शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर लाच; भाजपाच्या लोकांनी घेतली तर दक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:57 IST

काँग्रेसमधील माणसे ४० वर्षात धनवान झालेली दिसली हे खरे. मात्र, भाजपमधील अनेकांनी त्यांना अवघ्या पाच-सहा वर्षांत मागे टाकले हेही खरे आहे. काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर ती या विभागाच्या मते लाच, भाजपच्या लोकांनी घेतली तर मात्र दक्षिणा.

शरद पवारांसह सहकार क्षेत्रातील ७० नेत्यांवर ऐन निवडणुकीच्या काळात केंद्रीय आर्थिक अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्याचा मोदी सरकारचा विचार स्तुत्य व त्याला असलेले आर्थिक स्वच्छतेचे प्रेम प्रगट करणारा आहे. या विभागाचे वैशिष्ट्य त्याच्या एकाक्ष असण्याचे व एकारलेल्या दृष्टीचे आहे. त्याला फक्त भाजपविरोधी राजकीय नेत्यांचा ‘भ्रष्टाचार’ दिसतो. भाजपश्रेष्ठींमधील त्या दुर्गुणविशेषाचा त्याला साक्षात्कार होत नाही. नाही म्हणायला एकट्या पवारांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना आरोपी बनवणे तर पक्षपाताचा आरोप होईल, म्हणून त्या खात्याने त्या ७० जणांत इतर पक्षांतील काही लहान व बिनकामाच्या लोकांचाही समावेश केला आहे. त्यात भाजपचेही काही लोक असले, तरी त्याचा खरा रोख पवारांवर आहे. या विभागाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावर केलली कारवाई आज आपण पाहत आहोतच. त्याने भुजबळांची केलेली सूडोत्तर सुटका व राणेंवर ठेवलेली टांगती तलवारही आपल्याला दिसते.

काँग्रेसमधील माणसे ४० वर्षांत धनवान झालेली दिसली हे खरे आहे. मात्र, भाजपमधील अनेकांनी त्यांना अवघ्या पाच-सहा वर्षांत मागे टाकले हेही खरे आहे. मात्र, काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर ती या विभागाच्या मते लाच ठरते, भाजपच्या लोकांनी घेतली, तर ती मात्र दक्षिणा ठरते. सबब तो पुण्यकृत्याचा मोबदला मानला जातो. या घटनेमुळे ७८ वर्षांचे वय असलेल्या पवारांवर काही परिणाम व्हायचा नाही. चालू निवडणुकात त्यांच्या सभांना जमणारी गर्दी पाहिली की, गेली ६० वर्षे राज्याचे राजकारण करणाऱ्या या नेत्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे, हे कुणालाही समजते. ज्या कामाखातर आज त्यांच्याविरुद्ध हा ससेमिरा लावला जात आहे, ते सहकार क्षेत्रातील कुरण गेली ४० वर्षे तसेच आहे व त्यावरील चर्चाही तेवढीच आहे.

सध्याच्या पवारांवरील आरोपांचा आरंभ काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अल्पकालीन कारकिर्दीतच झाला, असे आजचे सरकार सांगत असले, तरी या कारवाईचा मुहूर्त पाहता, त्याचे राजकीय कारण दडून राहत नाही. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराची धुमाळी सुरू आहे आणि अशा वेळी सरकार हे प्रकरण पुढे आणत असेल, तर त्या मागचा हेतू न समजण्याएवढे लोकही आता खुळे राहिले नाहीत. राज्यात गेल्या काही वर्षांत अनेक पक्षांची अनेक सरकारे आली. मात्र, पवारांचा दबदबा व दरारा कायम राहिला. एवढी वर्षे राजकारणात राहिलेल्या व राज्यातील सहकाराचे क्षेत्र वाढविलेल्या या नेत्याचे साऱ्या समाजाशी व पक्षातील नेत्यांशी अतिशय आत्मीयतेचे संबंध राहिले आहेत.

जी माणसे अलीकडच्या काळात त्यांना सोडून गेली, त्यांनाही पवारांविषयी गैर बोलणे कधी जमले नाही व जमणार नाही. ज्यांनी तो प्रकार केला, त्यांना त्याचा पश्चात्ताप फार लवकर अनुभवावा लागला आहे. जो नेता दीर्घकाळ सत्तेत असतो आणि राजकारणात पुढाकार घेतो, त्याला मित्रांएवढेच शत्रूही असणार. मात्र, पवारांचे शत्रूही त्यांच्याविषयीचा दुष्टावा असलेले दिसले नाहीत. आताचे सरकार पवारांच्या परंपरेला विरोध करणाऱ्या संघपरिवाराचे आहे. त्याच्या नेत्यांनी देशाला काँग्रेसमुक्त बनविण्याची भाषा वापरली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात पवार आहेत आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तोवर आपल्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थैर्य लाभू शकणार नाही, याची भाजपच्या नेत्यांना व सरकारातील मंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे. पवारांच्या पक्षातील अनेक माणसे व पुढारी त्यांचा पक्ष सोडून भाजपत जाताना राज्याने अलीकडे पाहिले. मात्र, त्यापैकी कुणालाही जनतेत पवारांएवढा आदर कधी मिळविता आला नाही. पवारांचे हे मोठेपणच भाजप व संघ यांना सलणारे आहे. पवारांनी काँग्रेस सोडून आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाने काँग्रेस विरुद्ध निवडणुकाही लढविल्या. मात्र, काँग्रेसच्या लोकांनीही पवारांविषयी कधी अपशब्द वापरले नाहीत. माणूस स्वपक्षातील असो वा विपक्षातील त्याच्याशी मैत्र जोडणे हे पवारांच्या राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध होणारी कारवाई येत्या काळातील बदलणाऱ्या परिस्थितीवरच अवलंबून आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा