शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

अहंकाराचा परिणाम शेवटी मुलांवरच होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 6:23 AM

लहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. 

- परेश देसाईलहान मुलांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कुटुंबातील असंतोष, आईवडिलांमधील वाद हेही त्यामागील कारण आहे. वाद हे अहंकारातूनच येतात़ त्यामुळे आईवडिलांनी अहंकार बाजूला ठेवला तरच अशा घटना टाळता येऊ शकतात. कारण कौटुंबिक वादात सर्वांत जास्त जर कोणी भरडला जात असेल तर ती आहेत निष्पाप मुले. त्यांना आपले आईवडील दोन्ही हवेसे वाटतात. परंतु फक्त आपल्या अहंकारासाठी मुलांना आई किंवा वडिलांपासून दूर ठेवणे योग्य वाटते. वाद कौटुंबिक न्यायालयात गेल्यावर पहिला विषय न्यायालयासमोर मुलांच्या भेटण्याचा अधिकार व मुलांच्या पोटगीचा येतो.ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा असतो म्हणजेच जो पक्षकार मुलांचा संरक्षक आहे़, तो गैरसंरक्षक म्हणजे ज्या पक्षकाराकडे मुलांचा ताबा नसतो त्याला मुलांना भेटण्याचा अधिकार देण्यास सुरुवातीपासून नकार देतो. त्यानंतर गैरसंरक्षक पक्षकार मुलांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी न्यायालयात मानसशास्त्रज्ञांच्या तपासासाठी अडथळा आणतात. मुलांना न्यायालयाच्या बाल संकुलात भेटण्यात विरोध करतात. मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अडी करतात.जर आपण मानसोपचार तज्ज्ञांचे मत मानले तर विभक्त आई-वडिलांचा सर्वांत जास्त मानसिक परिणाम मुलांवर होतो. मुलं हिंसक होऊ शकतात, मुलं उदास होऊ शकतात, ती अलिप्त राहू लागतात, ती सामाजिक होण्यास घाबरतात, त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. हे सर्व परिणाम मुलांच्या वाढीस मारक आहेत. याचा सर्व विभक्त आई-वडिलांनी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.आज आंतरराष्ट्रीय मूल अपहरण प्रकरण भारतात एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्याला कारण परदेशात जर त्या देशाच्या मुलांना बेकायदेशीर / किंवा गैरसंरक्षक पालकांपासून त्याच्या संमतीविना भारतात आणले किंवा दुसऱ्या देशात नेले तर त्याला आंतरराष्ट्रीय अपहरण मानले जाते व त्यानुसार ज्या देशातून मुलांना संरक्षक पालक घेऊन येतात त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढला जातो. हे वॉरंट दूतावासामार्फत बजावले जाऊ शकते. जर दोन देशांत संधी करार असेल तर सदर वॉरंटची बजावणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे केली जाऊ शकते. कायद्यामध्ये दोन देशांत कामेटी आॅफ कोर्ट म्हणजेच एका देशाने दुसºया देशातील न्यायाचा, आदेशाचा मान ठेवणे.(विभक्त आईवडील) हा विषय मुलांसाठी बराच घातक आहे. कारण मुलांसाठी आई-वडील दोघेही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. परंतु कौटुंबिक न्यायालयात अशी प्रकरणे येतात ज्यात बाळंतपणासाठी माहेरी गेलेली पत्नी मुलाच्या जन्मानंतर परत सासरी येतच नाही; आणि पती - पत्नीच्या संभाषणाअभावी आणि अहंकारामुळे नवजात मुलाला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाला मुकावे लागते. अशा प्रकरणात बºयाच वेळा असे दिसून येते की पती-पत्नीच्या भांडणात पत्नी (आई) मुलाला पतीपासून (वडिलांपासून) दूर ठेवण्याचा प्रयत्न करते व अशा प्रकारे काही काळाने प्रकरण न्यायालयात जाते. निष्कर्ष असा की आई-वडील (पती-पत्नी) दोघांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील मतभेद विसरून जास्तीतजास्त वेळ त्यांच्या मुलांना दिला पाहिजे व देशाच्या भावी पिढीच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे़ यातूनच लहान मुलांच्या आत्महत्याही टाळता येतील.(लेखक कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटmarriageलग्न