शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात... पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:19 IST

शेतक-यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना, इतकंच काय तर त्यांची आंदोलनेही गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि दखल घेतलीच तर आंदोलकांना दिलेल्या शब्दांचे उत्तरदायित्वही जबाबदारीने स्वीकारल्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

- राजेश शेगोकारशेतक-यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना, इतकंच काय तर त्यांची आंदोलनेही गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि दखल घेतलीच तर आंदोलकांना दिलेल्या शब्दांचे उत्तरदायित्वही जबाबदारीने स्वीकारल्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आंदोलक शेतक-यांच्या ज्या मागण्या सरकार मान्य करते, लेखी आश्वासन देते, त्यांची पूर्तता होते का, याचा मागोवा घेतला तर निराशाच पदरी पडते.यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली. ती राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. सरकारने त्या आत्महत्येची तेव्हाच दखल घेतली असती, कारणांचा शोध घेतला असता व त्यावर उपाययोजना करणारी धोरणे आखली असती, तर आज विदर्भातून सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र देशभरात पोहोचले नसते. सरकार कुणाचेही असो, त्यांच्या अजेंड्यावर शेतकरी, कामगार व गरिबांच्या कल्याणाचा मुद्दा असतोच असतो! प्रत्यक्षात मात्र या वर्गांचे कल्याण होण्याऐवजी, ज्यांच्या कल्याणाचा कुठेही गवगवा होत नाही अशाच घटकांचे ‘कोट कल्याण’ होते, हा आजवरचा अनुभव आहे.शेतकºयांचे प्रश्न, त्यांच्या वेदना, इतकेच नव्हे तर त्यांची आंदोलनेही गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि यदाकदाचित दखल घेतलीच, तर त्याचे उत्तरदायित्वही जबाबदारीने स्वीकारल्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. परवा सांगता झालेल्या किसान लाँग मार्चबाबतही असाच अनुभव आला. हा लाँग मार्च सुरू झाला तेव्हा त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतल्या गेली नाही; मात्र लाँग मार्च मुंबईजवळ पोहोचताच, डोळ्यात आग असलेला शिस्तबद्ध जनसमुदाय पाहून सरकारला जाग आली. सरकारने चर्चा केली, सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी निवेदनही दिले. २०० किलोमीटरची पायपीट यशस्वी झाल्याचे समाधान आदिवासी-शेतकºयांच्या चेहºयावर उमटले, तर दुसरीकडे आजही शांततेच्या ‘गांधी’ मार्गाने गेल्यास सरकार नमते, हा चळवळीत कार्य करणाºया कार्यकर्त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. हे सर्व खरे असले तरी, सरकार ज्या मागण्या मान्य करते त्या पूर्ण होतात का, याचा धांडोळा घेतल्यास निराशाच पदरी पडते. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, गेल्या डिसेंबरमध्ये अकोल्यात तीन दिवस झालेल्या शेतकरी आंदोलनाचे देता येईल. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचने कापूस, धान व सोयाबीन उत्पादकांची ‘कासोधा’ परिषद घेऊन, त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. तीनच दिवसात साºया देशाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले होते. सरकारने त्याची दखल घेत सर्व मागण्या मान्य करून १५ जानेवारीपर्यंत या मागण्यांची पूर्तता होईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रत्यक्षात १५ मार्च उजाडला तरी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. प्रत्येक मागणीच्या पूर्ततेसाठी अटी अन् शर्थीची मेख मारून ठेवली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. आता ‘कासोधा’ आंदोलनाच्या आश्वासनपूर्तीसाठी शेतकरी जागर मंचने पुन्हा एकदा १९ मार्चपासून आंदोलनाची हाक दिली आहे. किसान लाँग मार्चच्या सांगतेप्रसंगी सरकारने दिलेल्या आश्वासनांची गतही ‘कासोधा’प्रमाणे होऊ नये! ‘कासोधा’ असो की लाँग मार्च, शेतकºयांच्या मागण्या न्यायोचितच आहेत. रेशन दुकानातून नियमित धान्य मिळणे, जुन्या शिधापत्रिका बदलवून मिळणे, निराधारांना मिळणारे अनुदान वाढवून देणे, अशा स्वरूपातील मागण्यांसाठी शेतकºयांवर आंदोलन करण्याची वेळच का येते? सरकार याचा विचार करणार आहे का? कर्जमाफीचेही गुºहाळ ‘तत्त्वत:’, ‘निकषांसह’, ‘सरसकट’मध्ये अजूनही अडकले असल्याने अजूनही अस्वस्थता आहे, त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळावा; अन्यथा अशी आंदोलने आणखी प्रखर होतील.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च