शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 04:58 IST

कर्नाटकात जातीय आणि धार्मिक धु्रवीकरणाने एक प्रकारची अस्थिरता वाढीस लागली आहे.

कर्नाटकच्या राजकारणाला लागलेल्या अस्थिरतेच्या ग्रहणावर मात करत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २२४ सदस्यांच्या सभागृहात एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापन करण्याचा अट्टाहास करून पाहिला. १०५ सदस्यांवरून त्यांचा आकडा १०८ वरच थांबला. हा पराभव दिसताच मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तिसऱ्याच दिवशी राजीनामा दिला होता. काँग्रेसकडे ऐंशी सदस्य होते. त्यांना जनता दलाचा पाठिंबा हवा होता किंवा जनता दलास पाठिंबा देणे क्रमप्राप्त होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जनता दलास पाठिंबा देऊन आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, या आघाडीत समन्वय नव्हता. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हा पाठिंबा पचनी पडलेलाच नव्हता. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकात एकतर्फी विजय मिळविला. जनता दलास एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला एकच जागा मिळाली. यातून आघाडीमध्ये धुसफुस वाढतच राहिली. त्यातून काँग्रेस आणि जनता दलाच्या १७ आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला. आघाडीचे सरकार अल्पमतात आले. आमदारांच्या राजीनाम्याने सभागृहाची सदस्यसंख्या कमी झाली. त्या जोरावर भाजपने सरकार स्थापन केले. दरम्यान, पोटनिवडणुका जाहीर झाल्या. १५ पैकी १२ ठिकाणी राजीनामे दिलेल्या आमदारांनाच भाजपने उमेदवारी दिली. ते सर्व विजयीसुद्धा झाले. १०५ अधिक १२ आमदारांसह भाजपने विधानसभेत आता स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

कर्नाटकात जातीय आणि धार्मिक धु्रवीकरणाने एक प्रकारची अस्थिरता वाढीस लागली आहे. बहुसंख्याक लिंगायत समाज भाजपकडे, दक्षिण कर्नाटकातील वक्कलिगा समाज जनता दलाकडे आणि उर्वरित समाजातील बहुसंख्याक काँग्रेसकडे, असे झाले आहे. परिणामी, स्पष्ट बहुमतासाठी एकाही पक्षाला सर्व समाजघटकांचा पाठिंबा आणि कर्नाटकच्या सर्व विभागात यश मिळत नाही. नेत्यांवरही समाजाचे पडलेले शिक्के गडद झाले आहेत. संघ परिवाराने हिंदुत्वाचा प्रयोग करीत कर्नाटकात मोठ्या प्रमाणात धु्रवीकरण घडवून आणले आहे. मात्र येडीयुरप्पा यांचे नेतृत्व सर्वांना पसंत पडत नाही. ही बाब भाजपला बहुमतापर्यंत पोहोचण्यास अडथळा ठरते. येडीयुरप्पा यांची लोकप्रियता नाकारता येत नसल्याने भाजपला पर्यायही नाही. काँग्रेस आणि जनता दल आघाडीतील धुसफुस पाहता हेच घडणार होते.

आमदारांमध्येही नाराजी वाढत होती, याची नोंद दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने घेतली नाही. पक्षांतरबंदीची भीती दाखवून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंडखोर आमदारांनी राजीनामे देऊन त्यावर मात केली. भाजपला लोकसभा निवडणुकीत कौल देणाºया मतदारांनी या बंडखोरांना पुन्हा निवडून देऊन फोडाफोडीच्या राजकारणाला बेदखल केले. भाजप सत्तेवर होता आणि त्याला बहुमतासाठी केवळ सहाच आमदारांची गरज होती. या सर्व १५ जागा जिंकून पुन्हा बहुमत मिळविण्यासाठी काँग्रेस आणि जनता दलाची आघाडीही राहिली नाही. या पक्षांनी आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, नीट कारभार केला नाही. शिवाय पोटनिवडणुकीत एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केल्याने मतदारांना भाजपला विजयी करण्यावाचून पर्याय उरला नव्हता. जे नैसर्गिक आहे, तेच घडते, असेच राजकारण झाले. सत्ता, संपत्ती आणि जातीय समीकरणाचा वापर वगैरे आरोप झूठ आहेत.

काँग्रेस आणि जनता दलाची आघाडी असती, तर पोटनिवडणुकीत मतदारांपुढे पर्याय तरी उपलब्ध झाला असता. भाजपच्या विजयाची पेरणीच या दोन्ही पक्षांनी केली होती. त्यातून उत्तम पीक बहरले आणि येडीयुरप्पा यांना पूर्ण बहुमतासह सत्तेवर राहण्याचा मार्गही सुकर करून दिला गेला. भाजपच्या या यशाचे श्रेय सिद्धरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी यांनाच जाते. असे असले तरी व्यक्ती श्रेष्ठ की पक्ष श्रेष्ठ हा मुद्दाही या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चर्चेला आला आहे. कारण गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर या १५ जणांना मतदारांनी निवडून दिले होते. याच आमदारांनी पक्ष बदलून उमेदवारी मिळविली आणि ते पुन्हा निवडून आले. उमेदवार निवडून देताना पक्षाबरोबरच उमेदवार कोण आहे, याचाही विचार मतदार करतो असे म्हटले जाते. मग मतदारांनी या सर्वांना पक्षाकडे बघून मते दिली म्हणायचे की त्यांच्या कर्तृत्वाकडे?

गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आमदारांनी आता पक्ष बदलून भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळविला. उमेदवार निवडून देताना मतदारांनी या सर्वांना पक्षाकडे बघून मते दिली म्हणायचे की त्यांच्या कर्तृत्वाकडे ?

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी