शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:19 IST

निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे.

वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे हताश झालेली महाविकास आघाडी आणि ठाकरे ब्रँडचा गजर करीत तिच्यासोबत आलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर नव्याने सक्रिय झाली आहे. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष असे झाडून साऱ्या विरोधी पक्षांचे नेते आघाडीसोबत आहेत. महानगरपालिका व जिल्हा परिषदांसह तोंडावर आलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा या सक्रियतेला संदर्भ आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे.

एवीतेवी चार वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच नाहीत, तर मतदार यादी निर्दोष होईपर्यंत त्या आणखी थोड्या पुढे गेल्या तरी हरकत नाही, असे म्हणत थेट शरद पवारांसह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार वगैरे नेत्यांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना भेटले. तेव्हा, हे काम निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून चोक्कलिंगम यांनी हात झटकले. तेव्हा, बुधवारी या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या समक्ष चोक्कलिंगम यांची भेट घेतली. इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन, तिला जोडलेली व्हीव्हीपॅट मशीन हा विरोधकांच्या आक्षेपाचा आणखी एक पैलू आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग असल्यामुळे तिथे व्हीव्हीपॅट वापरणे शक्य नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. हा युक्तिवाद मुंबईला लागू होत नसल्याने विरोधक आक्रमक आहेत. या चर्चेत कळीचा मुद्दा मात्र सदोष मतदार यादी हाच आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्रातील विरोधक थोडे उशिरा जागे झाले आहेत.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील पडताळणी तसेच कर्नाटकातील महादेवपुरा, अलंद, महाराष्ट्रातील राजुरा या मतदारसंघांमधील घोळाचा मुद्दा ऐरणीवर आणला. या मुद्द्यावर बिहारमध्ये मताधिकार यात्रा काढली, तरी राज्यातील विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे म्हणा की अन्य कारणांनी, पण शांत होते. आता त्यांनी किमान निवडणूक यंत्रणेला प्रश्न विचारायला सुरुवात केली हे राजकीय सक्रियतेचे चिन्ह म्हणावे लागेल. देश तसेच राज्यपातळीवर निवडणूक आयोग सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आणि त्यावर भाजपचे उत्तर हा या भांडणाचा कळस आहे. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही स्पष्ट पराभव दिसत असल्यामुळे विरोधक हताश झाले आहेत आणि सुधारित मतदार यादी, ईव्हीएम वगैरे मुद्दे म्हणजे पराभवासाठी आताच सबबी शोधण्याचा प्रकार आहे, असे भाजपचे दिल्लीत आणि मुंबईत विरोधकांच्या आरोपांना दिलेले प्रत्युत्तर आहे. राज्यात सत्ताधारी महायुतीमधील शिंदेसेना याबाबतीत थोडी अधिक आक्रमकपणे भाजपसोबत आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी दबक्या आवाजात भाजपच्या सुरात सूर मिळविताना दिसते. खरे तर मतदार यादी निर्दोष असावी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तथापि, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना अप्रत्यक्षपणे भाजप निवडणूक आयोगाचा बचाव करताना दिसतो आणि त्यातूनच नवा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. परंतु, मतदार याद्यांमधील घोळ हा राजकीय भांडणापुरता मर्यादित नाही. किंबहुना मतदारांचे समाधान होईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय, तसेच राज्याच्या निवडणूक आयोगाकडून येत नसल्यामुळे हा वाद अधिक राजकीय बनला आहे. लोकशाहीने दिलेला समान मतदानाचा हक्क हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भाग आहे. मतदार म्हणून आपले नाव योग्यरित्या नोंदले गेले आहे का, निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते आहे का आणि आपण ज्या उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान केले त्यालाच ते मिळाले का, हे जाणून घेण्याचा मतदारांचा अधिकार राजकीय गदारोळापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचा आहे.

निवडणूक प्रक्रियेचा संरक्षक म्हणून आयोगाने हे गंभीरपणे समजून घेणे आवश्यक आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक, डिजिटल मतदार याद्या, मतदान व मतमोजणी केंद्रावरील व्हिडीओ पुरावे आणि अर्थातच मतदार यादी अशा मुद्द्यांवर विरोधकांनी केलेला प्रत्येक आरोप निवडणूक आयोगाला चिकटतोच, इतकी आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ही विश्वासार्हता टिकविणे, वाढविणे ही राजकीय पक्ष, मतदारांप्रमाणेच, किंबहुना काकणभर अधिक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi Awakens: Opposition United on Voter List Concerns.

Web Summary : Maharashtra's opposition unites, questioning voter list integrity ahead of local elections. They accuse the Election Commission of bias, echoing national concerns about EVMs and voter rolls. BJP dismisses claims as excuses for anticipated losses. The core issue remains voter list accuracy.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी