शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठीचा लॉक-अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:06 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने सारासार विचार करून, टप्प्या-टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांनी ती मार्गदर्शिका म्हणून स्वीकारायला हवी आहे जेवढ्या लवकर संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल आणि संपूर्ण समाज अनलॉक होईल, त्या दिवसाची प्रतीक्षा करायला हवी.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा संपूर्ण समाजाने करायचा उपाय म्हणून लॉकडाऊनकडे पाहिले जाते. भारतात याची सुरुवात २४ मार्चच्या मध्यरात्री झाली. काही आठवड्याने ती वाढविण्यात आली, तशी संसर्गाची साखळी तोडण्यास मदतच होत गेली. लॉकडाऊनचे अनेक परिणाम झाले असले तरी, त्याला पर्याय नव्हता. आता हा लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने उठविण्यात येत आहे. अनलॉक फोर च्या मार्गदर्शक सूचना शनिवारी जाहीर करण्यात आल्या. रेल्वे, दिल्ली वगळता इतर शहरांतील मेट्रो, आंतरराष्टÑीय विमानसेवा, मल्टिप्लेक्स थिएटर्स आदींना बंद कायम ठेवला आहे. २१ सप्टेंबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. ९ वी ते १२वीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीने शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येईल. या चौथ्या अनलॉक मार्गदर्शिकेनुसार राज्यांनी परस्पर निर्णय घेण्यावर काही बंधने घातली आहेत. ते फार चांगले झाले. अनेक विषय, मग रेल्वे सुरू करणे असो, शैक्षणिक वर्ग चालू करणे असो, आंतरराज्य वाहतूक असो, यासाठी देशात एकच निर्णय लागू करणे आवश्यक होते.

परीक्षा घेण्यावरून केंद्र विरुद्ध काही राज्ये हा जो वाद चालू आहे, तो निश्चितच शोभनीय नाही. कोरोनाविरुद्धचा लढा हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. त्याच्या विरोधातील लढा हा सद्विवेकबुद्धीचा वापर करून आणि वैज्ञानिक पातळीवरच झाला पाहिजे. त्याला राजकीय रणांगणातील चर्चेचा रंग देण्याची गरज नाही. त्याला अवास्तव महत्त्व माध्यमांनी सुद्धा दिले नसले पाहिजे. आपण दैवीवादावर अवलंबून राहू शकत नाही. मंदिर सुरू करणे हा केवळ सापेक्षी श्रद्धेचा विषय आहे, विज्ञानाचा नाही. तरी सुद्धा हातात घंटा घेऊन देशातील जबाबदार सत्तारुढ पक्षाने शनिवारी महाराष्टÑभर गोंधळ घातला. एका बाजूला केंद्र सरकार सावधपणे पावले टाकत असताना आणि समाज भयभीत झालेला असताना, अशा आणीबाणीच्या प्रसंगी आंदोलने कसली करता आहात? संपूर्ण जगात आपली चेष्टा होत असेल. लॉकडाऊन चालू ठेवावा की उठवावा, रोजगार निर्मिती करावी, उत्पादन सुरू करावे, व्यापार - वाहतूक चालू करावी, यावर जगातील अनेक देशांत चर्चा चालू आहे. मोर्चे निघत आहेत. अशावेळी आपण मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी आंदोलने करतो आहोत. मंदीरे सुरू करण्याची तुलना दारूशी करून ही चर्चाही खालच्या स्तरावर घेऊन जात आहोत. उद्या १ सप्टेंबरपासून लॉकडाऊनविषयी घ्यायची काळजी महत्त्वाची आहे. काही राज्यात आणि शहरात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचे तांडवही कमी होत नाही. अशावेळी केंद्राने राज्यांना आणि राज्यांनी केंद्र सरकारला समजून घेऊन काम करायला हवे. कोरोना आटोक्यात आल्याने ही लढाई संपणारी नाही. आपली संपूर्ण अर्थव्यवस्थाही मंदावली आहे. विकास दर उणे होण्याचा धोका व्यक्त केला जातो आहे.
केंद्रात कोणत्या पक्षाचे आणि राज्या-राज्यांत कोणकोणत्या पक्षांची सरकारे आहेत, हे निकष अर्थव्यवस्थेला लागू पडत नाहीत. त्याकडे ‘अर्थ’शास्त्र म्हणूनच बघावे लागणार आहे, त्यासाठी अनलॉक फोर फार महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सारासार विचार करून, टप्प्या-टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यासाठी काही पावले उचलता येतील, याची रचना केली आहे. यावर वाद न करता, सर्वांनी ती मार्गदर्शिका म्हणून स्वीकारायला हवी आणि जेवढ्या लवकर संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल आणि संपूर्ण समाज अनलॉक होईल, त्या दिवसाची प्रतीक्षा करायला हवी. राजकारण करीत असताना, कोरोनाविरुद्ध सलग पाच महिने झगडत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही विचार करायला हवा. सीमेवर लढणाºया बहाद्दर जवानांप्रमाणेच आरोग्य कर्मचारी जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. आजवर २१९ डॉक्टर्सवर काम करताना मृत्यू ओढवला आहे. अनेक पोलीस कर्मचारी अहोरात्र सेवा बजावताना मृत्यू पावले आहेत. उत्तर प्रदेशच्या महिला मंत्रीमहोदया देखील मृत्यूला सामोºया गेल्या. संसर्गात येताच भेदभाव होणार नाही, हे विज्ञानाने सिद्ध होते; तसे अनलॉक फोर राबविताना अधिक विवेकाने काम केले पाहिजे. संपूर्ण देशाने एकवटले पाहिजे. कोरोनाला निर्बंध घालता येईल, पण लगेच संपणार नाही, याची जाणीव ठेवावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक