शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 12:46 IST

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेली पिछेहाट स्वीकारण्याचे धारिष्ट्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाखविले नाही

- धर्मराज हल्लाळे

यशाला कैक बाप असतात. मात्र अपयश अनाथ असते, असे विधान प्रचलित आहे. परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीभोवती यशाचे वलय उभे केले जाते अथवा उभे राहिलेले दिसते. अगदी खेळातही कर्णधार विजयाची पताका स्वत:च्या खांद्यावर घेतो. मात्र कुठलाही जय एकट्याचा असत नाही आणि पराजयही कोण्या एकाचे अपयश राहत नाही. परंतु देशातील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यशाचे एकमेव शिलेदार विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी राहिले. श्रेय घेण्याची नव्हे तर देण्याची इतकी स्पर्धा लागली की, महापालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत जी विजयाची शृंखला उभारली त्याचे शिरोमणी मोदीच राहिले. त्यात तथ्य होते. देशातील १८ ते २५ वयोगटातील मतदारांनी मोदींमध्ये आपले नेतृत्व पाहिले. भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी या सर्वच मुद्यांवर नरेंद्र मोदी जितक्या त्वेषाने बोलत होते, तितक्याच गतीने त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावला होता. ज्याचे पडसाद लोकसभेच्या यशानंतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रारंभाला दिसले. देशाचा नकाशा न्याहाळला तर जिकडे तिकडे कमळ उमलताना दिसत होते. या सर्व यशकथांमध्ये गुंग झालेल्या भाजपा नेत्यांना जनतेत झालेल्या अपेक्षांच्या क्रांतीची म्हणावी तशी जाणीव झाली नाही, हे राज्यांच्या निकालावरून स्पष्ट होते. 

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेली पिछेहाट स्वीकारण्याचे धारिष्ट्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाखविले नाही. एका वाक्यात ही निवडणूक राज्याच्या कारभारावर होती, त्यात मोदी यांचा थेट संबंध नाही हाच आशयार्थ राजनाथ सिंह यांच्या बोलण्याचा होता. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार समोर केले असले, तरी प्रचाराच्या केंद्रस्थानी मोदी आणि त्यांचे ‘सुशासन’ होते. या राज्यांच्या निवडणुकीत यश मिळाले असते तर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या पदरी नव्हे, तर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्याच खात्यात विजयाचा करिश्मा जमा केला असता. परिणामी, पराभवाच्या जबाबदारीपासूनही ते आता दूर जाऊ शकत नाहीत. तुम्ही बदल घडवाल, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण कराल, काळा पैसा भारतात आणाल, या अपेक्षा जनतेने ठेवल्या होत्या. जे काही घडेल ते तत्काळ आणि विनाविलंब लाभ पदरात पडेल, अशीही सर्वसामान्यांची धारणा होती. नोटाबंदीनंतर प्रारंभीचा काळ संमिश्र प्रतिक्रियांचा होता. धनदांडग्यांचा पैसा जप्त होईल अन्यथा त्यांना कुठेतरी नदी-नाल्यांमध्ये सोडून द्यावा लागेल, असे चित्र काहींनी रंगविले. परंतु गरीब माणूसच रांगेत थांबून बेजार झाला. शेकडोंनी प्राण गमावले. अन् कोठेही चलनातून बाद झालेल्या नोटा रस्त्यावर, नदी-नाल्यात दिसल्या नाहीत. शिवाय पैसे दडवून ठेवणाºयांवर दृश्य स्वरुपात कारवाई झाली नाही. आॅनलाईन, डीजिटल अर्थव्यवस्थेच्या गप्पा झाल्या, प्रत्यक्षात दोन हजार रुपयांची नोट अल्पावधीत तिजोºयांमध्ये बंद झाली. घोषणाबाजी करून, रोज नव्या निर्णयांनी बदलाचे वलय निर्माण करून काही काळ जनतेचे रंजन झाले, परंतु त्यांचे मन परिवर्तन करण्यात शासकांना यश मिळाले नाही.

लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचंड बहुमतानंतर ज्या तऱ्हेने एकामागून एक राज्य भाजपाच्या ताब्यात येत होते, सर्व स्वायत्त संस्थांवर प्रभाव टाकला जात होता त्यावरून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे, असा आरोप विरोधक करू लागले. खरे तर संसदीय लोकशाही असलेल्या भारतात काही काळ एखादा पक्ष अर्थात एखादी व्यक्ती एककल्ली कारभार करू शकेल, परंतु हुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत, हेच या निकालाने ठणकावून सांगितले आहे. साक्षरता, सुशिक्षितपणा आणि राजकीय शहाणपण अशा सर्व कसोट्या पूर्ण करून भारतीय मतदारांनी ज्यांना बहुमत दिले त्यांच्याकडे सत्तेचे केंद्रीकरण दिसताच त्यांना बाहेरचाही रस्ता दाखविला. स्वातंत्र्यानंतर विकास किती झाला हे सर्वजण स्वअनुभवावरून सांगत राहतील, परंतु या देशाची लोकशाही प्रगल्भ आणि प्रगल्भ होत आहे. केंद्रात दांडगे बहुमत असले तरी देशातील राज्यांचे कारभारी वेगवेगळे राहतील, याची काळजी या निकालाने घेतली आहे. केंद्राची सूची आणि राज्याची सूची घटनेत नमूद आहे. केंद्र कोणते कायदे करू शकते, राज्य कोणते कायदे करू शकते, कोणाचे काय अधिकार आहेत, हे घटनेत नमूद आहे. सार्वभौम देशात राज्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. त्यामुळे देशात कोणीतरी हुकूमशहा जन्माला येईल आणि मनमर्जी करेल हे होणे नाही.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल