शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट होण्याचा फाजीलपणा

By admin | Updated: February 3, 2016 03:01 IST

मागासलेल्या, कायम दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने मोठ्या आशाळभूतपणे औरंगाबाद शहरावर गेले चार-पाच महिने नजर लावली होती

मागासलेल्या, कायम दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने मोठ्या आशाळभूतपणे औरंगाबाद शहरावर गेले चार-पाच महिने नजर लावली होती. मराठवाड्याची जी काही एवंगुणवैशिष्ट्ये आहेत, त्यात काळा रंग सर्वात वरचा. म्हणून आम्हास गोऱ्या रंगाचे काय ते अप्रूप? त्यामुळे स्मार्ट वगैरे प्रकरण आपल्या वाट्याला आलेलेच नाही, असे आम्ही जन्मजात समजतो. जेव्हा औरंगाबाद शहराने स्मार्ट होण्याची घोषणा केली, त्यावेळी आमचे मन हरखून गेले आणि औरंगाबादकरांच्या हिमतीला दाद दिली. हे शहर स्मार्ट होणार म्हणजे काय होणार याकडे डोळ्यात प्राण आणून अवघा मराठवाडा पाहात होता, पण येथेही आमच्या पदरी निराशा पडली. म्हटले होते औरंगाबादपाठोपाठ अवघ्या मराठवाड्याला स्मार्ट होता येईल, पण ‘बोहोणीलाच पनौती’ लागली.औरंगाबादकरांनी स्मार्ट होण्यासाठी जोरदार तयारी केली होती (असे सगळेच म्हणतात); पण एवढी तयारी करूनसुद्धा अवघे ४५ टक्के मार्क मिळाले. म्हणजे कसाबसा काठावरचा दुसरा वर्ग मिळाला. थर्ड क्लासचा शिक्का येथेही बसला नाही, हेही नसे थोडके. नाही तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत आमच्या वाट्याला थर्ड क्लास आलेला आहे. आता स्मार्ट होण्यासाठी आम्ही काय कमी प्रयत्न केले, जसे कोणी म्हणाले दूध-हळद प्या, कोणी म्हणाले अंडे फेटून लावा, फळाचा रस लावा, अशा सतराशे साठ टिप्स मिळाल्या. कोणी सांगितले, जनजागृती करा. आम्ही बैठकांवर बैठका घेण्याचा सपाटा लावला. लोकाना माहीत नव्हते बैठकीत काय बोलायचे. ते रस्ते चांगले करा, पाणी द्या, कचरा उचला याच मागण्या करीत होते. त्यांच्या या मागण्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आमचे कान किटले होते आणि अशा मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष कसे करायचे याचे तंत्र आम्ही इतक्या वर्षांत अवगत करून घेतल्यामुळे त्याचा आम्ही त्रास करून घेत नव्हतो. सवय आणि सरावाने आम्हाला या मागण्यांचा मारा विचलित करीत नव्हता. हळूहळू लोकांची गर्दी ओसरत गेली.पुढे पुढे तर या बैठकांमध्ये आम्हीच होतो. आमची चिकाटी यासाठी की शहर स्मार्ट होता होता आम्ही पण स्मार्ट होऊ ही आशा होती; पण नेमका आमच्या गुरू बळाला शनी वक्री येऊन त्याने राहूशी युती केली आणि केतूच्या हातात हात दिला. शहर स्मार्ट करण्यासाठी वेगळा अधिकारी, समिती नेमणार, दिल्लीश्वराच्या इशाऱ्यावर ती मंडळी काम करणार असा उलगडा झाला आणि स्मार्ट बनण्याच्या आमच्या स्वप्नांचा भंग झाला. आमचे शहर ही बाहेरची मंडळी येऊन स्मार्ट करणार तर आम्ही काय करायचे, असाच प्रश्न आमच्यासह ११३ डोक्यांमध्ये निर्माण होऊन एकच प्रकाश पडला, की या पद्धतीने शहर स्मार्ट होईल; पण आपण मात्र तसेच राहू. आपल्याला स्मार्ट होण्यासाठी आता वेगळ्या मार्गाने तजवीज करावी लागेल. शहर स्मार्ट करण्याच्या कामावरून आमचे लक्ष उडाले. जे आमचे झाले ते सर्वांचे. त्यातच मग आणखी एक बातमी कळली, की शहर स्मार्ट होणार नाही. शहरातील एक भागच स्मार्ट करणार आहेत. यानंतर तर आमचा उरलासुरला इंटरेस्टही संपला. बैठका, जनजागृती, सोशल मीडिया हे अधिकाऱ्यांनाच घेऊ द्या, असे सुचवले. आम्ही काढता पाय घेतला. आमच्या मनात प्रश्न आला, हे शहर स्मार्ट करण्याचा हा फाजीलपणा कोणी सुचवला. मलिक अंबरपासूनचे हे शहर आपसूकच स्मार्ट होत गेले आहे. रस्त्यात खड्डे, उडणारी धूळ, पाणी मिळत नाही वेळेवर, नवीन काय त्यात? कचरा कोणाच्या घरात नसतो? एक गोष्ट मात्र खरी, की आम्हाला डावलले ते मागास आहोत म्हणून, हा आरोप करायला आम्ही मोकळे झालो. कारण आरोप करणे सोपे असते, स्मार्ट बनणे अवघड. आम्ही आपले मागासलेल्या मराठवाड्याचेच बरे आहोत. स्मार्ट होण्याचा फाजीलपणा सांगितला कोणी?- सुधीर महाजन