शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

भेळ आणि चणेफुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 05:56 IST

बोलणे आणि कृती यातले अंतर ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपाला मिटवता आलेले नाही.

सरकार कोणतेही असो. अहवाल, अहवाल खेळण्याचे त्याचे वेड काही केल्या जात नाही. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा अहवाल असो की लोकलेखा समितीचा, असे अहवाल उपचार म्हणून वर्षानुवर्षे विधिमंडळात मांडले जातात. त्यातून माध्यमांना दोन दिवस बातम्या मिळतात मात्र पुढे त्या अहवालांच्या गुळगुळीत कागदांचा भेळ खाण्यापलीकडे उपयोग होत नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. भाजपा जेव्हा विरोधात होती तेव्हा कॅगचे अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडता म्हणून तासन्तास वाद घालायची. त्यावर चर्चा करता येत नाही म्हणून संताप प्रगट करायची. आता भाजपाच सत्तेत असतानाही कॅगचा अहवाल शेवटच्याच दिवशी मांडला जातोय. बोलणे आणि कृती यातले हे अंतर ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपाला मिटवता आलेले नाही. अशा अहवालांमधून गंभीर निष्कर्ष मांडलेले असतात. अनेक सूचना असतात. ज्याचा उपयोग राज्याचा कारभार नीट चालवता यावा म्हणून होत असतो. कर भरणाºया जनतेचा पैसा वाचवण्यास याचा उपयोग होत असतो. अहवालाच्या निष्कर्षावरून सरकार दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करू शकते. झालेले नुकसान त्यांच्या पगारातून वसूल करू शकते, प्रसंगी दोष गंभीर असेल तर अशा अधिकाºयांवर निलंबनाची कारवाईदेखील सरकार करू शकते. मात्र आजपर्यंत या अहवालाचा आधार घेऊन एकही कारवाई झालेली नाही. या अहवालाचा आधार घेत लोकलेखा समिती शिफारशी करत असते. मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही. कॅगचे अहवाल गुळगुळीत कागदांवर असतात म्हणून ते ओली भेळ खाण्यासाठी आणि लोकलेखा समितीचे अहवाल साध्या कागदांवर असतात ते चणेफुटाणे खाण्यासाठीच वापरावेत असा दृढ समज असावा एवढी टोकाची अनास्था या अहवालांच्या बाबतीत आजवरच्या सरकारांनी दाखवलेली आहे. विरोधी पक्ष मात्र असे अहवाल किती स्फोटक आहेत हे पाहून ते रद्दीत द्यायचे की नाही हे ठरवतो. यासाठी वर्षवर्ष राबणारे अधिकारी आणि होणारा खर्च, याचा विचार कुठेही होताना दिसत नाही. राज्यघटनेतच ‘कॅग’ला स्वतंत्र अस्तित्व दिले गेले. त्यामागे घटनाकारांची निश्चित भूमिका होती. सरकारी पैशांचा अपव्यय टाळला जावा, कामांचे आॅडिट त्रयस्थ संस्थेने करावे आणि सरकारच्या विविध संस्थांवर अंकुश रहावा हा त्यामागे हेतू होता. मात्र त्या हेतूलाच हरताळ फासून ही संस्था कागदोपत्री कशी राहील याची राजकारण्यांनी सोयीस्कररीत्या व्यवस्था करून टाकली आहे. याला प्रशासनातल्या अधिकाºयांनीही फूस लावली कारण त्यांच्या चुका यामुळे चव्हाट्यावर येऊ लागल्या होत्या. परिणामी सरकारच्या कारभाराचे आॅडिट करणारी संस्था केवळ नामधारी उरली आहे. जी अवस्था कॅग किंवा लोकलेखा समितीची तीच अवस्था विविध महामंडळांच्या वार्षिक अहवालांची. पांढरा हत्ती म्हणून पोसले जाणारे विविध महामंडळांचे चार ते पाच वर्षांचे अहवाल एकाच दिवशी विधिमंडळात सादर होतात. ही महामंडळे पांढरा हत्ती आहेत हे सगळ्यांनी अनेकदा बोलृून दाखवले. यातील भ्रष्टाचारच कायम चर्चेत राहिला आणि यावर होणाºया राजकीय नियुक्त्या कायम वादात राहिल्या. तरीही राजकारण्यांना मंत्रिपद नाहीतर किमान महामंडळ तरी मिळवण्याची लालसा कमी झालेली नाही. हे अहवाल कुणी वाचतही नाही, माध्यमांसाठी अहवाल जेथे ठेवले जातात ती जागा एखाद्या रद्दीघरासारखी दिसत असते. पाच वर्षापूर्वीचा अहवाल आज का सादर केला म्हणून आजवर एकाही अधिकाºयाला शिक्षा झालेली नाही. ही सगळी नाटकं कशासाठी करता? यासाठी कुणाचा पैसा वाया जातो याचा विचार आजवर कुणीही केलेला नाही. त्यामुळे अशा अहवालांच्या कागदावर भेळ अथवा चणेफुटाणे खाताना चांगले लागतात की नाही याचीच चर्चा केलेली बरी.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचार