शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रात्रंदिन आमुचा समस्यांशी लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:26 IST

कोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे

मिलिंद कुलकर्णीकोरोना व्हायरसशी लढताना सामान्य माणसाची विनोदबुध्दी किती जागरुक आहे, याचा अनुभव समाजमाध्यमांवरील संदेशांवरुन येत आहे. कठीण प्रसंगात, संकट समयी हजरजबाबीपणा, विनोदबुध्दी शाबूत ठेवली तर त्यावर मात करणे सोपे जाते, असे त्यामागे संबंधितांचे तत्त्वज्ञान असावे.गर्दीत जाताना लोक मास्क लावून फिरत आहे, जळगावसारख्या ठिकाणी अशा मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर या संदेशांना चालना मिळाली. अहो, हे मास्क कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नव्हे तर जळगावमधील धुळीपासून वाचविण्यासाठी लावले जात आहेत. रोज अमूक ग्रॅम धूळ नाका, तोंडाद्वारे पोटात जात आहे. त्याचा परिणाम थेट शरीरावर होत आहे, असे त्या संदेशात म्हटले आहे.जळगावच नव्हे तर खान्देशातील बहुसंख्य पालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतीने रहिवाशांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यास नागरिक सज्ज आहे. आता तुम्ही विचाराल, असे कोणते उपक्रम या संस्थांनी राबविले आहे. आता आधी रस्त्यांचे उदाहरण घेऊ. एकतरी गुळगुळीत रस्ता दाखवा आणि कोरोना प्रतिबंधाचा मास्क मोफत मिळवा, अशी आॅफर दिली तर कुणालाही महागडा मास्क देण्याची वेळच येणार नाही. (केवळ निवडणूक काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते अभिनेत्रीच्या गालाची उपमा गुळगुळीत रस्त्याचे उदाहरण देताना देत असतात आणि पुढे आश्वासनाप्रमाणे तेही विसरुन जातात, हा भाग अलाहिदा) वैद्यकीय उपचार पध्दतीतील अ‍ॅक्युपे्रशर आणि अ‍ॅक्युपंक्चरचा लाभ रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना झाल्याशिवाय राहत नाही. हा केवढा मोठा लाभ आहे. अन्यथा मसाज, मालीशसाठी होणारा खर्च वाचला ते विसरुन कसे चालेल?हा काळ पानगळीचा आहे. शतकोटी वृक्षलागवड झाल्याने सर्वत्र भरपूर झाडी झाली आहेत. पानगळ स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात होते. सफाई कर्मचारी झाडून एकेठिकाणी तो कचरा गोळा करतात. आता हा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर येणार आणि तो उचलणार, म्हणजे उगाच इंधनाचा अपव्यय होणार, हा उदात्त विचार लक्षात घेऊन सफाई कर्मचारी दोन पैशाची आगकाडी लावून कचरा जाळून टाकतात. आता त्यांच्या काटकसरीच्या राष्टÑव्यापी विचाराचा आदर्श घेऊन पुरस्कार देण्याऐवजी पर्यावरण, आरोग्य अशा क्षेत्रातील मंडळी धुराच्या नावाने बोंब ठोकतात, याला काय म्हणावे सांगा बरं. बरे एवढ्या सकाळी लोकांनी कशाला बरे घराबाहेर पडावे? चांगले घरी बसावे, टीव्हीवर रात्री राहून गेलेल्या मालिका बघाव्या, बायकोच्या हातचा नाश्ता करावा, पेपर वाचावा...ते दिले सोडून आणि धावायला, फिरायला बाहेर पडतात आणि धूर आणि धुळीच्या नावाने ओरडता, हे काही पटत नाही बुवा!रस्त्यावरील हातगाडीवरील, उघड्यावरील, धूर व धुळीचा प्रभाव असलेले, उघड्या गटारींच्या शेजारी असलेल्या टपऱ्यांवरील खाद्यपदार्थ खाऊन आमची प्रतिकारशक्ती दुप्पट झालेली असताना आम्हाला हो कसला कोरोना व्हायरस बाधणार? ५० वर्षे जुन्या पाईपातून आम्ही ‘अमृत’मय जलसेवन करीत असताना कसली बाधा होणार ? काही होत नाही कोरोना? उगाच घाबरते आहे सारे जग, नाही का?आता तर काय म्हणे मांसाहार करु नका? शाकाहार चांगला आहे, म्हणे. अहो, मांसाहार करणारे किती हुशार आणि चतुर असतात, त्यांना काही फरक पडणार नाही बघा. उघड्यावर मांस विक्री होते, कधी झाला परिणाम? कोंबड्या लटकवून मोटारसायकलीवरुन वाहतूक होते, काही झाला परिणाम? रस्त्यावर तापी, अनेरची मासेविक्री होते, कधी झाली का कोणती बाधा? उगाच तुम्ही मांसाहाराला बदनाम करतात बुवा!४७ तापमानामध्ये तुमचा तो व्हायरस तर टिकला पाहिजे. अहो, होळी जाऊ द्या, बघा सूर्यदेव कसा प्रताप दाखवतो. मुंबई-पुण्याचे पाहुणे काही खान्देशात यायला तयार होत नाही उन्हाळ्यात तिथे चीनमधला व्हायरस कुठे येऊ घातलाय, सांगा बरे. लक्झरी बसमधील वासाने त्या व्हायरसला फेफरे यायचे, उलटटपाली तो परत गेलाच म्हणून समजा. काय मत आहे तुमचे?

टॅग्स :Jalgaonजळगाव