शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

लेख: एसटीचे चाक चिखलात; 'लालपरी'ला सरकारी धक्क्याची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:02 IST

सध्या एसटी महामंडळ आर्थिक विवंचनेत सापडले असून, तोटा वाढत चालला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

-श्रीरंग बरगे (सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, डोंगरदऱ्यांत, खेड्यापाड्यांत आणि शहरांच्या गजबजाटात आपल्या चाकांवर विश्वासाचे ओझे वाहणारी 'लालपरी' आज स्वतःच आर्थिक चिखलात रुतलेली दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) हा केवळ एक परिवहन उपक्रम नसून तो राज्याच्या सर्वसामान्य जनतेचा जीवनदायी धागा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच स्वस्त, सुरक्षित आणि सुलभदळणवळणाची जबाबदारी पार पाडणारे हे महामंडळ आज आर्थिक विवंचनेच्या कात्रीत सापडले आहे.

एसटी ही केवळ बससेवा नसून ती ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. जिथे रेल्वेचे रूळ पोहोचले नाहीत, जिथे खासगी वाहतुकीचे पर्याय मर्यादित आहेत, तिथे एसटीनेच जनतेच्या आशा-आकांक्षांना पंख दिले आहेत. परंतु, आज वाढता आस्थापना खर्च, वाढता डिझेल खर्च, वाढता स्पेअर पार्ट्स खर्च व कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी, म्हणजेच थकीत उपदान रक्कम, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते आणि बँक कर्जाचे हप्ते या सर्वांनी एसटीच्या चाकांना जणू आर्थिक चिखलातच अडकवून ठेवले आहे. या अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस उंचावत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या आर्थिक आधाराची नितांत गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेच्या या लाडक्या लालपरीची चाके आर्थिक चिखलात अडकली असून, तिला आता सरकारच्या आर्थिक धक्क्याची गरज आहे.

सध्या एसटी महामंडळ आर्थिक विवंचनेत सापडले असून, तोटा वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांची तसेच महामंडळासमोरची तब्बल ४३०० कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकली असून, डिझेलसारख्या दैनंदिन खर्चाला लागणाऱ्या रकमेसाठी निधीची जुळवाजुळव करताना व्यवस्थापनाची तारांबळ उडत आहे. तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा असल्याचे वास्तव चिंताजनक आहे. या तोट्याच्या सावटाखाली एसटीचा प्रवास अधिकच खडतर होत चालला आहे.

जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देणेच नव्हे, तर डिझेलसारख्या मूलभूत गरजांसाठीही निधी उभारणे कठीण होईल. अशा परिस्थितीत एसटीची गती मंदावणे अपरिहार्य ठरेल, आणि त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व सर्वसामान्य जनतेला बसेल.

याचबरोबर, एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. पण जर वेतनवाढ फरक हप्ता रक्कम द्यायला सरकारकडे निधी नसेल, तो मिळण्यासाठी पायपीट करावी लागत असेल तर पुढे येणाऱ्या गाड्या खरेदीसाठी निधी उपलब्ध होईल का, अशी शंकासुद्धा निर्माण झाली आहे. अनेक बसेस कालबाह्य झाल्या असून, त्यांची जागा आधुनिक, सुरक्षित आणि इंधन बचतीच्या बसेसने घेणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन येत्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद अनुदान स्वरूपात करणे ही काळाची गरज आहे. आणि तो आर्थिक 'धक्का' मिळाल्यासच एसटीचे चाक पुन्हा गती घेऊ शकेल.

एसटी वाचली तरच ग्रामीण महाराष्ट्राची गती कायम राहील आणि 'लालपरी'चे चाक पुन्हा अभिमानाने, विश्वासाने आणि वेगाने फिरू लागेल. मध्यंतरी १३ ऑक्टोबर २५ रोजी, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनासोबत सन २०२० ते २०२४ या कालावधीचा वेतनवाढ फरक देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारकडून दर महिन्याला साधारण ६५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत जाहीर केले. पण, गेले तीन महिने ही रक्कम अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या तिजोरीत वर्ग केली नाही. त्यामुळे राज्य सरकारची अब्रू राखण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या तिजोरीतून सदरची रक्कम नोव्हेंबर व डिसेंबर २५ या महिन्यात वेतनासोबत कर्मचाऱ्यांना दिली. पण जानेवारीत मात्र महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे व्यवस्थापन ही रक्कम देऊ शकले नाही आणि हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत. यासंदर्भात वेळीच योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार