शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘भाजप’च दादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:10 IST

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे.

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे. विशेषत: राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांकावर राहण्यात यश मिळविले आहे. सत्तेवर असण्याचा लाभ असतो. मात्र, त्यासाठी राजकीय चातुर्य वापरावे लागते. पक्ष संघटन आणि राज्यसत्ता यांचा समन्वय साधावा लागतो. तो उत्तमपणे सांभाळण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. यापूर्वी कॉँग्रेस आघाडीचे सरकार होते, तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस हा कनिष्ठ मित्रपक्ष असला तरी पक्षसंघटन आणि सत्तेचे पाठबळ याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. त्याच जोरावर विधान परिषदेतही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून वावरत होता. ती सर्व जागा आता भाजपने व्यापून टाकली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची त्यासाठी धडपड आहे. मात्र सत्तेचे वलय संपले आहे. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देता येत नाही. भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या. त्यापैकी काल पार पडलेल्या खानदेशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. जळगाव आणि सांगलीच्या राजकारणावर योगायोगाने ‘दादा’ नावांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा दबदबा राहिला आहे. जळगाव नगरपालिका आणि नंतर महापालिकेवर ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. जळगाव म्हणजे सुरेशदादा असेच समीकरण होते. या शहराला नवी ओळख त्यांनी दिली. मध्यंतराच्या काळात त्यांना विविध प्रकरणात राजकीय शह बसला. त्यात महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याने भाजपने उचल खाल्ली आणि संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व असताना शहरातील वर्चस्वासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. परत एकदा राज्यसत्तेचा वापर करीत जळगावच्या विकासासाठीचे नवे मॉडेल देण्याचे आश्वासित केले. सातत्याची सत्ता असल्याने बदलासाठी मतदारांनी भाजपच्या आश्वासनाला साथ दिली, असाच त्याचा अर्थ निघतो. भाजपने इतर पक्षातील अनेक उमेदवार घेतले. त्यांच्या अनेक नेत्यांना विश्वासच नव्हता की, सुरेशदादा जैन यांच्याशी एकाकी लढत देता येईल, यासाठी शिवसेनेशी युती करण्याची तयारी चालली होती. त्यात एकनाथ खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन यांच्या वादाचा आडपडदा आला आणि युती झाली नाही. या सर्व घडामोडींचा लाभ मात्र गिरीश महाजन यांनी उठविला आणि जळगावच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ होती. एकीकडे भाजपने एका ‘दादा’ला बाजूला केले, अन् खडसे यांनाही शह देत महाजनांना बळ देण्यात यश मिळविले. हा भाजपचा मोठा विजय आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही ‘दादा’ या नावाचा योगायोग होता. सांगली शहर आणि जिल्हा आजही वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखतो. दादांना जाऊन आता तीन दशके होत आली तरी त्यांच्या नावानेच राजकारण होते. मात्र, त्यांच्या राजकारणातील लोककल्याणाची बाजू कुणी सांभाळत नाही. परिणामी, कॉँग्रेसची दिवसेंदिवस वाताहात होत चालली आहे. भाजपने हे अचूक ओळखले आणि नव्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केला. प्रारंभी त्यांना सर्व जागा लढविण्यास उमेदवार मिळत नव्हते; तरीही सर्व पक्षातील नाराजांना एकत्र करून सत्ता, संपत्ती आदींच्या बळावर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान उभे केले. ‘दादां’च्या नावाला विरोध करणारे भाजपचे चंद्रकांत‘दादा’ यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. हेच दादा जळगावचेही पालकमंत्री आहेत. कॉँग्रेस अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाच्या धडाडीचा अभाव आदी कारणाने कॉँग्रेसने आव्हान उभेच केले नाही.

टॅग्स :BJPभाजपा