शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारची प्रतिमा बदलणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2016 03:22 IST

मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली होती

मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली होती; परंतु केंद्रीय अर्थसंकल्पाने ही प्रतिमा बदलण्याचे काम केले आहे. शेती, शेतकरी, ग्रामीण विकास याबाबत हे सरकार तेवढेच जागरूक असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. सध्या शेती व्यवसाय हा डबघाईचा झाला आहे. गेल्या दोन वर्षांत शेतीचा विकास झालेला नाही. देशाचा आर्थिक विकास ८ ते ८.५ टक्के या दराने व्हायचा असेल, तर शेतीचा विकासदर किमान ४ टक्के हवा आहे. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पात शेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी अर्थातच सिंचन क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पांना गती देणे, शेततळी व विहिरींची संख्या वाढविणे या माध्यमातून सिंचन क्षमतेत वाढ केली जाणार आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी व पिकांसाठी विमा योजना लागू करणे, याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.देशाला दरवर्षी १० ते १२ लक्ष टन डाळी लागतात. यापैकी डाळींचे ७० टक्के उत्पादन देशात घेतले जाते, तर उर्वरित ३० टक्के साठा आयात करावा लागतो. यंदा तुरीच्या डाळीचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. अशा परिस्थितीत डाळींचे उत्पादन कसे वाढविता येईल, त्याचा साठा कसा केला जाईल, यावरही उपाययोजना केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा, यासाठी देशांचे एकत्रित (इंटिग्रेटेड) मार्केट तयार केले जाणार आहे. उत्पादित मालास कुठे चांगला भाव मिळेल, हे समजावे यासाठी ‘ई- मार्केट’ ही संकल्पनाही राबविली जाणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या १०० रुपयांपैकी लाभार्थ्यांपर्यंत २० रुपयेच पोहोचतात, असे बोलले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येते. उच्चशिक्षण व कौशल्य विकासाचाही अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. ‘सगळ्यांसाठी सर्व काही’, असेच या बजेटचे वर्णन करावे लागेल. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्वच्छ भारत, अशा घोषणा करणे सोपे असते; परंतु त्यांची अंमलबजावणी केवढ्या क्षमतेने व वेगाने केली जाते, हे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट बरोबर आहे. वाटचालदेखील योग्य दिशेने सुरू आहे. विकासाची ही गाडी किती वेगाने धावू शकते, यावरच तिचे यशापयश अवलंबून आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनाही पुढाकार घ्यावा लागेल.