शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Ganpati Festival 2018 : गणेशोत्सव होवो गुणोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 21:58 IST

‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, संस्कृती, ऊर्जा आदी अनेकविध गुणांचा हा तेजोनिधी आहे.

विजय बाविस्कर गणपती आणि गुणपती असलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे आगमन झाले. महाराष्ट्रात हजारो गणेशोत्सव मंडळांकडून सार्वजनिक स्तरावर, तसेच घराघरांतूनही ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात होत आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गजाननाचे आगमन आनंद, उत्साह निर्माण करणारे, उमेद व सद्भाव वाढविणारे तसेच सकलजनांची विघ्ने हरण करणारे आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांनी मेटाकुटीस आलेल्या सामान्य माणसाच्या मनात नवी उमेद जागविणारे आहे. गणपतीचे आगमन म्हणजे सर्जनशीलतेच्या उत्सवाचे स्वागत करणे आहे. चैतन्याचे पाझर आणि भक्तीचे निर्झर समाजमनात प्रवाहित करणारे हे शुभागमन आहे. 

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष दहा दिवस सर्वत्र निनादत राहणार आहे. सकल कलांचा अधिपती असलेला हा विद्याधिपती मानवी संस्कृती अधिक प्रगल्भ करणारा, विधायक प्रेरणा जागवणारा आहे. लोकमान्य टिळकांनी जाणीवपूर्वक या उत्सवाचे बीजारोपण समाजमनात केले. सामाजिक, सांस्कृतिक जाणीवा विकसित करत असतानाच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या उत्सवाने केले आहे. अमाप उत्साहाचा हा लोकोत्सव प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा घेऊन आता जगभरात उभा राहिला आहे. सर्व समाज एकसंध राखण्याची या उत्सवाने निर्माण केलेली भूमिका आजही तितकीच मोलाची आणि गरजेची आहे. ‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, संस्कृती, ऊर्जा आदी अनेकविध गुणांचा हा तेजोनिधी आहे. 

गणपती हा जसा गणाधिपती आहे, तसाच तो गुणाधिपतीही आहे, याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. कोणताही अनाचार, दुराचार या काळात होणार नाही, यासाठी सर्व घटकांनी सजग आणि सतर्क राहायला हवे; नव्हे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या ज्या पुण्यातून आणि महाराष्ट्रातून गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला, त्याच पुण्यातील व महाराष्ट्रातील आजचे सार्वजनिक जीवन चिंता वाटायला लावणारे आहे. सध्याचे एकूणच वातावरण अस्थिरतेचे, दहशतीच्या सावटाखालचे आणि महागाईने होरपळून टाकणारे आहे. सामाजिक अभिसरण घडवणारा हा उत्सव म्हणूनच आजच्या काळाची गरज आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चा प्रत्यय गणरायाच्या आराधनेतून मिळो आणि समाजाचा भविष्यकाल अधिकाधिक उज्ज्वल, समृद्ध होवो, हीच श्रीगजाननाच्या चरणी प्रार्थना! 

(लेखक लोकमत पुणे अावृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Puneपुणे