शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:41 IST

मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या २४ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पाऊस झाल्याचे सांगत पावसाच्या नावाने खडे फोडले.

मुंबई जेव्हा तिच्या नेहमीच्या वेगाने धावत असते तेव्हा ती सर्वांनाच प्रिय असते. मात्र  अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसाने तिच्या फुप्फुसात पाणी शिरून महामार्ग व गल्लीबोळ बंद होतात, मुंबई ज्या उपनगरीय लोकलच्या कण्याच्या आधारावर उभी असते तो कणा मोडून पडतो तेव्हा आचके देणारे, विव्हळणारे हे शहर पाहवत नाही. दरवर्षी पावसाळ्यात दोन-चारवेळा मुंबईच्या बाबतीत हे घडतेच. यंदा मे महिन्यात आंबे खाऊन मुंबईकरांचे मन अद्याप भरले नसतानाच आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि अनपेक्षितपणे धो धो पाऊस कोसळू लागला. घरातील छत्र्या, रेनकोट, पावसाळी बूट शोधताना मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाने केवळ मुंबईलाच फटका दिला नाही, बारामती, इंदापूर, सातारा वगैरे भागातही हाहाकार उडवून दिला. उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सोमवारी मुंबईत पावसाने कहर केला. वेगवेगळ्या भागात १०० ते २५० मिमी पाऊस झाल्याने मुंबईने अंथरूण धरले. एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या कफ परेड ते आरे या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवर ठिकठिकाणी पाणी साचले. वरळीच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची तर भयावह अवस्था झाली. पावसाच्या पाण्याचे धबधबे, कोसळलेला स्लॅब, पाण्यात पडलेल्या वायर, जिन्यावरून धो धो वाहणारे पाणी, पाण्याखाली गेलेले फलाट आणि वाहिन्यांच्या पत्रकारांना बाहेर हुसकावून लावण्याकरिता धडपडणारे सुरक्षारक्षक हे चित्र पाहून मुंबईतील मेट्रोची कामे सुमार दर्जाची झाल्याचा निष्कर्ष काढणे चूक नाही. वरळी नाका येथील ॲनी बेझंट रोडलगत असलेल्या नाल्यातून आलेल्या सांडपाण्यामुळे हे घडल्याचा दावा करीत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तिकडे भायखळा, मस्जिद, शीव, कुर्ला, दादर वगैरे भागात रेल्वेमार्गात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. लागलीच रेल्वे प्रशासनाने काखा वर केल्या आणि महापालिकेच्या ड्रेनेज लाइन ओव्हरफ्लो झाल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचले, असा कांगावा सुरू केला.

मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या २४ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पाऊस झाल्याचे सांगत पावसाच्या नावाने खडे फोडले. विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या नावाने शिमगा केला, तर महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे करून ठेवलेल्या भ्रष्टाचाराच्या डोंगरामुळे मुंबई बुडाल्याचा जावईशोध लावला. ज्या मुंबईची सत्ता काबीज करण्याकरिता पुढील चार-सहा महिन्यात यांच्यात चुरस लागेल त्या मुंबईवर संकट येते तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारण्यास मुंबईचा एकही सुपुत्र तयार होत नाही, हेच मुंबई बुडण्याचे खरे कारण आहे. मुंबईच नव्हे तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो, याच्या सुरस व चमत्कारिक कहाण्या साऱ्यांनीच ऐकल्या आहेत. नालेसफाईची कामे ही तर उघड दरोडेखोरी आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यातील भ्रष्टाचार सध्या गाजत आहे. या भ्रष्टाचारात नोकरशहा, सत्ताधारी व विरोधक सारेच वर्षानुवर्षे सामील आहेत. महापालिका हद्दीतील नालेसफाईत भ्रष्टाचार आहे आणि रेल्वे हद्दीतील नाले साफ करणारे कुणी हरिश्चंद्राचे अवतार आहेत, हेही खरे नाही. अचानक आलेल्या मुसळधार पावसाला सक्षमपणे सामोरे जाण्यास कुठलीही यंत्रणा तयार नव्हती हेच वास्तव आहे. गेल्या काही वर्षात मुंबईतील इंचन‌् इंच जमिनीवर बांधकाम करून ते विकण्याची स्पर्धा लागली आहे. डांबरी रस्त्यांना खड्डे पडतात म्हणून सिमेंट काँक्रिट रस्ते बांधले आहेत. मैदाने, बगिचे गिळून तेथेही बांधकाम करण्याचा भस्म्या रोग राजकारणी, बिल्डर यांना जडला आहे. पाणी झिरपण्याकरिता मातीच शिल्लक नाही. महामुंबईकरदेखील या आपत्तीला जबाबदार आहेत. बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्याचा मोह आवरत नाही. घरातील नको असलेल्या वस्तू नाले, गटारात फेकून देण्याची खोड सुटत नाही. जी मुंबई कोट्यवधी लोकांची भूक भागवते त्या मुंबईची काळजी घ्यावी, ती बकाल होऊ नये याकरिता काही बंधने पाळावी, असे महामुंबईकरांना वाटत नाही हेही या शहराचे मोठे दुर्दैवच आहे. 

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटRainपाऊसMumbaiमुंबई