शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

दृष्टिकोन: पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:20 IST

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला.

विश्वास पाटील

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील गतवर्षीच्या महापुरात राज्यभरातून लोक मदतीला धावून आले. त्यामुळे संकटाचे ओझे सहजतेने पेलता आले; परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने कोण मदतीला येणार नाही आणि आपल्याच गावांतील लोकही कुणाला घरात घेणार नाहीत, या भीतीने पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर उठले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२३० पैकी ३४५ गावे महापुरामुळे बाधित झाली. त्यातील २७ गावांचे शंभर टक्के स्थलांतर झाले होते. ४१ गावे अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे बाधित झाली. सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची संख्याही १०४ होती. त्यांतील काही पूर्णत:, तर काही अर्धी स्थलांतरित झाली. महापुराचा महाराष्ट्रात सर्वाधिक फटका या दोन जिल्ह्यांना गतवर्षी बसला. पुराचे पाणी वाढू लागल्यावर ५ आॅगस्टला मध्यरात्रीपासून गावे रिकामी होऊ लागली. दि. ५ पासून १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत महापुराचा वेढा होता. पूर वाढू लागल्यावर हाताला लागेल ते साहित्य डोक्यावर घेऊन व हातात जनावरांचा कासरा धरून लोक माळरानावरील शाळा, मंदिर, समाजमंदिर, नातलग, भावकी अशा कुणाच्या घरी सोय होईल तिथे स्थलांतरित झाले. लोकांनीही खुल्या मनाने दार उघडून त्यांना आपल्या घरात घेतले. संकटाच्या काळात माणुसकी धावून आल्याचे एक चांगले चित्र त्यावेळी गावोगावी पाहायला मिळाले. ज्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसले, त्या गावांशेजारील गावे पूरबाधित गावांच्या मदतीसाठी धावून आली. रोज सकाळी माहेरवाशिणीला शिदोरी द्यावी तशा दुरड्या भरून लोकांनी जेवण करून आणून वाढले. या लोकांना जेवण आणून वाढण्याची जणू स्पर्धाच लागली. नुसते जेवणच दिले नाही, तर जनावरांना चाराही आणून दिला.

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला. अगदी यवतमाळ, परभणीपासून ते मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर असे अनेक जिल्हे व मुंबई, ठाणे, पुण्यातूनही तसेच आपेगाव, दापोली, फोंडा अशा मोठ्या गावांतूनही प्रचंड मदत ट्रकमधून आली. एका-एका गावासाठी तब्बल २५-२५ ट्रक मदत आली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरेसारख्या गावाने ‘आम्हाला आता मदत नको’ अशी जाहीर भूमिका घेतली. काहींनी कडबाकुट्टीचे ट्रक पाठविले. काहींनी गायी घेऊन दिल्या. उत्तम प्रतीच्या धान्यापासून ते कपडे, औषधे ते टूथपेस्टपर्यंत लोकांनी सोय केली. स्थलांतरित जागी लोकांना डासांचा त्रास होईल म्हणून मच्छर अगरबत्तीही दिल्या. एवढी काळजी समाजाने समाजाची घेतली. हे धान्य किमान पुढील सहा महिने पुरेल इतके होते. त्यामुळे महापुरात घरे वाहून गेली तरी लोक त्यातून सावरले व संसाराला लागले.आता यंदाही महापुराचा धोका लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. गेल्यावर्षी महापुरानंतर जिल्हा प्रशासनाने गावे स्थलांतरित करण्याच्या योजना आखल्या; परंतु त्या कागदावरच राहिल्या. आता प्रशासन असे म्हणत आहे की, ‘यावर्षी तुमचे तुम्ही सावध रहा, आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही.’ आता स्थलांतरित व्हायचे झाल्यास जायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर आहे. त्यामुळे पूरबाधित लोकांनी आताच पंढरपूरच्या दिंडीला जाताना जशी बांधतात, तशी खर्ची बांधली आहे. यावर्षी महत्त्वाचा प्रश्न आहे जायचे कुणाच्या घरी... कारण कोरोनाच्या संसर्गामुळे भावकीतील किंवा मित्रमंडळींच्या घरीही कोण घेणार नाहीत. लोक तसे बोलून दाखवू लागले आहेत. कोरोनाचे संकट अजून पुरेसे दूर झालेले नाही. त्यामुळे घरात गर्दी करून धोका पत्करायला नको, अशी लोकांची मानसिकता आहे आणि ती बरोबर आहे. गेल्यावर्षी गावे मदतीला धावून आली, तशी यंदा येणार नाहीत. त्यामागेही कोरोनाचे कारणच आहे.

मुळात पुणे-मुंबई ही शहरे कोरोनामुळे बेजार झाली आहेत. त्यात आपण सर्वांनीच पुणे-मुंबईकरांमुळे आपल्या जिल्ह्यात कोरोना आला म्हणून त्यांची हेटाळणी केली आहे. या शहरांतील बहुतांशी लोक मुळीच आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे तिथे मदत गोळा करण्यासाठी कोण पुढाकार घेणारे नाही. परिणामी या शहरांतून मदत मिळण्याची शक्यता नाही. औरंगाबादसह सोलापूर व अन्य शहरांत लॉकडाऊन असल्याने तेच लोक संकटात आहेत. अशा स्थितीत बाहेरून कुठलीही मदत येणार नाही. स्थलांतरित व्हायचे तर कुठे जायचे आणि हे संकट कसे पेलायचे, असा प्रश्न या लोकांच्या मनात भीतीचे काहूर माजवत आहे.( लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीच वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcycloneचक्रीवादळ