शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

...अखेर खडसे गेलेच! पक्षश्रेष्ठींविषयी नव्हे, केवळ फडणवीसांविषयीच्या नाराजीमागे रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 8:14 AM

रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला.

 

मिलिंद कुलकर्णीनिवासी संपादक, लोकमत, जळगावएकनाथराव खडसे यांचा बहुप्रतीक्षित प्रवेश सोहळा अखेर निश्चित झाला. २ सप्टेंबरच्या वाढदिवसापासून सुरू झालेले हे नाट्य अखेर पावणेदोन महिन्यानंतर संपुष्टात आले. असेच नाट्य एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत रंगले होते. रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला. हा पराभव आणि भाजप -सेना युती सरकारच्या काळात साडेतीन वर्षे मंत्रिपदाविना राहणे खडसे यांच्या जिव्हारी लागले. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.

वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी राष्टÑवादीचे तिकीट घ्यावे म्हणून स्वत: अजित पवार हे इच्छुक होते. अखेरपर्यंत त्यांनी वाट पाहिली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला अपक्ष उमेदवारी करायला लावून राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. आतादेखील काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खडसे यांना बोलावत होते, तरी खडसे यांचा निर्णय होत नव्हता. समर्थकांचा दबाव वाढत असला तरी हा निर्णय सोपा नव्हता.

भाजपच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची घोषणा करताना खडसे यांनी अनेक पत्ते अद्याप खुले केलेले नाही. मुरब्बी, चाणाक्ष राजकीय नेता असल्याने त्यांनी जेवढे सांगायचे तेवढेच उघड केले आणि बाकी गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या.

भाजप, केंद्रीय व प्रदेशनेतृत्व यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही, असे वारंवार स्पष्ट करीत असताना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष असल्याचे दिसून आले. पावणेदोन महिन्यांपासून उघडपणे ते फडणवीस यांचे नाव घेत आहेत. यामागे पूर्वनियोजित सूत्र दिसते.

भाजपश्रेष्ठींनी फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी दिलेली मुख्यमंत्रिपदाची संधी, दुसऱ्यांदा सत्तास्थापनेत अपयश येऊनही दिलेली विरोधी पक्षनेतेपदाची संधी आणि आता बिहार निवडणुकीची दिलेली जबाबदारी याचा अर्थ श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत. खडसे यांचे खरे दुखणे येथे आहे आणि त्यातून ते पक्षापासून दुरावले गेले.

विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्यपालपद अशी अनेक आश्वासने देऊनही भाजपने डावलले असे जाहीरपणे सांगणाऱ्या खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने कोणते आश्वासन दिले आहे, याची लोकांना उत्सुकता असेल.

विधान परिषद सदस्यत्व, मंत्रिपद, संघटनेतील मोठे पद असे पर्याय सांगितले जात असले तरी अद्याप त्याविषयी स्पष्टता नाही. कन्या रोहिणी खडसे या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या, त्यांना काहीतरी द्यावे लागणार आहेच. सून खासदार रक्षा खडसे या खडसेंबरोबर जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. कोणीही खासदार, आमदार त्यांच्यासोबत येणार नाही, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने इतर चर्चांवर पडदा पडला आहे.

खडसे यांच्या पक्षत्यागामुळे भाजपवर काय परिणाम होईल, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून भाजपची सूत्रे खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांच्याकडे एकवटली आहेत.

महाजन यांच्या नेतृत्वाखाली दोन खासदार, ४ आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव महापालिकेसह ६ पालिकांमध्ये सत्ता आली. ‘संकटमोचक’ उपाधी लाभलेले महाजन यांची आता खरी कसोटी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात उभारी येईल, हे मात्र निश्चित. अरुणभाई गुजराथी, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासारखे मोठे नेते असूनही पक्षसंघटना कमकुवत आहे. दहा वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत एकमेव आमदार निवडून येत आहे. सहकारी संस्थांमध्ये पक्ष अधिक मजबूत होईल. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस