शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

लॉकडाऊनने दिले की चांगले अनुभव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:19 PM

मिलिंद कुलकर्णी २१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप ...

मिलिंद कुलकर्णी२१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप वाढतायत. कुणी जनतेला दोष देतंय, कुणी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवतंय. अर्थव्यवस्था डबघाईला येतेय, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरीत चढउतार सुरु आहेत. हे सगळे नकारात्मक चित्र वास्तव असले तरी या तीन महिन्यांनी काही चांगले अनुभवदेखील दिले की, त्याविषयी चर्चा करुया ना !समाजमाध्यमांवर एक संदेश अधूनमधून फिरत असतो. तुम्ही १९६०, ७० च्या दशकात जन्म घेतला असेल तर तुम्हाला देशी खेळ, व्हीडिओ, वाचनालयातील पुस्तके असे अनुभव स्मरणात असतील, आणि या गोष्टी नामशेष होतानाही तुम्ही पाहिल्या. तुम्ही खरे भाग्यशाली आहात, असा त्या संदेशाचा एकंदरीत अर्थ आहे. तसाच अनुभव सगळ्याच वयोगटातील मंडळींनी या काळात घेतला.परदेश, परराज्य व महानगरांमध्ये स्थायिक झालेली मंडळी गावाकडे परतली. काही काळासाठी का होईना, या परतलेल्या भावंडांमुळे कुटुंब पुन्हा एकसंघ झाले. नातेबंध अधिक दृढ झाले. पुढच्या पिढीत कौटुंबिक जिव्हाळा वाढला. आपले क्षितीज कितीही विस्तारले, तरी घरट्यात परत यावेच लागते, हे नवे भान या काळाने दिले. परदेश, परराज्य व महानगरात राहत असल्याने दोन शिंगे अधिक असल्याचा अहंकार या काळात गळून पडला. गावाकडे राहणारा नातलगदेखील सुशिक्षित, सुसंपन्न व समृध्द आहे. नातेवाईकांशी ऋणानुबंध आहेत. अडीअडचणीत धावून जाणारी भावकी आहे, याची प्रचिती दिली. गावाशी नाळ कायम ठेवायला हवी, ही जाणीव झाली. सणवार, लग्न समारंभ, यात्रोत्सव काळात जसे जमेल तसे यायचे, असा निर्धार केला गेला. ही जमा बाजू नाही काय?ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनचा काळ आल्याने सुटीत बाहेरगावी जाणारे, चित्रपट-हॉटेलची नियमित सवय असलेले लोक सक्तीने घरी राहिले. त्याचे लाभ तरी किती झाले. गृहिणीचे कष्ट पुरुषमंडळींना कधी नव्हे ते दिसले. पुरुषांमधील पाककलेचा गुण घरच्यांना कळाला. हॉटेलमध्येच खाल्लेल्या नवनव्या डिशेश ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून घरी बनू लागल्या. उन्हाळी कामे यंदा वेळेत झाली. सगळ्यांचा हातभार लागल्याने महिलावर्गावर भार पडला नाही. वार्षिक धान्य खरेदीनंतर त्याला ऊन दाखविणे झाले. बिबड्या,कुरडया, उडदाचे पापड, शेवया या उन्हाळी कामांना सगळ्यांचा हातभार लागला. घरातील कपाटे, माळे आवरले गेले. अंथरुणे, पांघरुणे धुवून झाली. गाद्या-उशांना ऊन दाखवून झाले. केवढी कामांची यादी असते, हे प्रथमच घरातील सगळ्यांना कळले.कॅरम, पत्ते, चौपट, भोवरा, गोट्या, ल्युडो, व्यापार, सापशिडी असे बैठे खेळ रोज खेळले गेले. टीव्ही पेक्षा या खेळांचा आनंद वेगळा असतो, याची अनुभूती बालगोपाळांना आली.प्रदर्शनांमधून घेतलेली, भेट म्हणून मिळालेली अनेक पुस्तके कपाटाचे धन बनले असताना या काळात त्यावरील धूळ झटकली गेली. पुस्तके वाचनाचा आनंद पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन गेला. धावपळीच्या जीवनात या आनंदापासून आपण मुकलो होतो, हे जाणवले. आता रोज किमान एक पान वाचायचे असा निर्धार केला गेला.आॅनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होमच्या निमित्ताने नवे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप घरात आले. घरातील आजीसह मध्यमवयीन आईदेखील तंत्रस्रेही झाली. युट्यूबरील अध्यामिक प्रवचने, पाककला, टी.व्ही.वरील मालिकांचे सुटून गेलेले भाग बघण्याचा आनंद महिला वर्ग घेऊ लागला.तात्पुरता रोजगार गमावलेल्या भंगार विक्रेता, रिक्षाचालक बांधवांनी हार न मानता लोटगाडी, रिक्षेचा वापर भाजीपाला, फळे विक्रीसाठी केला. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने घरपोच भाजीपाला, फळे मिळत असल्याने प्रतिसाद चांगला मिळाला. शेतकरी बांधवांनीदेखील बांधावरुन थेट ग्राहकाच्या घरापर्यंत माल पोहोचविला. दलालाची साखळी तुटल्याने शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले आणि ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळाला.अनेक साहित्यप्रेमी व्हीडिओद्वारे कथाकथन, साहित्यवाचन, कवितावाचनाच्या कार्यक्रमात रंगले. काहींनी भूतकाळात रमत आठवणी शब्दबध्द केल्या. घरी राहणे फार काही कंटाळवाणे नसते हे सक्तीच्या लॉकडाऊनने शिकविले. या चांगल्या गोष्टींविषयीदेखील बोलायला हवे की, नको, सांगा बरे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव