शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

भजीपुराण

By admin | Updated: July 14, 2017 23:58 IST

पहिला भजी महोत्सव गाजला तो सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी परस्परांना भजी खाऊ घातल्याने

- मिलिंद कुलकर्णी पहिला भजी महोत्सव गाजला तो सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी परस्परांना भजी खाऊ घातल्याने. खिलाडूवृत्ती आणि मुत्सद्दी असलेल्या या नेत्यांच्या कृतीतून ‘मनोमिलना’चा अर्थ काढणे उतावीळपणाचे ठरेल.सामान्य माणूस मोठा श्रध्दाळू, पापभिरु आहे. पौराणिक कथा, ऐतिहासिक कादंबऱ्या, चित्रपटांचा त्याच्यावर मोठा पगडा आहे. नायक-खलनायक, सुष्ट-दुष्ट शक्ती, जय पराजय अशी गृहितके तो मांडतो आणि प्रत्यक्षात तसेच घडावे अशी कामना करीत असतो. सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे या दोन दिग्गज नेत्यांमधील ‘भजीपुराणा’ वरून सध्या असेच कल्पनेचे इमले बांधणे सुरू आहे. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करणाऱ्या ‘मराठी प्रतिष्ठान’ या संस्थेने जळगावातील लोकसहभागातून सुशोभीकरणाच्या वाटेवर असलेल्या मेहरुण तलावाच्या चौपाटीवर पावसाळ्यातील भजी महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात १५ प्रकारची भजी खवैयांसाठी उपलब्ध होती. जळगावात प्रथमच होणाऱ्या या भजी महोत्सवाविषयी कुतूहल असल्याने गर्दी चांगली होती. आयोजकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांनी राजकीय नेत्यांना आमंत्रित केले होते. सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, ईश्वरलाल जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा या प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली. खिलाडूवृत्ती दाखवत नेते एकमेकांच्या शेजारी बसले. परस्परांची विचारपूस केली. महोत्सव असल्याने उद्घाटन, भाषणे असे सोपस्कार नव्हते. सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनीही भज्यांचा आस्वाद घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना भजी खाऊ घातली आणि उत्साही मंडळींसाठी ही घटना ब्रेकिंग न्यूज ठरली. ‘मेहरुण तलावाला साक्षी ठेवत, गुरुपौर्णिमेच्या पवित्रदिवशी कट्टर प्रतिस्पर्धी नेत्यांचे मनोमिलन’ अशी खास खबर समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांवर झळकली. त्यावर मग चर्वितचर्वण सुरू झाले. आता विचार करा, हे दिग्गज नेते या कार्यक्रमाला एकत्र आले आणि त्यांच्यातील राजकीय मतभेद लक्षात घेता, परस्परांशी बोललेच नसते तरीही ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरली असती. ‘सात वर्षांनंतर आमनेसामने येऊनही नेत्यांनी एकमेकांकडे फिरवली पाठ’ असे शीर्षक देत बातमी रंगविण्यात आली असती. सामान्य माणसाला राजकीय, चित्रपट या क्षेत्रातील मंडळींकडून नेहमी ‘तडका’ छाप कहाण्यांची अपेक्षा असते. तेच या प्रकरणात घडले, यापेक्षा या भेटीला राजकीय महत्त्व आहे, असे वाटत नाही. सुरेशदादा, नाथाभाऊ आणि ईश्वरलाल जैन हे यापूर्वी अनेकदा एकत्र आले आणि प्रसंगानुरुप विभक्तदेखील झाले. तिन्ही नेते शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी त्यांचा सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांशी सौहार्द आहे. काळ गाजविलेल्या या मंडळींनी आपत्ती कोसळल्यानंतर सार्वजनिक जीवनातून अलिप्त राहण्याचे धोरण काही काळ अवलंबले. परंतु कार्यकर्ते आणि जनता त्यांच्यासाठी ऊर्जा असल्याने ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जळगाव महापालिकेवर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचे वर्चस्व आहे. महापालिकेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली असल्याने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरेशदादा जैन हे शिवसेनेचे नेते असल्याने पुढील निवडणूक सेनेच्या तिकिटावर लढवावी, असा एक मतप्रवाह आहे. ‘शतप्रतिशत भाजपा’साठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे प्रयत्नशील आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सुरेशदादा जैन आणि महाजन यांच्यात सख्य वाढल्याने नवीन समीकरण उदयाला येते काय याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. गिरीश महाजन हे ईश्वरलाल जैन यांना पितृस्थानी मानतात. बहुमत नसतानादेखील महाजन यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा होण्यात जैन यांचा गट साहाय्याच्या भूमिकेत होता. या पार्श्वभूमीवर वर्षाखेरीस होणारी जामनेर पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याच्या ईश्वरलाल जैन यांच्या घोषणेने राजकीय कलाटणी मिळाली आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीने सरकारकडे अहवाल सादर केला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर खडसे यांच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाचा निर्णय अवलंबून आहे. ‘भजीपुराणा’मागे ही पार्श्वभूमी आहे, त्यामुळे कल्पनेचे इमले बांधण्यात काहीही हशील नाही.