शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

दृष्टिकोन : माणसावर सूक्त रचावे... माणसाचेच गाणे गावे माणसाने...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:47 AM

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे

धनाजी कांबळे।    आर्थिक विषमता दाखविणारे सोहळे होत असताना प्रेमविवाहांना म्हणावी तेवढी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. कधी जात, तर कधी धर्म आडवा येतो, हे भीषण वास्तव आजही आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर, समाजसुधारकांनी जातनिर्मूलनासाठी प्रबोधन केले. त्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील यांनी जातीअंताचा आग्रह धरला. मात्र, आजही जात समाज व्यवस्थेला चिकटून बसलेली आहे. जातपंचायती आजही जिवंत आहेत, हे पुरोगामित्वाचे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव. आंतरजातीय-धर्मीय विवाह केला, म्हणून आजही दिवसाढवळ्या ‘सैराट’ होत असताना समाज मात्र संवेदनाहीन झालेला दिसतो. अशा वेळी जाती-धर्माची बंधनं तोडून लग्न करू इच्छिणाºया तरुण-तरुणींनी मुक्तपणे सर्वसंमतीने पुढाकार घ्यावा, यासाठी डॉ. गणेश देवी यांनी गांधी जयंतीलाच आवाहन केले होते. देवी यांनीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, तेव्हा आपले पुरस्कार सरकारला परत केले. पुरस्कारवापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपित असताना त्यांनी दक्षिणायन सुरू केलं. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे. त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अनेकांनी वेळोवेळी व्यवस्थेचे कान टोचले आहेत. तरीही आज विज्ञान-तत्रंज्ञान वापरणारे, एरवी पुढारलेले वाटणारे लोकही लग्नाचा विचार करताना, जात-धर्म प्राधान्यक्रमाने पाहतात. अजूनही समाज काय म्हणेल, या भीतिपोटी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करायला अनेक जण कचरतात. इतकेच नाही, तर प्रेमविवाह टिकत नाहीत, अशी प्रौढी मिरविली जाते. भारताकडे राफेल सुपुर्द होत असताना लिंबू-मिरचीचा प्रयोग करणारी कृती विज्ञानालाच आव्हान देणारी असते. अतिप्रगतशील आणि अतिपुरातन अशा या मानसिकतेत देश महासत्ता बनण्याचा मार्ग सुकर होईल की कठीण होईल, हाही प्रश्नच असतो. मात्र, हीच देशाला मागे नेणारी कृती जात-धर्माला चिकटून असलेले लोक करतात. डॉ. देवी यांनी तरुणाईला केलेले हे आवाहन धाडसीच म्हणावे लागेल. मात्र, आठ-दहा दिवसांत तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, असा प्रतिसाद त्यांना दिला आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील शेकडोंनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत आणि आजही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

धार्मिक ध्रुवीकरण होत असतानाच्या काळात त्यांना मिळालेला हा प्रतिसाद आशादायक आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम निश्चितपणे एक प्रायोगिक उपक्रम ठरेल. या विधायक उपक्रमाला समाजाने साथ दिल्यास आॅनर किलिंगचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. ‘पत्त्यांसारख्या पिसल्या पाहिजेत जाती. कळायलाच नको की, अमक्याची जात कोणती आणि तमक्याचा धर्म कोणता?...’ अशा पद्धतीने प्रतिसाद देणारी पत्रं देवी यांचा उत्साह वाढविणारी आहेत. कोलकाता, दिल्ली, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील बुलडाणा, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली अशा विविध गावांमधून सुमारे ४,५०० तरुणांनी ई-मेल आणि पत्रे पाठविली आहेत. लग्न करताना प्रगल्भ प्रेमामध्ये एकमेकांविषयीची काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान गरजेचं असतं, जात किंवा धर्म नव्हे, हे पटवून देण्याचा, समाजातील जाती-धर्माच्या कोंडवाड्यांना हादरा देण्याचा गणेश देवी यांचा हा प्रयत्न दिशादर्शक ठरावा.कवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात...

‘‘आभाळाला आजा आणि जमिनीला आजी मानून,त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे,चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे,एक तीळ सर्वांनी करंडून खावा,माणसावरच सूक्त रचावे,माणसाचेच गाणे गावे माणसाने...’’

(लेखक लोकमत वृत्त समुहात वरिष्ठ उपसंपादक, आहेत )

टॅग्स :marriageलग्नCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र