शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दृष्टिकोन: पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:20 IST

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला.

विश्वास पाटील

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील गतवर्षीच्या महापुरात राज्यभरातून लोक मदतीला धावून आले. त्यामुळे संकटाचे ओझे सहजतेने पेलता आले; परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने कोण मदतीला येणार नाही आणि आपल्याच गावांतील लोकही कुणाला घरात घेणार नाहीत, या भीतीने पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर उठले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२३० पैकी ३४५ गावे महापुरामुळे बाधित झाली. त्यातील २७ गावांचे शंभर टक्के स्थलांतर झाले होते. ४१ गावे अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे बाधित झाली. सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची संख्याही १०४ होती. त्यांतील काही पूर्णत:, तर काही अर्धी स्थलांतरित झाली. महापुराचा महाराष्ट्रात सर्वाधिक फटका या दोन जिल्ह्यांना गतवर्षी बसला. पुराचे पाणी वाढू लागल्यावर ५ आॅगस्टला मध्यरात्रीपासून गावे रिकामी होऊ लागली. दि. ५ पासून १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत महापुराचा वेढा होता. पूर वाढू लागल्यावर हाताला लागेल ते साहित्य डोक्यावर घेऊन व हातात जनावरांचा कासरा धरून लोक माळरानावरील शाळा, मंदिर, समाजमंदिर, नातलग, भावकी अशा कुणाच्या घरी सोय होईल तिथे स्थलांतरित झाले. लोकांनीही खुल्या मनाने दार उघडून त्यांना आपल्या घरात घेतले. संकटाच्या काळात माणुसकी धावून आल्याचे एक चांगले चित्र त्यावेळी गावोगावी पाहायला मिळाले. ज्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसले, त्या गावांशेजारील गावे पूरबाधित गावांच्या मदतीसाठी धावून आली. रोज सकाळी माहेरवाशिणीला शिदोरी द्यावी तशा दुरड्या भरून लोकांनी जेवण करून आणून वाढले. या लोकांना जेवण आणून वाढण्याची जणू स्पर्धाच लागली. नुसते जेवणच दिले नाही, तर जनावरांना चाराही आणून दिला.

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला. अगदी यवतमाळ, परभणीपासून ते मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर असे अनेक जिल्हे व मुंबई, ठाणे, पुण्यातूनही तसेच आपेगाव, दापोली, फोंडा अशा मोठ्या गावांतूनही प्रचंड मदत ट्रकमधून आली. एका-एका गावासाठी तब्बल २५-२५ ट्रक मदत आली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरेसारख्या गावाने ‘आम्हाला आता मदत नको’ अशी जाहीर भूमिका घेतली. काहींनी कडबाकुट्टीचे ट्रक पाठविले. काहींनी गायी घेऊन दिल्या. उत्तम प्रतीच्या धान्यापासून ते कपडे, औषधे ते टूथपेस्टपर्यंत लोकांनी सोय केली. स्थलांतरित जागी लोकांना डासांचा त्रास होईल म्हणून मच्छर अगरबत्तीही दिल्या. एवढी काळजी समाजाने समाजाची घेतली. हे धान्य किमान पुढील सहा महिने पुरेल इतके होते. त्यामुळे महापुरात घरे वाहून गेली तरी लोक त्यातून सावरले व संसाराला लागले.आता यंदाही महापुराचा धोका लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. गेल्यावर्षी महापुरानंतर जिल्हा प्रशासनाने गावे स्थलांतरित करण्याच्या योजना आखल्या; परंतु त्या कागदावरच राहिल्या. आता प्रशासन असे म्हणत आहे की, ‘यावर्षी तुमचे तुम्ही सावध रहा, आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही.’ आता स्थलांतरित व्हायचे झाल्यास जायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर आहे. त्यामुळे पूरबाधित लोकांनी आताच पंढरपूरच्या दिंडीला जाताना जशी बांधतात, तशी खर्ची बांधली आहे. यावर्षी महत्त्वाचा प्रश्न आहे जायचे कुणाच्या घरी... कारण कोरोनाच्या संसर्गामुळे भावकीतील किंवा मित्रमंडळींच्या घरीही कोण घेणार नाहीत. लोक तसे बोलून दाखवू लागले आहेत. कोरोनाचे संकट अजून पुरेसे दूर झालेले नाही. त्यामुळे घरात गर्दी करून धोका पत्करायला नको, अशी लोकांची मानसिकता आहे आणि ती बरोबर आहे. गेल्यावर्षी गावे मदतीला धावून आली, तशी यंदा येणार नाहीत. त्यामागेही कोरोनाचे कारणच आहे.

मुळात पुणे-मुंबई ही शहरे कोरोनामुळे बेजार झाली आहेत. त्यात आपण सर्वांनीच पुणे-मुंबईकरांमुळे आपल्या जिल्ह्यात कोरोना आला म्हणून त्यांची हेटाळणी केली आहे. या शहरांतील बहुतांशी लोक मुळीच आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे तिथे मदत गोळा करण्यासाठी कोण पुढाकार घेणारे नाही. परिणामी या शहरांतून मदत मिळण्याची शक्यता नाही. औरंगाबादसह सोलापूर व अन्य शहरांत लॉकडाऊन असल्याने तेच लोक संकटात आहेत. अशा स्थितीत बाहेरून कुठलीही मदत येणार नाही. स्थलांतरित व्हायचे तर कुठे जायचे आणि हे संकट कसे पेलायचे, असा प्रश्न या लोकांच्या मनात भीतीचे काहूर माजवत आहे.( लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीच वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcycloneचक्रीवादळ