शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एक काय ते ठरवा!

By admin | Updated: October 4, 2015 22:20 IST

खूप मागे जाण्याची गरज नाही. रालोआच्या पहिल्या कारकीर्दीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकचे लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ व पंतप्रधान नवाझ शरीफ या दोहोंशी चर्चा केली.

खूप मागे जाण्याची गरज नाही. रालोआच्या पहिल्या कारकीर्दीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकचे लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ व पंतप्रधान नवाझ शरीफ या दोहोंशी चर्चा केली. ‘चर्चा होनी चाहिए’ असे वाजपेयी म्हणत राहिले आणि त्याला दहशतवाद चालू राहिला पाहिजे हे प्रत्युत्तर मिळत गेले. संपुआच्या दोन्ही कार्यकाळातही काही वेगळे झाले नाही. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नकोतच असा आग्रह धरणारे लोक उभयपक्षी चर्चेला विरोध करीत असतानाही कधी अधिकाऱ्यांच्या, कधी राजदूतांच्या, कधी सचिव आणि मंत्र्यांच्या, तर कधीमधी सरकार प्रमुखांच्या पातळीवरही चर्चा होत राहिल्या. मधेच चर्चारोध जाहीर करायचा आणि कालांतराने पुन्हा चर्चेचे दरवाजे खुले करायचे. पाकिस्तानने अधिकृत चर्चेच्या आधी काश्मिरातील फुटीर हुरियतच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेकडे कधी दुर्लक्ष करायचे, तर कधी तेच निमित्त करून चर्चा रद्द करायची. इतके धरसोडीचे राजकारण सातत्याने सुरू असल्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनो) खुल्या अधिवेशनात पाकिस्तानला जे तथाकथित ठणकावले त्याला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्नच आहे. युनोच्या स्थापनेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या अधिवेशनात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचेही भाषण होऊन गेले. संघटनेला सत्तर वर्षे पूर्ण होऊनही ती अद्याप दहशतवादाची व्याख्या करू शकली नाही अशी टीका करून त्यांनी दहशतवादाच्या संदर्भात चांगला आणि वाईट अशी जी काही विभागणी केली जाते, तिच्याविरुद्ध जोरदार टीका केली. सुषमा स्वराज यांनीही त्यांच्या भाषणात या मुद्द्याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांची शाबासकी मिळवली. याच अधिवेशनात स्वराज यांच्या आधी बोलून गेलेल्या नवाझ शरीफ यांनी मांडलेला चार कलमी कार्यक्रम धुडकावून लावून, आधी ‘दहशतवाद’ सोडा हा एककलमी कार्यक्रम त्यांनी समोर ठेवला. ‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून येऊ शकत नाहीत’ असेही त्या म्हणाल्या. पण तसे म्हणणाऱ्या त्या काही पहिल्या भारतीय नेत्या नाहीत. याआधीही अनेकांकरवी हे वाक्य उच्चारून झाले आहे. तरीही स्वराज यांच्या या रोखठोक भूमिकेचे माध्यमांनी स्वागत केले असल्याने जर स्वराज यांनी जाहीर केलेली भूमिकाच यापुढेही कायम राहणार असेल तर त्यात यापुढील काळात बदल होता कामा नये. अमेरिकेचा दबाव आला तरी!