शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

कर्तव्यातही सेवाभाव अपेक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:23 IST

नोकरी म्हणून पार पाडल्या जाणाऱ्या कर्तव्यात सेवेचा दृष्टिकोन ठेवल्याखेरीज यात बदल होणार नाही.

- किरण अग्रवालदेशातील प्रत्येक गरिबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आपण व्याकुळ असल्याची भावना एकीकडे पंतप्रधान व्यक्त करीत असताना, दुसरीकडे आरोग्यसेवेत अनियमितता अगर कुचराईसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ यावी, हेच पुरेसे बोलके आहे. यंत्रणांतील बेफिकिरी किंवा वाढत्या संवेदनहीनतेचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येतो तो याचमुळे.मुलांच्या विकासात कुपोषणाचा मोठा अडथळा ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयीच्या आढाव्यासाठी देशपातळीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकताच संवाद साधला. यात महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होता. कुपोषणमुक्तीसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगताना यात मोदी यांनी, प्रत्येक नागरिकाला ‘क्वालिटी आॅफ लाईफ’ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. पण, एकीकडे देशाचे शीर्षस्थ नेतृत्व आरोग्याविषयी इतके व असे गंभीर असताना आणि त्यामुळेच संबंधित जिल्ह्यातील अधिकारी व आशा कर्मचाºयांशी थेट संवाद साधत असताना आपल्या स्थानिक सरकारी यंत्रणा मात्र किती निवांतपणे याकडे पाहात आहेत तेच निलंबनाच्या कारवाईवरून स्पष्ट व्हावे.नाशिक जिल्हा परिषदेत डॉ. नरेश गिते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या सुस्तावलेल्या यंत्रणेला शिस्त लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष पुरविले असून, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाºयांची झाडाझडती घेत प्रभावी उपाययोजना चालविल्या आहेत. त्यासाठी बालविकास केंद्रे उघडण्यात येत आहेत. पण, असे असले तरी चाकोरीच्या पलीकडे कर्तव्य न निभावणाºयांचे अडथळे कमी नाहीत. महिरावणी येथे घेण्यात आलेल्या एका आढावा बैठकीत तेच आढळून आल्याने डॉ. गिते यांनी आरोग्य विभागाच्या आठ कर्मचाºयांवर थेट निलंबनाची कारवाई घोषित केली. अर्थात अशा निलंबनाच्या व बडतर्फीच्या कारवाया यापूर्वीही केल्या गेल्या आहेतच; पण त्याने काही वचक बसताना दिसत नाही. मागेही अधिकाºयांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना अकस्मात दिलेल्या भेटीप्रसंगी औषधी ठेवण्यासाठी दिलेले फ्रीज बाथरूममध्ये ठेवण्यात आलेले आढळून आले होते. पण, चौकशीअंती कुणावर काय कारवाई झाली हे पुढे आलेच नाही. आजही ग्रामीण भागातील आरोग्याची हेळसांड कमी झालेली नाही. सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात दोन व्यक्तींच्या चार पायांचीच ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ झोळी करून रुग्णाला ने-आण करताना दिसून यावी, हे कशाचे लक्षण मानायचे?नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून आल्यावर त्यांनीही आरोग्याचा प्रश्न काळजीने हाताळला. संबंधिताना फैलावर घेतले. पण स्वाईन फ्लूमुळे दोन आठवड्यात तीन दगावल्याचे तर डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा गेल्या आठ महिन्यात ३५०वर पोहोचल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तर याबाबतची चिंता अधिकच वाढून गेली आहे. थोडक्यात, सरकारी यंत्रणांतील संवेदना बोथट होत चालल्याचे हे निदर्शक आहे. नोकरी म्हणून पार पाडल्या जाणाºया कर्तव्यात सेवेचा दृष्टिकोन ठेवल्याखेरीज यात बदल होणार नाही. त्यासाठी गणपतीबाप्पांनीच सुबुद्धी द्यावी इतकेच यानिमित्ताने.

(लेखक लोकमत नाशिकचे निवासी संपादक आहेत)

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयNashikनाशिक