शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

काळ्या बाजाराचे घाणेरडे राजकारण

By अतुल कुलकर्णी | Updated: April 23, 2018 00:42 IST

ई-पॉस नावाची यंत्रणा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवली. ही यंत्रणा म्हणजे एक छोटेसे मशिन असते

गोरगरिबांना रेशन दुकानातून धान्य देताना त्याची आधारशी जोडणी केल्याने राज्यात १० लाखांहून जास्त बोगस रेशनकार्ड धारक असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर तब्बल ३८ हजार मे.टन धान्य रेशन दुकानातून कमी उचलले गेले. याचा अर्थ गरिबांसाठीच्या योजनेवर दुकानदार आणि अधिकारी किती मोठ्या प्रमाणावर संगनमताने दरोडा टाकत होते हे लक्षात येते. आता सगळ्यांचे पितळ उघडे पडत आहे हे लक्षात येताच या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचे काम सुरू झाले आहे.ई-पॉस नावाची यंत्रणा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवली. ही यंत्रणा म्हणजे एक छोटेसे मशिन असते, जे ग्राहकाच्या आधार नंबरशी व सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाशी जोडले गेले आहे. एखाद्या रेशनकार्डावर जेवढी नावे आहेत त्यांच्यापैकी कुणाच्याही बोटाचे ठसे जुळले तर त्या कार्ड धारकांना धान्य यातून देता येते. यामुळे कुणीही कुणाचेही कार्ड घेऊन आला आणि धान्य घेऊन गेला असे करण्यावर यामुळे बंधने आली. परिणामी १० लाखाहून अधिक रेशनकार्ड बोगस असल्याचे समोर आले. स्वस्तातील धान्य घ्यायचे ते काळ्याबाजारात विकायचे या गोरखधंद्याला यामुळे आळा बसणार आहे. हे लक्षात आल्यामुळे भ्रष्ट यंत्रणेत व्यापाऱ्यांसोबत स्वत:चे हात काळे करून घेणाºया अधिकाºयांचेही दुकान लंबे झाले. त्यामुळे ही नवीन यंत्रणाच कशी हाणून पाडता येईल याची सुरुवात दुर्दैवाने राज्याच्या राजधानीत सुरू झाली आहे.ही योजना मुळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील. त्यांचे सरकार सत्तेवर असताना यासाठी डाटा एन्ट्री करण्याचे काम सुरू झाले होते. पण डाटा एंट्री करण्यात चुका झाल्या. अधिकाºयांनीही त्या दुरुस्त करण्यात स्वारस्य दाखवले नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणावर चुका राहिल्या. सात महिन्यांपूर्वी मुंबईत ई-पॉस मशिन लावले गेले. जेव्हा लोक धान्य घेण्यासाठी दुकानात येऊ लागले तेव्हा डाटा एन्ट्रीतील चुका लक्षात येऊ लागल्या. मात्र मुंबईतील अधिकाºयांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव या यंत्रणेसाठी आग्रह धरत असतानाही जे अधिकारी हातावर हात ठेवून बसले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत एवढे हे गंभीर प्रकरण आहे. ज्या व्यक्तीच्या नावाच्या डाटा एन्ट्रीत चुका झाल्या आहेत त्यांना दुकानात धान्य देण्याची व्यवस्था अधिकाºयांनी करायला हवी होती, शिवाय एन्ट्रीतील चुकाही दुरुस्त करायला हव्या होत्या. पण ते केले गेले नाही.चंद्रपूर, कोल्हापूर, भंडारा, वाशिम या रिमोट जिल्ह्यात ७० ते ८० टक्के धान्यांचे वितरण या नव्या यंत्रणतेून केले जात आहे. त्यांना कोणत्याही कनेक्टीव्हीटीची, इंटरनेटची अडचण येत नाही आणि मुंबईत मात्र या गोष्टीची अडचण येते असे अधिकारीच सांगू लागले याचा अर्थ ते दुकानदारांची सुपारी घेऊन बोलत आहेत हे स्पष्ट आहे. हॉटस्पॉट, वायफाय किंवा कोणत्याही प्रकारचे इंटरनेट कार्ड वापरा असे सांगूनही अधिकारी कनेक्टीव्हीटीचे कारण पुढे करत असतील तर त्यांच्या चौकशाच लावल्या पाहिजेत.दुर्दैवाने या विषयाची कोणतीही माहिती न घेता काँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते या विषयाचे राजकारण करू पहात आहेत. ते गोरगरीब व गरजू जनतेला धान्य मिळावे या बाजूचे आहेत की काळा बाजार करणाºया अधिकारी व व्यापाºयांच्या सगंनमतात सहभागी आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे. यात चुका असतील तर त्या दाखवून दिल्या पाहिजेत पण चांगल्या योजनेला खीळ घालण्याचे काम होऊ नये.

टॅग्स :Crimeगुन्हा