शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘भाजप’च दादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:10 IST

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे.

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे. विशेषत: राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांकावर राहण्यात यश मिळविले आहे. सत्तेवर असण्याचा लाभ असतो. मात्र, त्यासाठी राजकीय चातुर्य वापरावे लागते. पक्ष संघटन आणि राज्यसत्ता यांचा समन्वय साधावा लागतो. तो उत्तमपणे सांभाळण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. यापूर्वी कॉँग्रेस आघाडीचे सरकार होते, तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस हा कनिष्ठ मित्रपक्ष असला तरी पक्षसंघटन आणि सत्तेचे पाठबळ याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. त्याच जोरावर विधान परिषदेतही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून वावरत होता. ती सर्व जागा आता भाजपने व्यापून टाकली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची त्यासाठी धडपड आहे. मात्र सत्तेचे वलय संपले आहे. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देता येत नाही. भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या. त्यापैकी काल पार पडलेल्या खानदेशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. जळगाव आणि सांगलीच्या राजकारणावर योगायोगाने ‘दादा’ नावांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा दबदबा राहिला आहे. जळगाव नगरपालिका आणि नंतर महापालिकेवर ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. जळगाव म्हणजे सुरेशदादा असेच समीकरण होते. या शहराला नवी ओळख त्यांनी दिली. मध्यंतराच्या काळात त्यांना विविध प्रकरणात राजकीय शह बसला. त्यात महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याने भाजपने उचल खाल्ली आणि संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व असताना शहरातील वर्चस्वासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. परत एकदा राज्यसत्तेचा वापर करीत जळगावच्या विकासासाठीचे नवे मॉडेल देण्याचे आश्वासित केले. सातत्याची सत्ता असल्याने बदलासाठी मतदारांनी भाजपच्या आश्वासनाला साथ दिली, असाच त्याचा अर्थ निघतो. भाजपने इतर पक्षातील अनेक उमेदवार घेतले. त्यांच्या अनेक नेत्यांना विश्वासच नव्हता की, सुरेशदादा जैन यांच्याशी एकाकी लढत देता येईल, यासाठी शिवसेनेशी युती करण्याची तयारी चालली होती. त्यात एकनाथ खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन यांच्या वादाचा आडपडदा आला आणि युती झाली नाही. या सर्व घडामोडींचा लाभ मात्र गिरीश महाजन यांनी उठविला आणि जळगावच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ होती. एकीकडे भाजपने एका ‘दादा’ला बाजूला केले, अन् खडसे यांनाही शह देत महाजनांना बळ देण्यात यश मिळविले. हा भाजपचा मोठा विजय आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही ‘दादा’ या नावाचा योगायोग होता. सांगली शहर आणि जिल्हा आजही वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखतो. दादांना जाऊन आता तीन दशके होत आली तरी त्यांच्या नावानेच राजकारण होते. मात्र, त्यांच्या राजकारणातील लोककल्याणाची बाजू कुणी सांभाळत नाही. परिणामी, कॉँग्रेसची दिवसेंदिवस वाताहात होत चालली आहे. भाजपने हे अचूक ओळखले आणि नव्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केला. प्रारंभी त्यांना सर्व जागा लढविण्यास उमेदवार मिळत नव्हते; तरीही सर्व पक्षातील नाराजांना एकत्र करून सत्ता, संपत्ती आदींच्या बळावर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान उभे केले. ‘दादां’च्या नावाला विरोध करणारे भाजपचे चंद्रकांत‘दादा’ यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. हेच दादा जळगावचेही पालकमंत्री आहेत. कॉँग्रेस अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाच्या धडाडीचा अभाव आदी कारणाने कॉँग्रेसने आव्हान उभेच केले नाही.

टॅग्स :BJPभाजपा