शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

संपादकीय - या टग्यांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 08:26 IST

गायकवाडविरुद्ध गायकवाड या वैमनस्याला जमिनीच्या वादाची किनार आहेच; पण त्यामागे राजकीय दुश्मनीही  आहे.

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे दाहक उदाहरण आहे. आ. गायकवाड धाडधाड गोळ्या चालवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेच. निर्ढावलेपणाचा कळस म्हणजे आमदार महाशयांनी या गोळीबाराचे समर्थन केले आहे. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला असला तरी तशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती हे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. हे आमदार भाजपचे आणि ज्यांना गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे. कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याची जबाबदारी सरकारची असते आणि आमदार या नात्याने त्या सरकारचा भाग असलेला एक नेता थेट पोलिस ठाण्यात गोळ्या चालवतो याला राजकारणातील माफियागिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचे?

गायकवाडविरुद्ध गायकवाड या वैमनस्याला जमिनीच्या वादाची किनार आहेच; पण त्यामागे राजकीय दुश्मनीही  आहे. कल्याणच्या सुभेदारीवरून घडलेला हा संघर्ष आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी भूमाफियांचे पेव फुटले आहे. वाढते शहरीकरण, त्यातून जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यातून भूमाफियांचा झालेला सुळसुळाट हा सार्वत्रिक चिंतेचा विषय! कायदा हातात घेतला तरी आपले काहीही बिघडत नाही ही बेदरकारवृत्ती वाढीला लागली असून, तिला वेळीच वेसण घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जबाबदारी राज्य सरकारची व गृहखात्याची आहे. ड्रग माफियांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेत अलीकडे गृहखात्याने अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातही तशीच ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्यात सरकारमधील लोकांना अनेक ठिकाणी ‘आपल्या’ माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. सामान्य माणसांना भयमुक्त आणि कायद्याने चालणारे रामराज्य द्यायचे असेल तर असा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी, सुसंस्कृत आणि सभ्य राज्य अशी आहे. ती ओळख पुसू पाहणारे असभ्य, उर्मट, उन्मादी लोक कितीही मोठे असले तरी त्यांना वेसण घालणे गरजेचे झाले आहे. प्रश्न सरकारच्या मानसिकतेचा आहे. ‘आपला’ माणूस म्हणून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय दिले जाणार असेल तर सर्वच क्षेत्रांत माफियागिरी हातपाय पसरेल आणि एकदिवस सुसंस्कृत महाराष्ट्राला अशा अपप्रवृत्तींचा विळखा पडेल. त्यावेळी सगळे काही हाताबाहेर गेलेले असेल.

आधी राजकारणात या ना त्या मार्गाने प्राबल्य मिळवायचे, मग सत्तेतून पैसा आणि पैश्यांतून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबायचे हा बऱ्याच राजकारण्यांचा धंदा झाला आहे. सारेच तसे आहेत असे मुळीच नाही; पण टगेगिरी, भाईगिरीचे वाढते विश्व हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळेच कोणताही आपपरभाव न ठेवता गुंडांच्या नांग्या ठेचणे गरजेचे झाले आहे.  गोळीबाराच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मिठाचा मोठा खडा पडला आहे. आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने दोन पक्षांमधील विशेषत: ठाणे- कल्याण- पालघर पट्ट्यातील दुरावा वाढू शकतो. या गोळीबाराच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी आ. गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील भाजपने केलेली नाही. उलट गायकवाड यांनी त्यांच्या जीवावर बेतले म्हणून गोळीबार केल्याचे दिसते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणणे हे अतार्किक आहे आणि त्यातून गायकवाड यांना पाठीशी घालण्याचा हेतू डोकावतो. हे असे (म्हणजे गोळीबार वगैरे) काही करण्याचा आपला संस्कार नाही, पक्षाची त्यातून बदनामी होते अशी पुस्ती बावनकुळे एकीकडे जोडतात; पण पक्ष म्हणून त्यांच्याच नेतृत्वातील भाजप गायकवाड यांच्यावर कारवाई करत नाही ही भूमिका परस्परविरोधी आहे.

गणपत गायकवाड आणि त्यांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड यांनी आपसातील वाद वाढवू नये, असा आदेशवजा सल्ला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलेला होता; पण त्याचा काहीएक परिणाम झाला नाही आणि वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. जिल्ह्याजिल्ह्यातील महायुतीची घरातली भांडणे सोडविण्यात शीर्षस्थ नेतृत्वाला आलेले अपयशदेखील यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Firingगोळीबारulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी