शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

अनोळखी माणसांशी संवाद अन् घरात वाद; सोशल मीडियाचा असाही साईड इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:54 PM

वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो.

- विनायक पात्रुडकर

वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो. हाणामारी करून, एकमेकांवर आरोप करून किंवा एकमेकांचा बळी घेऊन प्रश्न कधीच सुटत नाही. विवाह तुटू नये म्हणूनदेखील पती-पत्नींला संवाद साधण्याचा सल्ला देतात. अपुऱ्या संवादामुळे विवाह टिकत नाही. अगदी एकमेकांचा जीव घेण्याचे धाडस केले जाते. असेच एक प्रकरण नुकतेच मुंबईत घडले आहे. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन शरण झाला. आमच्यात वाद झाला. त्यानंतर मी झोपलो. पण पत्नी सोशल मिडियावर व्यस्त होती. त्यामुळे मी तिची हत्या केली, असे पतीने पोलिसांना सांगितले. 

सोशल मिडियामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मोकळीक मिळली आहे. आपल्याकडे कुटुंब सदस्यांशी बोलायला वेळ नसतो. पण सोशल मिडियावर आपण सतत अ‍ॅक्टिव असतो. आपला आपल्याच माणसांसोबतच संवाद संपत चालला आहे. आपण अनोळखी माणसे जोडतो, पण रक्ताची नाती सहज लांब करतो. त्यातूनच असे प्रकार घडतात. अपुऱ्या संवादाचा बळी केवळ पती-पत्नीतच घेतला जातो असे नाही. भाऊ, बहीण, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र, अशा जीवनातील प्रत्येक नात्यात अशा संवादाचा बळी जात असतो. त्यात प्रत्येक वेळी माणूस संपवला जातो, असे काही नाही. वर्षानुवर्षे एकमेकांशी न बोलणे, बघून पण तोंड फिरवणे, एकमेकांवर टीका करणे, हे सर्व प्रकार नाती संपवण्याचाच एक भाग आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर तरी त्यातून आपण बोध घ्यायला हवा. ही घटना का घडली, त्यामागचा हेतू काय होता, या सर्वाचा पोलीस तपास करतीलच. पण प्राथमिक कारण तर पती-पत्नीमधील वाद हेच आहे.

वाद का होतात? त्याची कारणे काय? याचा तरी विचार आपण करायला हवा. कोणी तरी माघार घ्यायला हवी. माघार घेतल्याने प्रश्न सुटू शकतो. पण मग आत्मसन्मानाचा मुद्दा येतो. हे सर्व बाजूला ठेवून नाते टिकवणे, हा एकमेव उद्देश ठेवला तर नक्कीच वाद होणार नाहीत. सरतेशेवटी सुखी आयुष्याचे सूत्र वादामध्ये कधीच सापडणार नाही. तेव्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहण्यापेक्षा आपण नात्यांमध्ये प्रत्यक्ष अ‍ॅक्टिव राहिला, तर नक्कीच आयुष्य सुखी होईल. अन्यथा माणूस संपवायला वेळ लागत नाही. मात्र त्याचा पश्चाताप आयुष्यभराचा असतो. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाrelationshipरिलेशनशिप