शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Budget 2019: भ्रामक आणि दिशाहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 04:32 IST

सरकार जी आकडेवारी सादर करत आहे त्याच्या समर्थनासाठी कोणताही स्रोत किंवा आधार सरकार देत नाही.म्हणूनच ती विश्वासार्ह आहे असे म्हणता येणार नाही.

- डॉ. भालचंद्र मुणगेकरआज सादर करण्यात आलेला हंगामी अर्थसंकल्प स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पाळलेल्या अनेक संकेतांचा भंग करणारा आहे. उदाहरणार्थ गेल्या ६८ वर्षांमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी व्यापक माहिती देणारा आर्थिक पाहणी अहवाल संसदेला सादर करण्यात येत असे. या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी घडलेल्या सर्व प्रमुख घटना, सरकारचे विविध आर्थिक कार्यक्रम, त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचे मूल्यमापन हे संसदेला सादर करण्यात येत असे. प्रामुख्याने या पाहणी अहवालात अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत उदाहरणार्थ शेती, उद्योग, व्यापार, राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, परदेश व्यापार इत्यादी सर्व क्षेत्रांविषयी व्यापक माहिती, आकडेवारी दिली जात असे. या वर्षी प्रथमच मोदी सरकारने या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीचा भंग केला आणि हे पूर्णपणे असमर्थनीय आहे. अशा प्रकारे आर्थिक पाहणी अहवाल सादर न करणे ही आपोआप घडलेली घटना नाही. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारचा देशातील जनतेपासून खरी माहिती लपवून ठेवण्याचा जो सातत्याने प्रयत्न आहे त्याचाच हा एक भाग आहे.हा अर्थसंकल्प अंतरिम जरी म्हणण्यात येत असला तरी त्यातील तरतुदी पाहता तो पूर्ण अर्थसंकल्प आहे असे दिसून येते. हासुद्धा संकेताच्या विरोधात आहे. अर्थसंकल्पाविषयी सर्वात आक्षेपार्ह घटना म्हणजे रोजगार निर्मितीविषयी सरकारने कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवली नाही. राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारे सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे आज देशामध्ये बेरोजगारीचा दर ६.१ असून गेल्या ४५ वर्षांतील हा बेरोजगारीचा उच्चांक आहे. परंतु हा अहवाल मंत्रिमंडळाने अजून मान्य केला नाही, असे अत्यंत तकलादू कारण देत मोदी सरकारने हे निष्कर्ष बासनात बांधून ठेवले आहेत. परंतु कोंबडे झाकून ठेवले तरी उजाडायचे थांबत नाही. त्याचप्रमाणे देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली. विशेषत: ग्रामीण आणि त्यातही शहरी भागातील सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १५ ते १८ टक्क्यांपर्यंत आहे. याला अनेक कारणे आहेत. परंतु मोदी सरकारचे रोजगारविषयक कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याचा हा परिणाम आहे.अर्थसंकल्पात मुद्रा योजनेची प्रशंसा करण्यात आली आहे. परंतु तीही अनाठायी आहे. उदाहरणार्थ मुद्रा योजनेअंतर्गत १५ कोटी खातेधारकांना ७ लाख ४३ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे सांगितले आहे. म्हणजे सरासरी प्रत्येकी ५० हजारांचे कर्ज होते. आजच्या परिस्थितीत ५० हजार रुपयांत कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही. या १५ कोटी लोकांपैकी ज्यांना किमान पाच लाखांवर कर्ज दिले गेले असेल तेच कोणता ना कोणता व्यवसाय उभा करू शकतात. मात्र सरकारने अशी कोणतीही आकडेवारी दिली नाही.शेतीतील पेचप्रसंगावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. स्वामिनाथन आयोगाने सांगितल्याप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक भाव देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. प्रत्येकी २ हेक्टर अर्थात पाच एकरापर्यंत शेती असलेल्या शेतकरी कुटुंबांना १५ हजार रुपये नक्त रक्कम देण्यात येईल, असे सांगितले आहे. यातून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल असे नाही. अर्थसंकल्पात नोटाबंदीची स्तुती करण्यात आली आहे. ही स्तुती म्हणजे नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवर जे दुष्परिणाम झाले ते लक्षात घेता लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजून सावरलेली नाही. असे असताना २०१७-१८ साली ७.२ असलेला विकासाचा दर सरकार आता ८.२ असल्याचे सांगत आहे. याला कोणताही आधार नाही. एकूणच हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला कोणतीही स्पष्ट दिशा न देणारा आणि भ्रामक आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019