शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

केवळ निर्यातबंदीने कांद्याची रडकथा कशी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:03 AM

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी आधी निर्यात मूल्य प्रति क्विंटलला ८५0 डॉलर केल्यानंतर केंद्र सरकारने थेट निर्यातबंदी लादली.

- योगेश बिडवई (उपमुख्य उपसंपादक)विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी आधी निर्यात मूल्य प्रति क्विंटलला ८५0 डॉलर केल्यानंतर केंद्र सरकारने थेट निर्यातबंदी लादली. परिणामी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे सर्वसाधारण दर क्विंटलमागे ३,५00 रुपयांवरून थेट २,६00 रुपयांवर खाली आले आहेत. कांद्याचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यावर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि भाव मिळायला लागल्यावर महागाईचे कारण सांगत सरकार निर्यातमूल्य वाढविते किंवा निर्यातबंदी लादते. सरकारच्या या धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादकांचे वर्षानुवर्षे नुकसान होत आहे. राज्यात २०१६ ते २0१८ अशी सलग तीन वर्षे शेतकऱ्यांनी घाऊक बाजारात कांदा ८ रुपयांपेक्षा कमी दराने तोट्यात विकला. मात्र हे कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. कोकण वगळता राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात तसेच देशातील सुमारे १५ राज्यांत कांदा पिकविला जातो. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना असाच वेळोवेळी फटका बसत आला आहे.जगात उत्पादनाच्या बाबतीत १५ व्या स्थानावर असलेला युरोपातील हॉलंड हा देश कांद्याची सर्वाधिक निर्यात करतो. त्यातून त्यांना मोठे परकीय चलन मिळते. भारत मात्र उत्पादनात पहिल्या स्थानावर असूनही सरकारी हस्तक्षेपामुळे दुसºया क्रमांकावर आहे. सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकताना हमीभाव जाहीर केला नाही. साखरेप्रमाणे निर्यात साहाय्य व इतर अनुदान दिले नाही. असा हा असहाय कांदा आणि त्याचे उत्पादन करणारा शेतकरी कायम दुर्लक्षितच राहिला आहे.‘आॅक्टोबर हीट’मध्ये कांद्याच्या वाढलेल्या भावावरून वातावरण तापण्याची वास्तविक ही पहिलीच वेळ नाही. उन्हाळ कांद्याचा साठा संपत असताना आणि काही भागात उशिराच्या मान्सूनने किंवा अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झाल्यामुळे नवा खरीप कांदा बाजारात येण्यास बिलंब होतो. त्यातून मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडून सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये चार-पाच वर्षांतून एकदा भाव वाढतात. मात्र दोन-अडीच महिन्यांच्या या अनैसर्गिक अवस्थेवर मात करण्यासाठी साठवणुकीची व्यवस्था आधुनिक करण्यापासून पुरवठा साखळी सक्षम करण्याऐवजी सरकार निर्यातबंदीचा सोपा उपाय योजते. मात्र या वरवरच्या मलमपट्टीतून कांद्याची रडकथा कशी थांबणार?यंदा दक्षिण भारतात अतिवृष्टीने कांद्याचे नुकसान झाले. परिणामी आंध्र प्रदेश, कर्नाटकातील मोठ्या बाजार समित्यांमध्ये आवक एकदम रोडावली. त्यातून भाव वाढून किरकोळ बाजारात कांदा ५0 रुपये किलो झाला. कांद्याचे भाव वाढल्यावर त्याची माध्यमे चर्चा करतात, मात्र भाव पडल्यावर त्याची फारशी नोंद घेतली जात नाही. गेल्या वर्षी वर्षभर कांद्याला मातीमोल भाव मिळाले. लासलगावला फेब्रुवारी २0१८ मध्ये उन्हाळ कांद्याचे किलोमागे किमान भाव ३ रुपये तर सर्वसाधारण भाव १४ ते १५ रुपये होते. मार्च (किमान भाव अडीच रुपये), एप्रिल, मे महिन्यात भावात घसरण होत गेली. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यातही किमान भाव अडीच ते चार रुपयांच्या दरम्यान होते. नोव्हेंबरमध्ये तर कांद्याला किलोमागे फक्त ५१ पैसे किमान भाव मिळाला होता. डिसेंबरमध्ये कांदा ७0 पैसे किलो एवढा खाली आला होता. तसेच दुष्काळामुळे अनेक भागांत लाल (खरीप) कांद्याचे पीकच आले नाही. गेल्या वर्षी खूप ओरड झाल्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांद्याला प्रति टन २00 रुपये अनुदान दिले. मात्र दिवाळीनंतर विकलेल्या कांद्याचे अनुदान अजूनही अनेक शेतकºयांच्या पदरात पडलेले नाही. कांद्याला एकरी क्विंटलमागे किमान सुमारे ८५0 रुपये खर्च येतो, असे शासन (एनएचआरडीएफ) गृहीत धरते. त्यात इतर छोटे खर्च धरलेले नसतात.निर्यातबंदी हा कांद्याचे भाव कमी करण्याचा एकच उपाय नाही. आपल्याकडे शीतगृहांची संख्या खूपच मर्यादित आहे. त्यातून कांदा साठवताना खूप नुकसान होते. तीन-चार महिन्यांत कांद्याचे वजन ३० ते ४० टक्क्यांनी घटते. तेसुद्धा टंचाईचे एक कारण आहे. या त्रुटी आपण कधी दूर करणार? तसेच देशांतर्गत बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन नवे वाण विकसित करून त्याचे उत्पादन, साठवणूक आणि देशभर वितरणासाठी रेल्वेपासून इतर वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे.पतपुरवठ्यापासून अनेक अडचणींवर मात करत शेतकरी कांदा पिकवितो. मात्र त्याला अपेक्षित भाव न मिळाल्यास तो या पिकापासून दूर गेल्यास सर्वाधिक कांदा पिकविणारा आपला देश आयातदार होण्याची भीती नाकारता येणार नाही.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी