शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

दिवाळी, पोलीस आणि आर. आर. आबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 5:40 AM

पोलिसांना घरच्या मंडळींबरोबर एकही सण साजरा करता येत नाही, याचे आबांना मोठे दु:ख होते! ते म्हणत, सणावारातसुद्धा तणाव; पोलीस काय करतील?

- वसंत भोसलेसंपादक, लोकमत, कोल्हापूरदिवाळी पाडव्याला वृत्तपत्रांना सुट्टी असते. दुसऱ्या दिवशीचा अंक प्रसिद्ध होत नाही. वर्षातून मिळणाऱ्या पाच सुट्ट्यांपैकी एक साजरी करीत त्या दिवशी सांगलीत घरी थांबावे वाटे. मात्र, आम्हा पत्रकारांचे मित्र आर. आर. आबा पाटील यांनी एक ओढ लावून ठेवली होती. दिवाळी पाडव्याला सांगली जिल्ह्यातील त्यांच्या अंजनी या छोट्या गावात तीन दिवस मुक्कामास आलेल्या आबांना भेटायला जायचे आणि गप्पागोष्टी करायच्या.

उपमुख्यमंत्री असताना ते गृहमंत्रिपदही सांभाळत होते.  प्रोटोकॉल असल्याने नेहमी प्रचंड पोलीस बंदोबस्त असायचा; पण  दिवाळीचे ते तीन दिवस अपवाद असत. वसूबारसेच्या सायंकाळी गावी पोहोचताच गाडीतून उतरल्यावर आबा पोलिसांना प्रेमाने निरोप द्यायचे, ‘तीन दिवस गावी जा. दिवाळी पाडवा संपल्यावर या! मी कोठेही जाणार नाही. २००५च्या दिवाळीला आबा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक वर्षाने आम्ही पत्रकार  गेलो.   वातावरणच तसे होते. एकच लालदिव्याची गाडी झाडाखाली उभी होती. त्यांचे गावाकडील स्वीय सहायक पी. एल. कांबळे आणि बाळू गुरव यांना भेटून चौकशी केल्यावर कळले, आबा आहेत की! पलीकडच्या गल्लीत श्यामरावतात्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना भेटायला गेलेत अन् पाच-दहा मिनिटांत पांढऱ्या पॅंटच्या दोन्ही खिशात हात घालून स्लिपर ओढत आलेच ते! गावभर चालतच फिरायचे.  पोलिसांचा ताफा आणि ‘सरा बाजूला मंत्रिमहोदय येत आहेत’, हा सर्व रुबाब गायब असायचा.  विचारल्यावर  म्हणायचे, ‘दिवाळीच्या सणाला पोलिसांना सुट्टी दिली आहे. हा एकमेव असा सण आहे की, ज्यावेळी पोलीस बंदोबस्त लागत नाही, अन्यथा  सणवार आनंद साजरा करणारे असतात; पण सणवारातही समाजात कधी तणाव निर्माण होईल, हे सांगता येत नाही. याची फार खंत वाटते. आपला समाज कधी प्रगल्भ होणार?  गणेशोत्सवात अकरा दिवस पोलिसांना एक दिवस सुट्टी मिळत नाही हो!!’- असे ते अत्यंत कळवळून सांगत राहायचे. वारंवार पोलिसांचा आणि बंदोबस्ताच्या यंत्रणेचा संपर्क येत असूनही हे कधी लक्षात आले नव्हते. सर्वत्र पोलीस उभे आहेत, म्हणजे किती चोख कारभार आहे, असे वाटायचे. आबा सांगायचे , गणेशोत्सवात मुंबईत पोलीस तीन-तीन दिवसांनी घरी जातो. थोडी झोप काढून परत येतो. त्याला घरच्या मंडळींबरोबर सणही साजरा करता येत नाही. गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य खरेदीला मुलांबरोबर न गेलेल्या असंख्य पोलिसांशी माझे नेहमी बोलणे होते, त्यांचे दु:ख कोणाला कळणार?’

आबा तसे बातम्यांचा झराच होते. दिवाळी पाडव्यादिवशी मात्र एकही बातमी करायची नाही. उद्या तुमचे पेपरच निघणार नाहीत, बरे झाले, असे म्हणत मनमोकळ्या गप्पा मारत बसायचे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण फारच दुर्मीळ असतात.  काहीवेळा मुलगा रोहितची भेटदेखील व्हायची नाही. दौरे करून येईपर्यंत तो झोपलेला असायचा. सकाळी लोकांच्या भेटीगाठीत आबा असायचे तेव्हा रोहित शेजारच्या सावळज गावातील इंग्रजी शाळेत पोहोचलेला असायचा. एकदा मी त्यांच्या गाडीतून तासगावला येत होतो.  रोहितला मोटारसायकलवरून घेऊन येताना दिसताच आबांनी गाडी थांबवायला सांगितली आणि गाडीतूनच भेट घेतली. तेव्हा रोहित विचारत होता, आबा, सर्व पोलीस गेले का? कारण रोहितचे लाड पोलीस करीत असत. 

दिवाळी पाडव्याची ही भेटीची परंपरा सलग दहा वर्षे चालू होती. २०१५ च्या १६ फेब्रुवारीला आबा गेले आणि  अंजनीची वारी खंडित झाली. आजच्या पाडव्यानिमित्त ते दिवस आठवले की, सद्‌गदित व्हायला होते. एक जिंदादिल कार्यकर्ता, सामान्य माणसांच्या मनात डोकावणारा आणि त्याचवेळी सतत बातम्यांचा झरा त्यांच्या मुखातून वाहत असायचा. त्यामुळे  पत्रकार मंडळी जाम खुश असत! राज्याचे नेतृत्व करायच्या गणिताची कोष्टके त्यांच्या मनात सोडविण्याचा नेहमी प्रयत्न असायचा हे  फारच कमी जणांना माहीत होते. असे आबा, पोलीस आणि आजचा दीपावली पाडवा!

टॅग्स :Policeपोलिस