शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कल्पना चांगली पण..

By admin | Updated: March 28, 2016 03:41 IST

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून नेण्यासाठी बोलतात. नेतेमंडळींच्या बोलण्याला तर लोक बऱ्यापैकी ओळखून असतात. जे केवळ बोलण्यासाठीच असते, ते कृतीत उतरण्याचा प्रश्नच नसतो. कारण वांझोट्या बोलाकडून अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ भाबडेपणाच ठरत असतो. पण अशाही सभोवतालच्या वातावरणात काही जण बोलतात, कल्पनाही मांडतात आणि त्याला कृतीची जोडही देतात, त्यामुळे त्या बोलण्याला नैतिक अर्थ प्राप्त होत असतो. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधी पदरमोड करून मदत केली त्यानंतर दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. तोच कित्ता गिरवित नागपूर येथे ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला आर्थिक हातभार लावून प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांनी उक्ती आणि कृतीची सांगड घालून दिली आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे कौतुक करून एलकुंचवार यांनी राज्यातील सुखवस्तू परिवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एका पाल्याला शिक्षण आणि इतर कार्यासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले. एलकुंचवार केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत, तर त्या कामाला आपल्यापासून सुरुवात व्हावी म्हणून त्यांना पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष म्हणून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यांनी दिलेल्या रकमेला जेवढे मोल आहे, त्यापेक्षा दु:खितांच्या अश्रूंचे मोल जाणण्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. त्याच भावनेतून त्यांनी केलेल्या आवाहनाला दाद देऊन सुखवस्तू कुटुंबांनी पुढाकार घेतला तर दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती एक झुळूक ठरणार आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेईल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.