शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

संपादकीय - शहाणे करून सोडावे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 6:08 AM

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत

सत्ताकारणाच्या धुराळ्यात जेव्हा समाजकारणाचा विसर पडतो त्या वेळी राजकीय नेतृत्वाला भानावर आणण्याचे काम बुद्धिवंतांचे असते; परंतु सध्याचा काळ हा तथाकथित बुद्धिवंतांचा आहे आणि त्यांचेही समाजभान हरवलेले असल्यामुळे या तथाकथित बुद्धिवंतांच्या टोळ्याही सत्ताकारणाची समीकरणे सोडविण्यात मश्गूल आहेत. खऱ्या बुद्धिवंतांची प्रभावळ या तथाकथित टोळ्यांनी झाकोळून टाकल्याने प्रसारमाध्यमांनाही त्यांचा विसर पडलेला दिसतो; पण अशा परिस्थितीत वास्तवाची जाणीव लक्षात घेऊन इतरांना उपदेशाचे डोस न पाजता आपल्या कृतीतून सर्वांना संदेश देत वर्तमानाचे भान देण्याचे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने उचलले आहे. गेल्या चार वर्षांचा दुष्काळ आणि या वर्षाचा ओला दुष्काळ या अस्मानी संकटाने मराठवाडा-विदर्भ पिचून गेला आहे.

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत. त्यांच्यासमोर शिकण्यासाठी पैशाचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाकडून पैसा येणार नाही हेच वास्तव आहे. अशाही परिस्थितीत अनेक विद्यार्थी कमवा-शिका योजनेतून काम करीत परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. अगदी विद्यापीठाची फळबाग, उद्यान येथेही निंदणी, खुरपणीची कामे हे विद्यार्थी करतात; पण या वर्षीची परिस्थिती आणखीनच बिकट असल्याने शैक्षणिक शुल्काचे पैसे कोठून भरायचे, अशी मूलभूत समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या वर्षी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाचे स्वागत करीत व्यवस्थापन परिषदेने एकमुखाने त्याला मान्यताही दिली. कुलगुरूंची ही कृती राज्याचा विचार करता छोटी असली तरी मोठा संदेश देणारी आहे. सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारक्षेत्रात काय करू शकतो, काही नाही तरी खारीचा वाटा उचलू शकतो, असा सकारात्मक संदेश देणारी ही त्यांची कृती आहे. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. अगदी तक्षशिला, पाटलीपुत्र अशा प्राचीन विद्यापीठांच्या कामाचा धांडोळा घेतला तर ती जशी ज्ञानाची केंद्रे होती तशी सामाजिक, राजकीय चळवळीचे प्रेरणास्रोतही होते. त्याही पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ऋषिमुनींचे आश्रम म्हणजे ध्यान-धारणा, ईश्वर पूजांचे केंद्र नव्हतेच. मुळात वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम हे प्रयोगशाळाच म्हणता येतील.

 उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात कापसाची लागवड ही फार पूर्वीपासून आहे. वत्सगुल्म नावाचा ऋषी जो की कापूस शास्त्रज्ञ होता. त्याने प्रथम कापसाचा प्रयोग वºहाडात केल्याचे दाखले आहेत. त्याचा आश्रम वाशिम येथे असल्याचे म्हटले जाते. अणूच्या क्षेत्रात कणाद या ऋषीचे नाव घेतले जाते, तर शून्याचा शोध लावणाºया भास्कराचार्य या ऋषींचा आश्रम चाळीसगावजवळच्या पाटणादेवी येथे होता आणि त्याचा गणितातील ‘लीलावती’ हा ग्रंथही महत्त्वाचा मानला जातो. हे पूर्वीचे दाखले आहेत. राजसत्ता चुकत असेल तर तिच्याविरुद्ध वैचारिक आंदोलन उभे करण्याचे काम विद्यापीठातूनच होते. आणीबाणीविरुद्ध पहिले नवनिर्माण आंदोलन गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केले होते. त्यातून पुढे राजकीय चळवळ उभी राहिली. दुसरे आंदोलन जे की, आसाममध्ये परकीय नागरिकांविरुद्ध घडले ते असम गणपरिषदेचे होते; पण ते छेडणारे भृगुकुमार फुकनपासून सगळेच नेते विद्यार्थी होते. जगभराचा विचार केला तर अशी ढीगभर उदाहरणे देता येतील. शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा विद्यापीठाचा निर्णय हा असाच इतरांसाठी दिशादर्शक आहे. ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ या भूमिकेचीच आज जास्त गरज आहे आणि ती या विद्यापीठाने बजावली म्हणून कौतुक़

विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही, तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा