शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक, युद्ध आणि..

By admin | Updated: October 29, 2014 23:36 IST

ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.

एक विचार बरेच दिवस मनात घोळत होता. तो अधिक स्पष्ट होण्यासाठी निमित्त झालं एका राष्ट्रीय पातळीवरच्या बुद्धिबळ स्पर्धेचं! त्यातही लागोपाठ झालेल्या लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीचं! शिवाय एकूणच खेळ किंवा स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा विचार तर खूप पूर्वी एकदा थोडा कागदावरही उतरवला होता.
म्हणजे एकूण मास्तरकीचं (शिक्षकी पेशाचं) प्रशिक्षण घेण्याच्या काळात विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भात तेव्हाच्या प्राध्यापकांनी सांगितलेला एक मुद्दा पुन्हा पुन्हा आठवावा असे अनुभव शिक्षणोतर राजकारणात (दुरूनच) अनुभवावे लागले. हल्ली तर एकूणच सामान्य माणूस राजकारणाविषयी (बोलण्यात तरी) अधिक सजग झालेला दिसतो. तर आधी विद्याथ्र्याच्या मानसशास्त्रसंदर्भातला मानसशास्त्रीय विचार असा, जे विद्यार्थी-विद्याíथनी 
अधिक बंडखोर, मारामा:या करणारे वगैरे उपद्रवकारक उद्योग करणारे असतील, त्यांना  क्रीडाशिक्षकांनी भरपूूर शारीरिक ऊर्जा खर्च होते अशा, कबड्डी, खो-खो, धावणो, क्रिकेट आदी खेळांत प्रोत्साहन द्यावे. शिवाय त्यातही बंडखोरी करणा:याकडे वर्गाचे-गटाचे नेतृत्व द्यावे. त्यामुळे होते काय की, त्याच्या ऊर्जेचा उपयोग मारामा:या करून उपद्रव देण्यात खर्च होणार नाही. उलट वर्गाला शिस्त लावण्यासारख्या विधायक कामाकडे त्याचा उपयोग होईल. आता अशी काही मंडळी अधिक दंगेखोर का असतात? तर त्याचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे, त्यांची युद्धप्रवृत्ती अधिक प्रबळ असते.
माणसाच्या काही उपजत प्रवृत्ती असतात. त्या बहुधा शरीरधारणोशी संबंधित असतात. उदा. भूक, निद्रा, लैंगिकता, क्रीडा, तशी युद्ध ही एक उपजत प्रवृत्ती! अधिक असलेली शारीरिक ऊर्जा खर्च करणारी म्हणून शक्यतो सामूहिक, मैदानी क्रीडाप्रकारांकडे त्या वृत्तीचा विनियोग करण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे उपद्रवकारक युद्धप्रवृत्तीची खुमखुमी विधायक कामाकडे वळते. ती उदात्तीकृत होते. ही उदात्तीकरणाची प्रवृत्ती प्रकृतीला संस्कृतीकडे नेऊ शकते; अन्यथा नुसत्याच मारामा:या केल्या तर ती विकृती होते.
मग युद्ध, मारामा:या, शारीरिक हिंसा या क्षेत्रतली परिभाषा अशा क्रीडाप्रकारात सर्रास वापरलेली दिसते. हुतुतू, कबड्डी, खो-खो अशा मैदानी देशी खेळांत ‘गडी मेला!’ (आऊट झाला.) प्रतिपक्षाचा ‘गडी मारला’ की आपल्या पक्षाचा गडी (खेळात तरी) ‘जिवंत’ होतो. संजीवनी मंत्रसारखा! धरणो, मारणो, बुकलणो, चितपट करणो ही भाषाच किती हिंसक आहे!
राजकारणात तरी दुसरे काय असते! निवडणूक काळातली वक्त्यांची भाषणो, नंतरच्या किंवा समांतर चालणा:या वृत्तपत्रीय टीका-टिपणीत तर ‘अमक्याने गड राखला, तमक्याचा धुव्वा उडाला, धूळदाण झाली, तोफा डागल्या, मुलुखमैदान (तोफ) उडाली, बालेकिल्ला राखला (किंवा पडला) ही परिभाषा तटस्थ वाचकांची करमणूकही करते आणि नेमके चित्रही उभे करते. व्यूहरचना (पक्षांची) ‘रणनीती’ ही तर चालतेच. आता असेच बुद्धिबळाच्या पटाकडे जाऊ. तेथे तर शह, मात, कोट करणो, आधी ‘प्यादी’ (पायदळ) मारण्यासाठी आणि राजाच्या रक्षणासाठी पुढे करणो. मग क्रमाने सगळे चौरंगी दळ (सैन्य) घोडदळ, उंटदळ, हत्तीदळ त्यांच्या त्यांच्या चालीने (अडीच घर, तिरके, सरळ) राजाच्या रक्षणार्थ झुंजवणो, मग वजीर, प्रधान आहेतच. त्यातही ही ‘व्यूहरचना’, ‘रणनीती’ भविष्याचा अंदाज घेत करीत राहणो, त्यासाठी बुद्धिबळ (पुन्हा बळ) खर्च करणो. प्रतिपक्षाची ही सगळी प्यादी, दळे ‘मारणो’ महत्त्वाचे! मग उरेल तो ‘जितम् मया’ म्हणून विजयी होतो. प्रतिपक्षाला खेळात काय, युद्धात काय, की राजकारणात काय, शह देणो, त्याच्यावर मात करणो ही ‘रणनीती’ खेळणाराच विजयी होतो.
मग युद्ध खेळले जाते आणि खेळाचे युद्ध होते. राजकारणात तर दोन्हींचा समसमासंयोग होतो असे वाटते.
पण.. पण हे सगळे जर उदात्तीकृत संस्कृतीकरणाच्या दिशेने गेले, तरच ती क्रीडा! राजकारणही! अन्यथा विनाशक, हिंसक विकृतीतून अटळपणो विनाशाचीच वाट प्रशस्त होणार!
 
तारा भवाळकर