शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अविनाश डोळस : चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 7:12 AM

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता. एकीकडे स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याची धामधूम सुरू होती आणि दुसरीकडे त्याची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाहीत या दाहक वास्तवाची जाणीव लोकांना होऊ लागलेली होती. अशातच आम्ही आतापर्यंत वाचलेल्या कवितांपेक्षा अंतर्बाह्य वेगळी अशी नामदेव ढसाळ यांची कविता वाचनात येऊ लागली. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या साधनेच्या विशेषांकात राजा ढालेंचा राष्ट्रध्वजाविषयी स्फोटक विधान असलेला लेख वाचनात आला. या सगळ्यांची संगती लावणं हे पठडीतल्या मराठी प्राध्यापकांच्या कुवतीबाहेरचे काम होते; पण ते समजावून घेण्याची तगमग होती.

एका वर्गात नव्यानेच रुजू झालेले प्राध्यापक मराठी शिकवीत होते. त्यांची बहुतेक मर्ढेकरांची कविता सुरू होती. त्यांनी अगदी अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे नवकवितेचे विश्लेषण मांडले. त्यांचा व्यासंग, भाषाशैली, कविता आणि ज्या काळात ती जन्माला आली तिचे आकलन या सर्वच बाबी प्रभावी होत्या. मग भेटी वाढत गेल्या आणि जिव्हाळा निर्माण झाला.

डोळस सर दलित चळवळीमध्ये सक्रिय असल्याचे त्यानंतर कळले. खरे तर ते दलित आहेत हेही नंतरच कळले. त्यांचा पिंड केवळ वाचून थांबण्याचा नव्हता, तर प्रत्यक्ष कृती करण्याचा होता. गेवराईसारख्या सरंजामी वातावरण असलेल्या गावातसुद्धा त्यांनी आपल्या या वृत्तीला मुरड घातली नाही. नव्याने येऊन एखाद्या गावात नवा पायंडा पाडणे हे सोपे काम नसते; परंतु थोड्याच अवधीत तिथे त्यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याची मोहीम हाती घेतली. ती यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातीलच नव्हे, तर गावातील इतरांशी संपर्क केला आणि ती आयोजित केली.२८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर म्हणजे फुले स्मृतिदिन ते आंबेडकर स्मृतिदिन अशा निमित्ताने ती आयोजित केली होती. त्यात बाहेरून वक्ते आले आणि ते जे बोलले त्यामुळे खळबळ माजली. संस्थाचालकांनी त्यांना याचा जाब विचारला. सरांना परिणामाची पुरेपूर जाणीव होती. त्याची तमा न बाळगता त्यांनी हे पाऊल उचलले होते. परिणाम जे व्हायचे तेच झाले; परंतु सर निर्विकार होते. नंतर ते मिलिंद कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

या सगळ्या तणावातून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव कधीही दिसून आले नाहीत. त्यांची ही वृत्ती ते अनेक गंभीर संकटांतून जात असतानाही दिसून आली. शिष्यवृत्ती वाढ आंदोलनात त्यांनी ज्या पद्धतीने सर्व पुरोगामी युवक संघटनांना सहभागी करून घेतले होते त्यात त्यांच्या या लोकसंग्रहाच्या पाठीशी त्यांच्या या लोभस व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. नामांतराच्या निमित्ताने उसळलेल्या दलितविरोधी हिंसाचारानंतर आपद्ग्रस्त दलित सहायता समिती गठित करण्यातही त्यांच्या या कौशल्याचा फार उपयोग झाला. एकेकाळच्या कडव्या नामांतर विरोधकांशीसुद्धा त्यांचा संवाद कुठलीही कटुता न येता अबाधितपणे सुरू होता. परिणामत: नामविस्ताराची चळवळ शेवटच्या टप्प्यावर असताना अनेक नामांतर विरोधकांचा विरोध केवळ मावळलेलाच नव्हता, तर त्यापैकी अनेकांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिलेला होता. ते आंबेडकरवादाचे केवळ अभ्यासकच नव्हते, तर त्या तत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ लावण्यात आज ज्यांचा हातखंडा आहे त्या बोटावर मोजता येण्यासारख्या विचारवंतांमध्ये त्यांचे आघाडीचे स्थान होते. त्यांच्या या गुणविशेषाचेच फलित म्हणून त्यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना समितीचे सचिव म्हणून केलेली होती. अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाला आपण आजपासून मुकत आहोत, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.प्रा. प्रकाश सिरसाट 

(लेखक ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद