अंथरणाºया सत्ताधारी पक्षाने आता कार्यकर्ता हा सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, याचा विचार गांभीर्याने केल्याचे हे संकेत आहेत. भाई गिरकर व अनिल परब यांना भाजपा, शिवसेना या पक्षांनी पुन्हा संधी देण्यामागे वेगवेगळे जातीसमूह सोबत राखणे व त्यांची सभागृहातील कामगिरी हीच कारणे आहेत. यापूर्वी भाजपामध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेल्या व अल्पावधीत शिवसेनेत बस्तान बसवून आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यात यशस्वी झालेल्या मनीषा कायंदे यांना प्रभावी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शेकापचे जयंत पाटील हे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकृतपणे राष्ट्रवादी सोबत होते. मात्र डावखरे यांच्याशी त्यांचे सौहार्द सर्वश्रुत आहे. याच आपल्या राजकीय चातुर्यावर पाटील यांनी पुन्हा सहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा बंदोबस्त केला आहे. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत सर्वाधिक २३ जागा प्राप्त करणारा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवसेना व दोन अपक्ष यांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ ३८ झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, लोकभारती, रिपाइं (कवाडे गट) आणि अपक्ष यांचे संख्याबळ ४० आहे. विधानसभेच्या निवडणुका जेमतेम वर्ष-दीड वर्षांवर येऊनही सत्ताधारी पक्षाला ज्येष्ठांच्या सभागृहात बहुमत प्राप्त करता आलेले नाही. अलीकडेच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पानिपताच्या लढाईचे स्वरूप का प्राप्त झाले, त्याचे गमक या बहुमताच्या गणितात दडले आहे. सरकारची काही विधेयके विधान परिषदेत विरोधकांनी रोखली. ती पुन्हा विधानसभेत मांडून मंजूर करवून घेण्याचा द्राविडीप्राणायम करावा लागला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे निर्णय घेताना सत्ताधारी घायकुतीला येतील, अशावेळी संख्याबळ हा कळीचा मुद्दा ठरतो. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला उपसभापतिपद बहाल करून राजा आणखी एक घर मागे घेतला जाईल, हाच या निवडणुकीचा संदेश म्हणावा लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण