शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

केंद्र सरकारची प्रतिमा बदलणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2016 03:22 IST

मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली होती

मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली होती; परंतु केंद्रीय अर्थसंकल्पाने ही प्रतिमा बदलण्याचे काम केले आहे. शेती, शेतकरी, ग्रामीण विकास याबाबत हे सरकार तेवढेच जागरूक असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. सध्या शेती व्यवसाय हा डबघाईचा झाला आहे. गेल्या दोन वर्षांत शेतीचा विकास झालेला नाही. देशाचा आर्थिक विकास ८ ते ८.५ टक्के या दराने व्हायचा असेल, तर शेतीचा विकासदर किमान ४ टक्के हवा आहे. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पात शेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी अर्थातच सिंचन क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पांना गती देणे, शेततळी व विहिरींची संख्या वाढविणे या माध्यमातून सिंचन क्षमतेत वाढ केली जाणार आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी व पिकांसाठी विमा योजना लागू करणे, याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.देशाला दरवर्षी १० ते १२ लक्ष टन डाळी लागतात. यापैकी डाळींचे ७० टक्के उत्पादन देशात घेतले जाते, तर उर्वरित ३० टक्के साठा आयात करावा लागतो. यंदा तुरीच्या डाळीचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. अशा परिस्थितीत डाळींचे उत्पादन कसे वाढविता येईल, त्याचा साठा कसा केला जाईल, यावरही उपाययोजना केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा, यासाठी देशांचे एकत्रित (इंटिग्रेटेड) मार्केट तयार केले जाणार आहे. उत्पादित मालास कुठे चांगला भाव मिळेल, हे समजावे यासाठी ‘ई- मार्केट’ ही संकल्पनाही राबविली जाणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या १०० रुपयांपैकी लाभार्थ्यांपर्यंत २० रुपयेच पोहोचतात, असे बोलले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येते. उच्चशिक्षण व कौशल्य विकासाचाही अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. ‘सगळ्यांसाठी सर्व काही’, असेच या बजेटचे वर्णन करावे लागेल. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्वच्छ भारत, अशा घोषणा करणे सोपे असते; परंतु त्यांची अंमलबजावणी केवढ्या क्षमतेने व वेगाने केली जाते, हे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट बरोबर आहे. वाटचालदेखील योग्य दिशेने सुरू आहे. विकासाची ही गाडी किती वेगाने धावू शकते, यावरच तिचे यशापयश अवलंबून आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनाही पुढाकार घ्यावा लागेल.