शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर खडसे गेलेच! पक्षश्रेष्ठींविषयी नव्हे, केवळ फडणवीसांविषयीच्या नाराजीमागे रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:15 IST

रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला.

 

मिलिंद कुलकर्णीनिवासी संपादक, लोकमत, जळगावएकनाथराव खडसे यांचा बहुप्रतीक्षित प्रवेश सोहळा अखेर निश्चित झाला. २ सप्टेंबरच्या वाढदिवसापासून सुरू झालेले हे नाट्य अखेर पावणेदोन महिन्यानंतर संपुष्टात आले. असेच नाट्य एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत रंगले होते. रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला. हा पराभव आणि भाजप -सेना युती सरकारच्या काळात साडेतीन वर्षे मंत्रिपदाविना राहणे खडसे यांच्या जिव्हारी लागले. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.

वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी राष्टÑवादीचे तिकीट घ्यावे म्हणून स्वत: अजित पवार हे इच्छुक होते. अखेरपर्यंत त्यांनी वाट पाहिली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला अपक्ष उमेदवारी करायला लावून राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. आतादेखील काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खडसे यांना बोलावत होते, तरी खडसे यांचा निर्णय होत नव्हता. समर्थकांचा दबाव वाढत असला तरी हा निर्णय सोपा नव्हता.

भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची घोषणा करताना खडसे यांनी अनेक पत्ते अद्याप खुले केलेले नाही. मुरब्बी, चाणाक्ष राजकीय नेता असल्याने त्यांनी जेवढे सांगायचे तेवढेच उघड केले आणि बाकी गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या.

भाजप, केंद्रीय व प्रदेशनेतृत्व यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही, असे वारंवार स्पष्ट करीत असताना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष असल्याचे दिसून आले. पावणेदोन महिन्यांपासून उघडपणे ते फडणवीस यांचे नाव घेत आहेत. यामागे पूर्वनियोजित सूत्र दिसते.

भाजपश्रेष्ठींनी फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी दिलेली मुख्यमंत्रिपदाची संधी, दुसऱ्यांदा सत्तास्थापनेत अपयश येऊनही दिलेली विरोधी पक्षनेतेपदाची संधी आणि आता बिहार निवडणुकीची दिलेली जबाबदारी याचा अर्थ श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. खडसे यांचे खरे दुखणे येथे आहे आणि त्यातून ते पक्षापासून दुरावले गेले.

विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्यपालपद अशी अनेक आश्वासने देऊनही भाजपने डावलले असे जाहीरपणे सांगणाऱ्या खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने कोणते आश्वासन दिले आहे, याची लोकांना उत्सुकता असेल.

विधान परिषद सदस्यत्व, मंत्रिपद, संघटनेतील मोठे पद असे पर्याय सांगितले जात असले तरी अद्याप त्याविषयी स्पष्टता नाही. कन्या रोहिणी खडसे या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या, त्यांना काहीतरी द्यावे लागणार आहेच. सून खासदार रक्षा खडसे या खडसेंबरोबर जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. कोणीही खासदार, आमदार त्यांच्यासोबत येणार नाही, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने इतर चर्चांवर पडदा पडला आहे.

खडसे यांच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काय परिणाम होईल, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून भाजपची सूत्रे खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांच्याकडे एकवटली आहेत.

महाजन यांच्या नेतृत्वाखाली दोन खासदार, ४ आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव महापालिकेसह ६ पालिकांमध्ये सत्ता आली. ‘संकटमोचक’ उपाधी लाभलेले महाजन यांची आता खरी कसोटी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात उभारी येईल, हे मात्र निश्चित. अरुणभाई गुजराथी, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासारखे मोठे नेते असूनही पक्षसंघटना कमकुवत आहे. दहा वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत एकमेव आमदार निवडून येत आहे. सहकारी संस्थांमध्ये पक्ष अधिक मजबूत होईल. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस