शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

गुन्ह्याची चढती कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 4:35 AM

महिलांची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. मग ते अगदी निर्भया प्रकरण असो अथवा कोपर्डीचे. महिला सुरक्षितता हा सुरक्षा यंत्रणांसह सरकारचा जरी प्राधान्याचा विषय असला तरीदेखील महिलांच्या संदर्भातील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र निर्माण करते.

महिलांची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. मग ते अगदी निर्भया प्रकरण असो अथवा कोपर्डीचे. महिला सुरक्षितता हा सुरक्षा यंत्रणांसह सरकारचा जरी प्राधान्याचा विषय असला तरीदेखील महिलांच्या संदर्भातील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र निर्माण करते. महिला अत्याचाराच्या घटना तर रोज माध्यमांतून मांडल्या जात असतातच. मात्र आता बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जारी केलेली आहे. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील गायब झालेल्या पाच लाख लोकांमधून ९४ हजार आपल्या राज्यातील आहेत. त्यात तब्बल ४९ हजार महिलांचा समावेश आहे. ही आकडेवारी केवळ गेल्या वर्षीची आहे. यातून या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढते. या आकडेवारीमुळे महाराष्ट्राची एक काळी बाजू उजेडात आली आहे. खरेतर पूर्वी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य समजले जायचे. अनेक ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंग मिळवण्यासाठी धडपड करीत. अगदी निवृत्तीनंतरही महाराष्ट्रात आयुष्य घालवणारे शेकडो अधिकारी आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची सुरक्षेची प्रतिमा ढासळत चालल्याचे चित्र दिसते. नव्या आकडेवारीमुळे राज्याची गुन्ह्याची दिसलेली चढती कमान गौरवास्पद नक्कीच नाही. एकेकाळी स्कॉटलंड पोलिसांबरोबर तुलना होणाºया मुंबई पोलिसांची कामगिरीही या आकडेवारीच्या निमित्ताने तपासायला हवी. गुन्ह्यांमध्ये महिलांचा वाढता वापर केवळ चिंताजनक नाही, तर गुन्ह्याची परिसीमा गाठणारा आहे. त्यामुळे बेपत्ता होणाºया महिलांचा शोध घेण्याचे प्रमाण आणि त्यामागची कारणे याचा गांभीर्याने तपास व्हायला हवा. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची ही आकडेवारी गुन्ह्यांचे प्रमाण सिद्ध करणारी अधिकृत आकडेवारी असल्याने पोलिसांच्या कामगिरीचा आलेखही एका बाजूने स्पष्ट होतो. आधीच सांगलीसारख्या घटनांनी पोलीस खात्याला काळिमा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातून ही गुन्ह्यांची वाढती आकडेवारी भूषणावह नाही. त्यामुळे सर्वच समाजधुरिणांनी याचा सर्व स्तरावर विचार करायला हवा. राज्याच्या विकासाचा अजेंडा कितीही बडवला तरी वाढती गुन्हेगारी हेही राज्याची गडद बाजू दाखवणारी चिंताजनक बाब असते. हा चिंतेचा विषय आता चिंतनाचा व्हायला हवा. आपल्याकडे अनेक उत्तम पोलीस अधिकाºयांचावारसा आहे. काही जुन्या, जाणत्या धुरिणांना एकत्र करून विचार विनिमय व्हायला हवा. तरच राज्याची खºया अर्थाने प्रगती साधणे शक्य होईल.

 

टॅग्स :Crimeगुन्हा