शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी

By सुधीर महाजन | Updated: August 13, 2019 17:15 IST

या बोधकथेचा पूरग्रस्तांना राजकीय पक्ष, नेते यांच्याकडून देण्यात येत असलेल्या मदतीशी दुरान्वयेही संबंध नाही.

- सुधीर महाजन

महिनाभरापासून अर्जुनाची चिडचिड वाढली होती. कारणही तसेच होते. त्याचा सखा कृष्ण जवळपास रोजच कर्णाची तारीफ करीत होता. त्याच्या दातृत्वाचे गोडवे गात होता. आज तर हद्द झाली. कृष्ण-अर्जुन वाटिकेत भुंग्याचा गुंजारव ऐकत बसले असताना कर्ण तेथे आला, तोच अर्जुनाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कृष्णाने आत्मीयतेने त्याचे स्वागत केले आणि त्याच्याशी गप्पा सुरू झाल्या. अर्जुन मात्र मुखस्तंभासारखा बसून होता. बोलता-बोलता कृष्णाने कर्णाच्या उदारतेची तारीफ सुरू केली. तो मात्र विनयाने अधोवदन झाला होता. ‘कृष्णा माझे कौतुक जरा जास्तच करतो हं’ असे बोलत त्याने निरोप घेतला. कृष्णाने सहेतुक अर्जुनाकडे कटाक्ष टाकला, तर अर्जुन रागाने धुमसत होता. तो उठला आणि तरातरा निघून गेला. कृष्णाच्या चेहऱ्यावर सहेतुक स्मित झळकले.

या घटनेला पंधरा दिवस उलटले असतील हो, दोघेही मित्र रथावर स्वार होऊन जरा प्रदेशाचे अवलोकन करायला निघाले. परत येताना दोन टेकड्यांकडे अंगुलीनिर्देश करीत कृष्ण म्हणाला, ‘अर्जुना, या दोन टेकड्या सोन्याच्या आहेत; हे सगळे सोने आसपासच्या गावकऱ्यांमध्ये वाटून टाक़ शेवटी ही आपल्या राज्याची म्हणजे पर्यायाने प्रजेचीच संपत्ती आहे.’ पंधरा दिवसांत कृष्णाच्या बोलण्यात कर्णाचा उल्लेख नसल्याने अर्जुनाचे मनही ताळ्यावर आले होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अर्जुन उठला, त्याने आसपासच्या गावात डांगोरा पिटायला सेवकांना पाठवले. टेकडीवरील सोने अर्जुन प्रजेला देणार आहे, तरी प्रजेने तेथे येऊन रांगेत उभे राहून घेऊन जावे. दवंड्या पिटल्या, निरोप गेले आणि लोकांनी गर्दी केली. अर्जुन टेकडीवर कुदळ, फावडे, टोपले घेऊन गेला आणि गर्दीचा अंदाज घेऊन प्रत्येकी दोन टोपले सोने मिळेल अशी घोषणा करीत खोदायला सुरुवात केली आणि सोने वाटप सुरू झाले. या घटनेला दोन महिने उलटले तरी अर्जुनाचे काम संपत नव्हते. तो रोज खोदून आणि सोने वाटप करून थकून गेला होता.

दरम्यानच्या काळात कृष्ण कुंजवनात रुक्मिणीसह काही दिवस घालवायला गेला, कारण राजकारणाच्या धावपळीत तिच्याशी प्रेमालाप करण्याची सवडच त्याला मिळाली नव्हती. चांगला तीन आठवडे घालवून तो प्रफुल्लित मनाने परतला. दोन दिवस उलटले तरी अर्जुनाचा पत्ता नव्हता. त्याने चौकशी केली असता नकुल म्हणाला, देवा तू त्याला काम सांगितले ना तर तो अहोरात्र त्यात डुंबून गेला आहे. आपण सोने देऊन लोकांना उपकृत करतो आहोत, असे वाटत असल्याने तो कृतकृत्य झाला आहे. आपले दातृत्व कर्णापेक्षा मोठे, अशी त्याची मनोभावना झालेली दिसते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे कृष्ण कर्णासह अर्जुनाच्या महालात पोहोचला, तर तो सोन्याच्या टेकड्यांकडे जाण्याच्या तयारीत होता. चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी मन उत्साही होते. ‘अर्जुना, आज तुझे काम बंद ठेव, आपल्याला वनात जायचे आहे, थोडी जलक्रीडा करू,’ असे सांगून तिघेही वनात गेले. सायंकाळी परत येताना कृष्ण कर्णाला म्हणाला. ‘अंगराज, या समोरच्या चार टेकड्या सोन्याच्या आहेत. हे सोने तू प्रजेत वाटून टाक’ कर्णाने अधोवदन होऊन त्याला नमस्कार केला. आता ही गोष्टही अर्जुनाला खटकली; पण तो काही बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्याने कर्ण आणि अर्जुनाला भोजनाचे निमंत्रण दिले. अर्जुन थकलेला होता. कर्ण मात्र नेहमीप्रमाणे प्रफुल्लित होता. त्याच्या कवचकुंडलांचे तेज आज जरा वेगळेच भासत होते. भोजन, तांबूल पान झाल्यानंतर कृष्णाने विचारले, ‘‘अर्जुना, तुझे काम कधी संपणार?’’ अर्जुन म्हणाला, ‘‘मित्रा आणखी महिनाभर तरी काम पुरणार आहे.’’ त्याने कर्णाकडे कटाक्ष टाकत ‘‘कौंतेया, काम सुरू केले की नाही?’’, ‘‘कृष्णा माझे काम संपले’’  असे उत्तर देताच अर्जुन चमकला. ‘‘अरे एका दिवसात’’ या कृष्णाच्या प्रश्नावर तो म्हणाला, ‘‘ते सोने प्रजेला देण्याचे काम तू सांगितले होते. शिवाय ते माझेही नव्हते. तू फक्त माझ्यावर ती जबाबदारी टाकली होती. आज सकाळी मी प्रजेला तेथे बोलावले आणि सांगितले की, हे चार टेकट्या सोने तुमचे आहे. यथाशक्ती घेऊन जा आणि मी माझ्या नित्यकर्माला लागलो.’’ कृष्णाने सहेतुक अर्जुनाकडे कटाक्ष टाकला.

टीप : या बोधकथेचा पूरग्रस्तांना राजकीय पक्ष, नेते यांच्याकडून देण्यात येत असलेल्या मदतीशी दुरान्वयेही संबंध नाही. कोणीही बोधकथेचा आधार घेऊन वडाची साल पिंपळाला लावण्याचा वृथा प्रयत्न करू नये.  

टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाState Governmentराज्य सरकार