शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

भेळ आणि चणेफुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 05:56 IST

बोलणे आणि कृती यातले अंतर ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपाला मिटवता आलेले नाही.

सरकार कोणतेही असो. अहवाल, अहवाल खेळण्याचे त्याचे वेड काही केल्या जात नाही. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा अहवाल असो की लोकलेखा समितीचा, असे अहवाल उपचार म्हणून वर्षानुवर्षे विधिमंडळात मांडले जातात. त्यातून माध्यमांना दोन दिवस बातम्या मिळतात मात्र पुढे त्या अहवालांच्या गुळगुळीत कागदांचा भेळ खाण्यापलीकडे उपयोग होत नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. भाजपा जेव्हा विरोधात होती तेव्हा कॅगचे अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडता म्हणून तासन्तास वाद घालायची. त्यावर चर्चा करता येत नाही म्हणून संताप प्रगट करायची. आता भाजपाच सत्तेत असतानाही कॅगचा अहवाल शेवटच्याच दिवशी मांडला जातोय. बोलणे आणि कृती यातले हे अंतर ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपाला मिटवता आलेले नाही. अशा अहवालांमधून गंभीर निष्कर्ष मांडलेले असतात. अनेक सूचना असतात. ज्याचा उपयोग राज्याचा कारभार नीट चालवता यावा म्हणून होत असतो. कर भरणाºया जनतेचा पैसा वाचवण्यास याचा उपयोग होत असतो. अहवालाच्या निष्कर्षावरून सरकार दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करू शकते. झालेले नुकसान त्यांच्या पगारातून वसूल करू शकते, प्रसंगी दोष गंभीर असेल तर अशा अधिकाºयांवर निलंबनाची कारवाईदेखील सरकार करू शकते. मात्र आजपर्यंत या अहवालाचा आधार घेऊन एकही कारवाई झालेली नाही. या अहवालाचा आधार घेत लोकलेखा समिती शिफारशी करत असते. मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही. कॅगचे अहवाल गुळगुळीत कागदांवर असतात म्हणून ते ओली भेळ खाण्यासाठी आणि लोकलेखा समितीचे अहवाल साध्या कागदांवर असतात ते चणेफुटाणे खाण्यासाठीच वापरावेत असा दृढ समज असावा एवढी टोकाची अनास्था या अहवालांच्या बाबतीत आजवरच्या सरकारांनी दाखवलेली आहे. विरोधी पक्ष मात्र असे अहवाल किती स्फोटक आहेत हे पाहून ते रद्दीत द्यायचे की नाही हे ठरवतो. यासाठी वर्षवर्ष राबणारे अधिकारी आणि होणारा खर्च, याचा विचार कुठेही होताना दिसत नाही. राज्यघटनेतच ‘कॅग’ला स्वतंत्र अस्तित्व दिले गेले. त्यामागे घटनाकारांची निश्चित भूमिका होती. सरकारी पैशांचा अपव्यय टाळला जावा, कामांचे आॅडिट त्रयस्थ संस्थेने करावे आणि सरकारच्या विविध संस्थांवर अंकुश रहावा हा त्यामागे हेतू होता. मात्र त्या हेतूलाच हरताळ फासून ही संस्था कागदोपत्री कशी राहील याची राजकारण्यांनी सोयीस्कररीत्या व्यवस्था करून टाकली आहे. याला प्रशासनातल्या अधिकाºयांनीही फूस लावली कारण त्यांच्या चुका यामुळे चव्हाट्यावर येऊ लागल्या होत्या. परिणामी सरकारच्या कारभाराचे आॅडिट करणारी संस्था केवळ नामधारी उरली आहे. जी अवस्था कॅग किंवा लोकलेखा समितीची तीच अवस्था विविध महामंडळांच्या वार्षिक अहवालांची. पांढरा हत्ती म्हणून पोसले जाणारे विविध महामंडळांचे चार ते पाच वर्षांचे अहवाल एकाच दिवशी विधिमंडळात सादर होतात. ही महामंडळे पांढरा हत्ती आहेत हे सगळ्यांनी अनेकदा बोलृून दाखवले. यातील भ्रष्टाचारच कायम चर्चेत राहिला आणि यावर होणाºया राजकीय नियुक्त्या कायम वादात राहिल्या. तरीही राजकारण्यांना मंत्रिपद नाहीतर किमान महामंडळ तरी मिळवण्याची लालसा कमी झालेली नाही. हे अहवाल कुणी वाचतही नाही, माध्यमांसाठी अहवाल जेथे ठेवले जातात ती जागा एखाद्या रद्दीघरासारखी दिसत असते. पाच वर्षापूर्वीचा अहवाल आज का सादर केला म्हणून आजवर एकाही अधिकाºयाला शिक्षा झालेली नाही. ही सगळी नाटकं कशासाठी करता? यासाठी कुणाचा पैसा वाया जातो याचा विचार आजवर कुणीही केलेला नाही. त्यामुळे अशा अहवालांच्या कागदावर भेळ अथवा चणेफुटाणे खाताना चांगले लागतात की नाही याचीच चर्चा केलेली बरी.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचार