शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

श्वास गुदमरतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:19 IST

‘दिल्लीत आता न राहिलेलेच बरे’ असे विधान सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केले होते. पर्यावरणाचा ºहास करून शहरांत दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा पाहिल्या, तर कोणत्याच शहराला ‘दिल्ली’ दूर नाही.

गावात दही आणि ताक कधीच विकले जायचे नाही. ते विकले तर जनावराचा पान्हा आटेल, अशी भीती असायची. आता दही-ताक विकून बंगले बांधले जात आहेत. खेडेगावात पिण्याचे पाणी विकले जाईल, असे दहा वर्षांपूर्वी कोणी म्हटले असते, तर त्याला वेड्यात काढले गेले असते. आज खेड्यांत प्रत्येक घरात जारच्या पाण्यावर तहान भागते आहे आणि या जारच्या धंद्यावरच अनेकांचे बंगले उभे राहत आहेत. निसर्गाचा हा उलटा फेरा आम्ही माणसांनीच ओढवून घेतला आहे. त्यामुळे उद्या ऑक्सिजन विकत घेऊन जगण्याची वेळ आली, तर फार नवल वाटायला नको. ऑक्सिजनचे सिलिंडर सोबत घेऊनच बाहेर पडावे लागेल. माणसाने प्रगतीचा वेग असाच कायम ठेवला, तर हा दिवसही फार दूर नाही. ही चिंता वाटण्याचे कारण म्हणजे देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश झाला आहे. यात मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, लातूर, जळगाव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नागपूर व अमरावती यांचा समावेश आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सफर आणि टेरीकडून देशभरातील प्रदूषणाची पातळी मोजल्यानंतरही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात सर्वाधिक प्रदूषण महाराष्ट्रात होते. दुसरा नंबर उत्तर प्रदेशचा आहे. या राज्यातील १५ शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशातील सात, आंध्र प्रदेशातील पाच, कर्नाटकातील चार आणि गुजरातमधील सुरत, तामिळनाडूतील तुतिकोरीन ही शहरे महाराष्ट्रातील १७ शहरांच्याच पंक्तीत आहेत. या प्रदूषित शहरांमध्ये कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सूक्ष्म धूलिकण, अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांपेक्षा अधिक आहे.केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते. वरील सर्व शहरांनी ही पातळी ओलांडली आहे. प्रदूषणाचे हे संकट रोखण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ जाहीर केला आहे. याद्वारे या शहरांतील प्रदूषण ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांकडून हवेच्या प्रदूषण नियंत्रणाचा आराखडाही मागविण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि लातूरने पाठविलेला आराखडा फेटाळून लावण्यात आला आहे. कळस म्हणजे या शहरांनी अद्याप त्याचे पुनर्सादरीकरणही केले नाही. याचा अर्थ स्वत:च्या शहराला प्रदूषणमुक्त करावे याचा आराखडाही त्यांच्याकडे नाही.गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रातील प्रकाश प्रदूषणाच्या पातळीने ‘अत्युच्च’ पातळी गाठली आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर प्रकाश प्रदूषण सर्वाधिक आहे. वाहनांचे प्रदूषण, प्रकाश-पाणी प्रदूषण, हवेतील धूलिकण, वाढते औद्योगीकरण आणि वाढलेली वृक्षतोड या सर्व बाबींचा अतिरेक होत असल्याचा हा दुष्परिणाम आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण मोठ्या वेगाने होत आहे. मागच्या सरकारच्या काळात दरदिवशी ६९ कि.मी. रस्ते व्हायचे. या सरकारने ही गती दुप्पट केली असून, दरदिवशी १३४ कि.मी. रस्ते तयार केले जात आहेत. या विकासवाटेचा आनंद साजरा करायचा की, रस्त्यांसाठी प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीचे सुतक पाळायचे, याचेच कोडे आहे. वाढत्या काँक्रीट रस्त्यांमुळे उष्णता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्पर्धेत टिकायचे तर विकास व्हायलाच हवा; पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करून कसे चालेल? आहे ती झाडे तोडायची आणि नव्याने वृक्षलागवड करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चायचे. अशा मोठमोठ्या इव्हेंटमधून हाती काहीच लागणार नाही.शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. खेड्यातून शहरात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. प्रश्न केवळ लोकसंख्येचाच नाही, तर त्यासोबत निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचा आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून त्यांना दिल्या जाणाºया सुखसुविधा पाहिल्या, तर कोणत्याच शहराला ‘दिल्ली’ दूर नाही. ‘दिल्लीत आता न राहिलेलेच बरे’ असे विधान गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणासंबंधित याचिकेवर सुनावणीदरम्यान केले होते. उद्या ही वेळ आपल्या शहरावरही येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आजच काळजी घेतलेली बरी.

टॅग्स :pollutionप्रदूषणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रair pollutionवायू प्रदूषण