शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

संपादकीय - मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:24 IST

जागतिक मुष्टियुद्ध विजेता माईक टायसन याने आपल्या “बकेट लिस्ट”मध्ये भारतातील ताजमहाल आणि धारावी ही दोन ठिकाणे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

गौतम अदानी

माझी धारावीची पहिली ओळख १९७० च्या दशकाच्या अखेरीस झाली. मी मुंबईत नवीनच होतो. हिऱ्यांच्या व्यापारात आपले नशीब अजमावून पाहण्याच्या ओढीने या शहराने मला खेचून आणले होते. त्यावेळी पहिल्यांदा धारावी पाहिली आणि अनेक धर्म, संस्कृती, भाषांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या, पोटापाण्याच्या शोधात आलेल्यांना पोटाशी घेणाऱ्या तिथल्या औद्योगिक कोलाहलाने मंत्रमुग्ध झालो. धारावीच्या गल्ल्यांमधून भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेचे प्रतिध्वनी सारख्याच तीव्रतेने ऐकू येत असत; पण या साऱ्या कोलाहलाही स्वतःची अशी एक लय होती. धारावीने मला अस्वस्थ केले होते, नक्की! तिथल्या  लोकांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पाहताना मला वाटे, कधीतरी इथल्या लोकांची परिस्थिती बदलेल का? 

- आजही या प्रश्नाने माझी पाठ सोडलेली नाही. मुंबई विमानतळावर विमान  उतरताना खाली पसरलेली धारावी मानवी गोधडीसारखी दिसते. भिन्न पार्श्वभूमीच्या स्थलांतरितांना अगदी सहजपणे सामावून घेण्याची मुंबईची क्षमता खरेच अचाट आहे : धारावी हे त्या क्षमतेचे प्रत्यक्ष रूप!या पार्श्वभूमीवर जेव्हा धारावीच्या पुनरुज्जीवनाची संधी चालून आली, त्यावेळी साहजिकच मी ती दोन्ही हातांनी घट्ट पकडली. या पुनर्वसन प्रकल्पासाठी अतिउत्साहात आम्ही जी बोली लावली, ती दुसऱ्या बोलीपेक्षा तब्बल अडीच पट अधिक होती. कदाचित या साऱ्याचा संबंध मुंबईच्या पहिल्या दर्शनाने माझ्यावर जो अमीट ठसा उमटवला, त्याच्याशी असावा! 

आजवरच्या इतिहासात कोणीच हाती घेतलेला नाही, अशा आकाराच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आम्ही प्रारंभ करतो आहोत. या प्रवासातील पर्वताएवढ्या आव्हानांची मला कल्पना आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प  तीन कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे : हा जगातील सर्वांत मोठा शहरी पुनर्वसन आणि पुनरुत्थानचा प्रकल्प आहे.  या प्रकल्पांतर्गत जवळपास दहा लाख लोकांचे पुनर्वसन होणार आहे. रहिवाशांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील, विभिन्न आकाराच्या औद्योगिक आणि व्यापारी संस्थांच्या पुनर्वसनाचाही यात समावेश आहे. पात्र आणि अपात्र अशा सर्वच गाळेधारकांचे समग्र आणि सर्वसमावेशक पुनर्वसन या प्रकल्पात करण्यात येणार आहे.

आज माझ्याकडे आहे ती धारावीकरांचे आयुष्य बदलण्याची सदिच्छा आणि हा प्रकल्प यशस्वी करण्याचा दृढ निश्चय.  धारावीचे पुनर्निर्माण हे मानवी चेहऱ्याचे असेल. जास्तीत जास्त लोकांच्या मतांचा समावेश पुनर्विकास धोरणात केला जाईल. फक्त धारावीतले रहिवासीच नव्हे, तर अशा स्वरूपाच्या कामातली तज्ज्ञता असलेल्या, या प्रकल्पाबाबत आस्था असलेल्या प्रत्येक मुंबईकराशी सल्लामसलत करायला आम्ही तयार आहोत. धारावीच्या पुनर्निर्माणात सर्वच मुंबईकरांचा सहभाग असला पाहिजे. धारावीच्या पुनर्निर्माणात मुंबईचा स्वत:चा चेहरा, तिचे चैतन्य, तिची हिंमत, तिचा निर्धार हे सारे सारे उमटले पाहिजे. आणि हे सारे करताना “धारावीचा आत्मा” हरवणार नाही, याची काळजीही घेतली पाहिजे.प्रकल्प निर्मितीच्या काळात धारावीकरांचे कुठेही विस्थापन होणार नाही. त्यांना फक्त एकदाच त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागेल ते म्हणजे नवीन घरात प्रवेश करण्यासाठी.

आपले नवीन घर कसे असावे,  हे ठरविण्यात त्यांचा सहभाग असेल. गॅस, पाणी, वीज, स्वच्छता आणि सांडपाणी निर्मूलन, आरोग्य सुविधा, विरंगुळ्यासाठी सुविधा आणि मोकळ्या जागा अशा सर्व सुविधांनी ही घरे युक्त असतील. धारावीकरांना जागतिक दर्जाच्या शैक्षिणक आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. “आम्ही धारावीचे रहिवासी आहोत” हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येईल, असे हे नवे चित्र असेल! सर्वांत मोठे आव्हान असेल ते इथल्या रोजगार निर्मिती केंद्रांचे पुनर्निर्माण.  धारावीचा कायाकल्प एका आधुनिक उद्योग केंद्रात व्हावा, असा माझा निर्धार आहे. इथल्या सूक्ष्म आणि लघुउद्योगांचे पुनर्वसन होऊन धारावी हे नवीन युगातील रोजगाराचे केंद्र होईल.  यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरी गट यांची मदत घेतली जाईल. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील.  सामायिक सुविधा केंद्रांमध्ये सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल. तसेच संशोधन केंद्र, डेटा सेंटर (विदा केंद्र), सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सुविधा केंद्र यांचाही समावेश असेल. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सवर आधारित एका संघटित आणि योजनाबद्ध बाजारपेठेचा विकास केला जाईल.

धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना जवळपास ५० वर्षांचा इतिहास आहे. यावेळच्या निविदा प्रक्रियेतील काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे (अपात्र गाळेधारकांचे पुनर्वसन, रेल्वेच्या ४५ एकर जागेचा समावेश) धारावीचा विकास हा विनाविलंब सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या सर्वच सरकारांचे प्रयत्न, राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आणि केंद्र सरकारची  मोलाची साथ हेही महत्त्वाचे घटक! या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या हिमालयाएवढ्या मोठ्या आव्हानांची मला कल्पना आहे. त्यासाठी मी आणि माझे सहकारी अथक प्रयत्न करू! 

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर माईक टायसन यांनी जर धारावीला पुन्हा भेट दिली, तर ती त्याला ओळखू येणार नाही हे खरे.. पण त्यांना हेही जाणवेल, की या प्रक्रियेत धारावीचा आत्मा हरवलेला नाही! डॅनी बॉयलसारख्यांना धारावीत नवे मिलेनिअर सापडतील, पण त्यांच्यामागे स्लमडॉग ही उपाधी नक्की नसेल.

(लेखक अदानी उद्योग समुहाचे प्रमुख आहेत)

टॅग्स :dharavi-acधारावीGautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय