शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

कल्पना चांगली पण..

By admin | Updated: March 28, 2016 03:41 IST

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून नेण्यासाठी बोलतात. नेतेमंडळींच्या बोलण्याला तर लोक बऱ्यापैकी ओळखून असतात. जे केवळ बोलण्यासाठीच असते, ते कृतीत उतरण्याचा प्रश्नच नसतो. कारण वांझोट्या बोलाकडून अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ भाबडेपणाच ठरत असतो. पण अशाही सभोवतालच्या वातावरणात काही जण बोलतात, कल्पनाही मांडतात आणि त्याला कृतीची जोडही देतात, त्यामुळे त्या बोलण्याला नैतिक अर्थ प्राप्त होत असतो. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधी पदरमोड करून मदत केली त्यानंतर दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. तोच कित्ता गिरवित नागपूर येथे ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला आर्थिक हातभार लावून प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांनी उक्ती आणि कृतीची सांगड घालून दिली आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे कौतुक करून एलकुंचवार यांनी राज्यातील सुखवस्तू परिवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एका पाल्याला शिक्षण आणि इतर कार्यासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले. एलकुंचवार केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत, तर त्या कामाला आपल्यापासून सुरुवात व्हावी म्हणून त्यांना पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष म्हणून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यांनी दिलेल्या रकमेला जेवढे मोल आहे, त्यापेक्षा दु:खितांच्या अश्रूंचे मोल जाणण्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. त्याच भावनेतून त्यांनी केलेल्या आवाहनाला दाद देऊन सुखवस्तू कुटुंबांनी पुढाकार घेतला तर दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती एक झुळूक ठरणार आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेईल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.