शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 5:59 AM

आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकैत यांनी तर सरकारमधील मंडळींनीच आंदोलन बदनाम करण्यासाठी दीप सिद्धूला घुसवल्याचा आरोप केला आहे. मात्र हिंसाचारामुळे  आंदोलनाची धार  कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

देशाच्या राजधानीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच सीमेवरून दिल्लीत घुसलेल्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करावा तितका कमीच आहे. कृषी कायद्याच्या विरोधात तब्बल दोन महिने दिल्लीच्या सर्व सीमांवर बसलेल्या शेतकऱ्यांचे शांततापूर्वक आंदोलन त्यामुळे बदनाम झाले असून, त्यांच्याविषयीची सहानुभूतीही कमी होणार आहे. ठरवून दिलेला मार्ग सोडून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टरवर आणि चालत निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना आवर घालणे पोलिसांना अशक्यच होते. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, बॅरिकेड्स तोडली, उभ्या केलेल्या बसेसची आपल्या ट्रॅक्टरनी मोडतोड केली. काहींच्या हातात तर तलवारी, फरशा, साखळ्या आदी शस्रेही होती. पोलिसांनी लाठीमार व अश्रुधूर केला, तेव्हा अनेकांनी पोलिसांवरच हल्ले चढविले. त्यात ३०० पोलीस जखमी झाले. मात्र पोलिसांनी आंदोलन संयमाने हाताळले. शेतकऱ्यांच्या या गटाने जणू ठरवूनच हे सर्व घडवून आणले, असे दिसत होते. त्यापैकी लाल किल्ल्यात घुसलेल्या मंडळींनी तर तिथे शीख पंथाचा ध्वज फडकावला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात विशिष्ट पंथाचा ध्वज फडकावणे म्हणजे एका प्रकारे आंदोलनात धर्म, पंथ यांच्या आधारे फूट पाडण्यासारखे आणि आंदोलनाची बदनामी करण्यासारखे होते.

हा ध्वज फडकावणारा दीप सिद्धू हा नेता भाजपशी संबंधित आणि पंजाबी अभिनेता आहे आणि तो लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी होता. त्यांच्यासोबतच्या अन्य नेत्यावर तर २०हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. कालच्या  प्रकाराचा संयुक्त किसान मोर्चाने उघडपणे निषेध केला आहे. हे दोन्ही नेते आणि त्यांची संघटना आमच्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हती, असेही जाहीर केले आहे. पोलिसांनी २०० जणांना ताब्यात घेतले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक योगेंद्र यादव यांच्यासह काही नेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हे नेते दिल्लीत घुसले नव्हते; पण शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात त्यांना अपयश आले, हे स्पष्ट आहे. मात्र शीख पंथाचा ध्वज लाल किल्ल्यावर फडकावणारा दीप सिद्धू आणि त्याचा गुन्हेगार सहकारी या दोघांनाही ताबडतोब अटक व्हायला हवी. त्यांनीच शेतकऱ्यांना भडकावले, असे उघड झाले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकैत यांनी तर सरकारमधील मंडळींनीच आंदोलन बदनाम करण्यासाठी दीप सिद्धूला घुसवल्याचा आरोप केला आहे. मात्र हिंसाचारामुळे  आंदोलनाची धार  कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी नेत्यांची साथ आहे, केवळ श्रीमंत शेतकरी आणि अडते यांचे हे आंदोलन आहे, त्यातील अनेकांचा शेतीशी संबंध नाही, आंदोलनात गुन्हेगार सहभागी झाले आहेत, असे आरोप आतापर्यंत विशिष्ट मंडळी करीतच होती. पोलिसांनीही ती शक्यता व्यक्त केली होती. तरीही कोणतेही कायदे, नियम न तोडता शेतकरी सीमांवर शांतपणे ठाण मांडून बसून होते. मात्र कालच्या हिंसाचारामुळे शांततेचा पुरस्कार करणारे शेतकरी आणि त्यांचे नेते यांच्यात चलबिचल सुरू झाली आहे. ते झाल्या प्रकारामुळे हबकून गेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात, सरकार दरबारी आपल्या मागण्या मान्य होण्याची शक्यता कमी आहे, असे त्यांना वाटत आहे. त्यात तथ्यही आहे. केंद्र सरकार आता त्यांना अजिबातच दाद देणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयही सहानुभूतीने पाहील, याची खात्री नाही. शिवाय देशातील सामान्यांना या शेतकऱ्यांविषयी जी आस्था वाटत होती, तीही निश्चितच आटेल. दिल्लीत घुसखोरी आणि हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आंदोलनाचे खूप मोठे नुकसान केले आहे. अशा एखाद दुसऱ्या प्रकरणामुळेही संपूर्ण आंदोलन कोसळू शकते. ते पुन्हा उभे करणे किती अवघड असते, याचा अंदाजही दिल्ली धडगूस घालणाऱ्यांना नसेल.

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आधी केवळ पंजाबमध्ये आंदोलन सुरू केले. मग हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरीही त्या आंदोलनात सहभागी झाले. सरकार काही प्रमाणात झुकले आणि न्यायालयाने तर कायद्यांची अंमलबजावणी स्थगित केली. आंदोलक विजयाच्या नजीक येऊन पोहोचले असताना दिल्लीत घुसून हिंसाचार करणाऱ्यांनी आंदोलनावरच बोळा फिरविला आहे. हिंसेने विजय मिळविता येत नाही, असे गांधीजी नेहमी सांगत. त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण देशाच्या प्रजासत्ताकदिनी काही जणांच्या हिंसेमुळे सर्व शेतकरीच अडचणीत आले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय